शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पहिल्यांदाच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:42 IST

स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.

ठळक मुद्देवाटाण्याच्या आयातीला मर्यादा : देशात उत्पादन कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.दोन ते तीन वर्षांपूर्वी कॅनडा आणि युके्रनमधून वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात व्हायची. वाटाणा ठोकमध्ये २००० ते २२०० रुपये आणि डाळ २६०० ते ३००० रुपये क्विंटल विकण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आणि पीक कमी आले. देशात दरवर्षी ४ लाखांपर्यंत वाटाण्याची आयात व्हायची. पण केंद्र सरकारने आयातीवर ५० टक्के, नंतर १०० टक्के आयात शुल्क आणि यावर्षी वार्षिक १.५ लाख टनापर्यंत निर्बंध लावले. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे आयातीवर निर्बंध लावल्यामुळे देशात वाटाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे वाटाणा डाळीचे क्विंटल भाव ठोक बाजारात ५८०० ते ६००० रुपयांवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत चणा डाळ प्रति क्विंटल ५२०० रुपये क्विंटल विकल्या जात असल्याची माहिती इतवारी ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.पूर्वी चणा डाळ महाग झाल्यानंतर वाटाणा डाळीच्या किमती वाढत नव्हत्या. भाव वाढल्यानंतरही किंमत प्रति क्विंटल २८०० ते ३३०० रुपयांच्या आतच राहायची. तसेच चणा डाळ महाग असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून पदार्थ तयार करण्यासाठी स्वस्त वाटाणा डाळीचा जास्त उपयोग करण्यात येत होता. त्यामुळे लोकांना अनेक वर्षांपासून वाटाणा डाळीची सवय झाली. गावखेडे आणि तालुक्यात याच डाळीची जास्त विक्री व्हायची. सध्या दोन्ही डाळीत ७०० ते ८०० रुपयांचा फरक असतानाही हॉटेलचालक ग्राहकांच्या चवीसाठी वाटाणा डाळीचेच पदार्थ तयार करीत आहेत. त्यामुळे चणा डाळीच्या तुलनेत वाटाणा डाळीला जास्त मागणी आहे. चण्याचे आधारभूत मूल्य ४६५० रुपये असतानाही बाजारात प्रति क्विंटल ४४०० रुपयांत विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.मोटवानी म्हणाले, सणांच्या हंगामात बाजारात मंदीचे वातावरण आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या सततच्या वक्तव्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाजारात तेजी नसतानाही जमाखोरी, साठ्यावर नियंत्रण, सरकार आपल्याकडील माल विकणार, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. सरकार आता व्यवसायातही हस्तक्षेप करीत आहेत. सरकारने व्यवसायात हस्तक्षेप करणे बंद करावा, अशी मागणी मोटवानी यांनी केली.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय