शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

‘स्पीड’ नसल्यास पोस्टावर दंड

By admin | Updated: September 15, 2015 06:19 IST

डाक विभागाच्या ‘स्पीड’चा फटका अनेकांना बसत असतानाही परिवहन विभागाने लायसन्स, आरसी बुक पाठविण्याचे काम

सुमेध वाघमारे ल्ल नागपूर डाक विभागाच्या ‘स्पीड’चा फटका अनेकांना बसत असतानाही परिवहन विभागाने लायसन्स, आरसी बुक पाठविण्याचे काम डाक विभागावरच सोपविले. उशिरा मिळत असलेल्या कागदपत्रांसाठी नागरिकांची ओरड २०११ पासून होती. अनेकांना आरटीओ ते डाक कार्यालयात खेटे घालावे लागत होते. मात्र उशिरा का होईना परिवहन आयुक्तांनी याची दखल घेतली आहे. पाच दिवसांत वाहन परवाना उमेदवाराला न मिळाल्यास टपाल कार्यालयावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या शुल्कातून रस्ता सुरक्षा अभियानासाठी निधी उपलब्ध होणार आहे.वाहन चालवण्याचा परवाना हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. घराचा पत्ता, ओळखीचा पुरावा व जन्मतारखेचा पुरावा या तीन कागदपत्रांच्या आधारावर वाहन चालवण्याचे लायसन्स मिळते. ओळखीचा पुरावा तसेच घराचा पत्ता दर्शविण्यासाठी लायसन्स महत्त्वाचे ठरते. पासपोर्टसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठीही लायसन्सचा वापर होतो. पूर्वी कोणताही पत्ता देऊन लायसन्स काढले जात असे. अनेक परदेशी नागरिकांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे लायसन्स मिळविल्याच्या तक्रारी समोर आल्या. ही बाब राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याने केंद्र शासनाने लायसन्स घरपोच देण्याची योजना आखली. राज्यात सप्टेंबर २०११ मध्ये घरपोच लायसन्सची योजना सुरू झाली. या निर्णयाचे राज्यभरात स्वागतही झाले. घरपोच लायसन्स मिळणार असल्यामुळे ‘आरटीओह्ण कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत, या विचाराने नागरिकही आनंदित होते. योजनेत नागरिकांकडून ५० रुपये डाक खर्च वसूल करण्यात आला. घरपोच कागदपत्रे मिळणार असल्याने कुणीच याला विरोधही दर्शविला नाही. मात्र, महिनाभरातच या योजनेचा फज्जा उडाला. पैसे भरूनही डाक विभागाकडून कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तब्बल एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अनेकांवर आरटीओ कार्यालय ते डाक कार्यालयात चकरा मारण्याची वेळ आली. परंतु सोमवारी परिवहन आयुक्त सेठी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे उमेदवाराला पाच दिवसांत परवान्यासह इतर दस्तऐवज मिळणार आहे. (प्रतिनिधी)डाक कार्यालयावर प्रति दिवस १७ रुपयांचा दंड४परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार डाक कार्यालयाने पाच दिवसांत संबंधित उमेदवाराला दस्तऐवज घरपोच न पोहोचविल्यास प्रति दिवस १७ रुपयेप्रमाणे दंड आकारण्यात येईल. यात २ रुपये सर्व्हिस चार्ज तर १५ रुपये दंड असे शुल्क असणार आहे. डाक शुल्कातून मिळणार ५ रुपये४पूर्वी ५० रुपयांच्या डाक शुल्कातून आरटीओला १० रुपये मिळायचे. हा निधी रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीवर खर्च व्हायचा. मात्र दरम्यानच्या काळात या शुल्कातून १ रुपयाही न देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन आयुक्तांनी घेतला होता. डाक कार्यालयांवर एवढी मेहेरबानी का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सोनिया सेठी यांनी हा निर्णय मागे घेतला असून, ५ रुपये रस्ता सुरक्षा अभियानाला देण्याचे नव्याने आदेश दिले आहेत.पाच दिवसांत लायसन्स न मिळाल्यास तक्रार करापरिवहन आयुक्तांचे नवे आदेश सोमवारी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार डाक शुल्क घेऊन घरपोच पाठविण्यात येणारे दस्तऐवज पाच दिवसांत न मिळाल्यास तक्रार करा. या तक्रारीच्या आधारे डाक कार्यालयावर दंड आकारण्यात येणार आहे.- विजय चव्हाणप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ शहर