शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पाली विद्यापीठ निर्मितीसाठी नागपुरात विधानभवनावर शांतिमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:31 IST

महाराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी सातत्याने लढा दिला जात आहे. न्यायालयानेसुद्धा यासंबंधात स्पष्ट निर्देश दिले आहे. ५० हजार सह्यांचे निवेदनसुद्धा देण्यात आले, मात्र शासन या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता या मागणीसाठी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत हिवाळी अधिवेशना दरम्यान येत्या १४ तारखेला भव्य शांतिमार्च काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबौद्ध भिक्खू संघ करणार नेतृत्व१४ तारखेला निघणार मार्च

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी सातत्याने लढा दिला जात आहे. न्यायालयानेसुद्धा यासंबंधात स्पष्ट निर्देश दिले आहे. ५० हजार सह्यांचे निवेदनसुद्धा देण्यात आले, मात्र शासन या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता या मागणीसाठी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत हिवाळी अधिवेशना दरम्यान येत्या १४ तारखेला भव्य शांतिमार्च काढण्यात येणार आहे. स्वत: भिक्खू संघ या शांतिमार्चचे नेतृत्व करणार आहे.पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समितीचे मुख्य संयोजक डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. पाली भाषा ही भारताची मूळ व प्राचीन भाषा आहे. याच भाषेमध्ये तथागत बुद्धाने धम्मोपदेश दिला. जगातील अनेक देशांमध्ये पाली भाषेचा मोठा प्रचार-प्रसार झाला. आजही हजारो विद्यार्थी ही भाषा शिकत असतानाही त्याचे एकही विद्यापीठ नाही, ही शोकांतिका आहे. तेव्हा महाराष्ट्रात पालीचे विद्यापीठ स्थापन व्हावे, ही काळाची गरज आहे.येत्या १४ तारखेला यशवंत स्टेडियम येथून सकाळी ११ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, अ.भा. भिक्खू संघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर, नांदेड येथील भदंत उपगुप्त, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, डॉ. भदंत ज्ञानबोधी, भदंत चंद्रकीर्ती, भदंत डॉ. सत्यपाल यांच्या नेतृत्वात विधानभवनावर शांतिमार्च निघेल, असेही त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला भदंत सदानंद महास्थवीर, भदंत ज्ञानबोधी, भदंत चंद्रकीर्ती, डॉ. मालती साखरे, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. नीरज बोधी, डॉ. नीलिमा चव्हाण उपस्थित होते. पालीला अभिजात भाषेचा दर्जा द्याभारतीय राज्यघटनेच्या शेड्यूल्ड-८ मध्ये पालीचा समावेश करण्यात यावा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये संस्कृतप्रमाणे पालीच्या अध्ययन व अध्यापनाची सोय करण्यात यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार यूपीएससीच्या बासवान कमिटीने अभ्यासक्रमात पालीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१८ च्या यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत पाली विषय सुरू करावा, ही मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूर