शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

महावितरणच्या कृषी मेळाव्यात १६ लाख ५८ हजार थकबाकीचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर : महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या नव्या धोरणांतर्गत सुरू असलेल्या मोहिमेत काटोल विभागातील सावरगाव आणि नरखेड येथील ९० शेतकऱ्यांनी ...

नागपूर : महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या नव्या धोरणांतर्गत सुरू असलेल्या मोहिमेत काटोल विभागातील सावरगाव आणि नरखेड येथील ९० शेतकऱ्यांनी १६ लाख ५८ हजार रुपयाच्या कृषिपंपाच्या थकबाकीचा भरणा केला.

सावरगाव येथे झालेल्या मेळाव्यात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी अध्यक्षस्थानी होते. मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता राजेंद्रकुमार मलासने उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे कृषिपंपाच्या वीज देयकापोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने काढलेल्या योजनेत शेतकरी सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ७८७ शेतकऱ्यांनी सुमारे १२ कोटी रुपयांचा भरणा केला, अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती देवकाबाई बोडखे, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे उपस्थित होते. थकबाकीची रक्कम एकत्रित भरणाऱ्या शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

नरखेड येथील मेळाव्यात पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, माजी सभापती वसंत चांडक, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश रेवतकर उपस्थित होते. तिनखेडा ग्रामपंचायतने सौर कृषी ऊर्जा प्रकल्पासाठी ३५ एकर जागा देण्याची तयारी दाखविली.

...

आता ग्रामपंचायतींना मिळणार वसुलीचा वाटा

थकबाकीचा निधी वसूल करण्यात स्थानिक ग्रामपंचायतींनी सहकार्य केल्यास त्यांनाही प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे. थकलेली वसुली लवकर होण्यासाठी महावितरण कंपनीने ही योजना आखली आहे. या योजनेत वसूल होणारा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात विजेचे जाळे मजबूत करण्यावर खर्च करण्याचे महावितरणचे नियोजन आहे.

...