शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन बंद केली नाही, केवळ थांबविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 22:56 IST

पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी पंतप्रधान कार्यालयाकडून समोर आली आहे. सुधारित पेन्शन योजनेचे लाभार्थी ठरलेल्या पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्यात आली नसून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी काही काळ थांबविली असल्याचा खुलासा खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान कार्यालयाचा खुलासा : तपासणीनंतर निवृत्तांना मिळेल दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवृत्त कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारित पेन्शन योजना गेल्या चार महिन्यांपासून अचानक बंद झाल्याने योजनेचे लाभार्थी ठरलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले होते. मात्र या पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी पंतप्रधान कार्यालयाकडून समोर आली आहे. सुधारित पेन्शन योजनेचे लाभार्थी ठरलेल्या पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्यात आली नसून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी काही काळ थांबविली असल्याचा खुलासा खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे. पेन्शनधारकांची ही समस्या लोकमतने यापूर्वी प्रकाशित केली होती. या खुलाशामुळे पेन्शनर्सना न्याय मिळेल, ही आशा निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली होती. यापूर्वी निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचे वेतन कितीही असले तरी त्यांना १५ हजार रुपये वेतन गृहित धरूनच पेन्शन दिली जात होती. त्यानुसार या योजनेतील पेन्शनधारकांना एक हजार, दोन किंवा तीन हजार असे अत्यल्प निवृत्त वेतन मिळते. पेन्शनधारकांनी योजनेत सुधारणा करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय देताना वेतनाची १५ हजाराची मर्यादा न ठेवता, निवृत्तीच्या वेळी कर्मचाºयांचे जे वेतन असेल त्यानुसार पेन्शन देण्यात यावी, असे आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी करताना अनेकांना सुधारित निवृत्ती वेतन सुरू करण्यात आले होते. माहितीनुसार, नागपूर विभागातून १६९७ पेन्शनर्सनी सुधारित निवृत्ती वेतनासाठी अर्ज केला होता. त्यातील १६० पेन्शनधारकांना सुधारित पेन्शन योजनेनुसार पेन्शन सुरू झाली होती. डिसेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ पर्यंत सुधारित पेन्शन मिळाली, मात्र मे २०१९ पासून ती पुन्हा बंद झाली. वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी निवृत्तांना निवृत्तीच्या वेळी असलेल्या वेतनानुसार अतिरिक्त रक्कम भरण्याबाबत ईपीएफओकडून डिमांड पाठविण्यात आल्या. पाठक यांनी सांगितले की, हा फरक दूर करण्यासाठी ईपीएफओकडून या पैशांवर व्याजही लावण्यात आले होते. त्यानुसार एकेका निवृत्तांना ८ ते १५ लाख रुपयांचा डिमांड भरावी लागली. निवृत्तांनी घर गहाण टाकून, दागिने विकून डिमांड भरली. मात्र पेन्शन अचानक बंद झाल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले. अशावेळी ईपीएफओ अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने निवृत्तांमध्ये रोष पसरला होता.याबाबत माहिती अधिकारी कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यांना डिसेंबर २०१८ तसेच जानेवारी व एप्रिल २०१९ ची वाढीव पेन्शन मिळाली. मात्र फेब्रुवारी व मार्चची पेन्शन मिळाली नाही व मे महिन्यापासून ती बंद झाली. याबाबत त्यांनी पत्र पाठवून आपली कैफियत मांडली. यावर पंतप्रधान कार्यालयाने उत्तर सादर करताना कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून ही पेन्शन थांबविण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. या तपासणीनंतर पूर्वप्रभावाने सुधारित पेन्शन सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :prime ministerपंतप्रधान