शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

पहिल्यांदाच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:42 IST

स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.

ठळक मुद्देवाटाण्याच्या आयातीला मर्यादा : देशात उत्पादन कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.दोन ते तीन वर्षांपूर्वी कॅनडा आणि युके्रनमधून वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात व्हायची. वाटाणा ठोकमध्ये २००० ते २२०० रुपये आणि डाळ २६०० ते ३००० रुपये क्विंटल विकण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आणि पीक कमी आले. देशात दरवर्षी ४ लाखांपर्यंत वाटाण्याची आयात व्हायची. पण केंद्र सरकारने आयातीवर ५० टक्के, नंतर १०० टक्के आयात शुल्क आणि यावर्षी वार्षिक १.५ लाख टनापर्यंत निर्बंध लावले. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे आयातीवर निर्बंध लावल्यामुळे देशात वाटाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे वाटाणा डाळीचे क्विंटल भाव ठोक बाजारात ५८०० ते ६००० रुपयांवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत चणा डाळ प्रति क्विंटल ५२०० रुपये क्विंटल विकल्या जात असल्याची माहिती इतवारी ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.पूर्वी चणा डाळ महाग झाल्यानंतर वाटाणा डाळीच्या किमती वाढत नव्हत्या. भाव वाढल्यानंतरही किंमत प्रति क्विंटल २८०० ते ३३०० रुपयांच्या आतच राहायची. तसेच चणा डाळ महाग असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून पदार्थ तयार करण्यासाठी स्वस्त वाटाणा डाळीचा जास्त उपयोग करण्यात येत होता. त्यामुळे लोकांना अनेक वर्षांपासून वाटाणा डाळीची सवय झाली. गावखेडे आणि तालुक्यात याच डाळीची जास्त विक्री व्हायची. सध्या दोन्ही डाळीत ७०० ते ८०० रुपयांचा फरक असतानाही हॉटेलचालक ग्राहकांच्या चवीसाठी वाटाणा डाळीचेच पदार्थ तयार करीत आहेत. त्यामुळे चणा डाळीच्या तुलनेत वाटाणा डाळीला जास्त मागणी आहे. चण्याचे आधारभूत मूल्य ४६५० रुपये असतानाही बाजारात प्रति क्विंटल ४४०० रुपयांत विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.मोटवानी म्हणाले, सणांच्या हंगामात बाजारात मंदीचे वातावरण आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या सततच्या वक्तव्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाजारात तेजी नसतानाही जमाखोरी, साठ्यावर नियंत्रण, सरकार आपल्याकडील माल विकणार, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. सरकार आता व्यवसायातही हस्तक्षेप करीत आहेत. सरकारने व्यवसायात हस्तक्षेप करणे बंद करावा, अशी मागणी मोटवानी यांनी केली.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय