शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:42 IST

स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.

ठळक मुद्देवाटाण्याच्या आयातीला मर्यादा : देशात उत्पादन कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.दोन ते तीन वर्षांपूर्वी कॅनडा आणि युके्रनमधून वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात व्हायची. वाटाणा ठोकमध्ये २००० ते २२०० रुपये आणि डाळ २६०० ते ३००० रुपये क्विंटल विकण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आणि पीक कमी आले. देशात दरवर्षी ४ लाखांपर्यंत वाटाण्याची आयात व्हायची. पण केंद्र सरकारने आयातीवर ५० टक्के, नंतर १०० टक्के आयात शुल्क आणि यावर्षी वार्षिक १.५ लाख टनापर्यंत निर्बंध लावले. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे आयातीवर निर्बंध लावल्यामुळे देशात वाटाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे वाटाणा डाळीचे क्विंटल भाव ठोक बाजारात ५८०० ते ६००० रुपयांवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत चणा डाळ प्रति क्विंटल ५२०० रुपये क्विंटल विकल्या जात असल्याची माहिती इतवारी ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.पूर्वी चणा डाळ महाग झाल्यानंतर वाटाणा डाळीच्या किमती वाढत नव्हत्या. भाव वाढल्यानंतरही किंमत प्रति क्विंटल २८०० ते ३३०० रुपयांच्या आतच राहायची. तसेच चणा डाळ महाग असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून पदार्थ तयार करण्यासाठी स्वस्त वाटाणा डाळीचा जास्त उपयोग करण्यात येत होता. त्यामुळे लोकांना अनेक वर्षांपासून वाटाणा डाळीची सवय झाली. गावखेडे आणि तालुक्यात याच डाळीची जास्त विक्री व्हायची. सध्या दोन्ही डाळीत ७०० ते ८०० रुपयांचा फरक असतानाही हॉटेलचालक ग्राहकांच्या चवीसाठी वाटाणा डाळीचेच पदार्थ तयार करीत आहेत. त्यामुळे चणा डाळीच्या तुलनेत वाटाणा डाळीला जास्त मागणी आहे. चण्याचे आधारभूत मूल्य ४६५० रुपये असतानाही बाजारात प्रति क्विंटल ४४०० रुपयांत विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.मोटवानी म्हणाले, सणांच्या हंगामात बाजारात मंदीचे वातावरण आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या सततच्या वक्तव्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाजारात तेजी नसतानाही जमाखोरी, साठ्यावर नियंत्रण, सरकार आपल्याकडील माल विकणार, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. सरकार आता व्यवसायातही हस्तक्षेप करीत आहेत. सरकारने व्यवसायात हस्तक्षेप करणे बंद करावा, अशी मागणी मोटवानी यांनी केली.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय