शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लोक फुटतात-तुटतात, पण तिची साथ ११ हजार वर्षांपासून! जागतिक चिमणी दिवस, सर्वात प्रबळ प्रजाती

By निशांत वानखेडे | Updated: March 20, 2024 13:40 IST

माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.

निशांत वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती म्हणून श्वानाव्यतिरिक्त चिमणीची गणना केली जाते. अंटार्टिक वगळता जिथे-जिथे मानवी  अस्तित्व आहे, तिथे चिमणीचे वास्तव्य आहे. अगदी ११,००० वर्षांपूर्वीपासून हा चिमुकला जीव माणसांच्या साेबत असल्याचे पुरावे संशाेधनातून पुढे आले आहेत. म्हणजे माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.

१७व्या शतकात चीनमध्ये व १९व्या शतकात इंग्लंड व युराेपीय देशात चिमण्यांची संख्या ६० ते ७० टक्के घटल्याचे आढळले. काही दशकांत भारतामध्येही संख्या कमी झाली आहे, असे असले तरी ही प्रजाती पक्ष्यांमध्ये सर्वांत प्रबळ असल्याचे म्हटले जाते. कारण सर्वांत हुशार माणसांसाेबत राहणे इतर पक्ष्यांना जमले नाही, ते चिमणीने करून दाखविले.

मानवी परिवर्तनाशी थेट संबंध

राॅयल साेसायटी लंडनचे २०१८चे नवे संशाेधन, तसेच नार्वे, इराण, कझाकिस्तानच्या संशाेधकांनी जिनाेम सिक्वेन्सिंगच्या आधारे ११ हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करायला लागला, तेव्हापासून चिमणी त्याच्यासाेबत असल्याचे स्पष्ट केले आहे.बेथलहेममधील गुहेतील जीवाश्म पुराव्याच्या आधारे ४ लाख वर्षांपूर्वी चिमणीचे अस्तित्व माणसांसाेबत हाेते, असेही स्पष्ट केले आहे. 

बोगनवेल हे चिऊताईचे नवे घर!

पुणे : शहरीकरणामुळे चिमण्या कमी झाल्याची ओरड होते. मात्र, चिमण्या कमी झाल्या नसून अधिवास कमी झाला आहे. त्या आता बोगनवेलींचा शोध घेऊन त्यामध्ये आपले घर थाटताना दिसत आहेत, असे निरीक्षण ज्येष्ठ जैवविविधता संशोधक डॉ. हेमंत घाटे यांनी नोंदविले. बोगनवेल असेल तिथे चिमण्या भरपूर पाहायला मिळतात. सर्वत्र सिमेंटच्या इमारतींमुळे चिमण्यांना जागाच राहिली नाही; पण चिमण्यांनी आता नवीन बदलामुळे स्वत:ला राहण्यासाठी सामावून घेतले आहे, असे ते सांगतात.

का घटतेय संख्या?

  • टेलिकाॅम टाॅवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम हाेतो, असे संशोधन आहे. 
  • जुन्या इमारती, वाडे, घरे नाहीशी झाली. 
  • काही दशकांत अन्नासाठी चिमणीसाेबत भाेवरी, मैना, पारवा या पक्ष्यांची स्पर्धा वाढली असून ते प्रबळ ठरत आहेत.
  • माेठी शहरे साेडून चिमण्यांनी मुक्काम लहान शहर किंवा गावांकडे वळविला आहे.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र