शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन द्या; हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 20:38 IST

प्रत्यक्ष मैदानात उतरून कोरोना संक्रमणाविरुद्ध दोन-दोन हात करीत असलेल्या आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रत्यक्ष मैदानात उतरून कोरोना संक्रमणाविरुद्ध दोन-दोन हात करीत असलेल्या आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला दिला आहे.यासंदर्भात नागपूर महानगरपालिका कर्मचारी संघाने अर्ज दाखल केला असून, त्यावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महानगरपालिकेने आशा वर्कर्सना रोज २०० रुपये मानधन देण्यासाठी २५ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने केंद्र सरकारला हा आदेश दिला. तसेच, केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही आणि मनपानेही आर्थिक अडचणीचे कारण सांगून हात वर केले तर, न्यायालयच आशा वर्कर्सना २५ एप्रिलपासून २०० रुपये रोज मानधन देण्याचा आदेश जारी करेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. आशा वर्कर्स योद्धे असून, ते या अधिकारापासून वंचित राहायला नको. त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार व महानगरपालिका या तिघांंनीही यासंदर्भात ५ मेपूर्वी आवश्यक पावले उचलावीत, असेदेखील न्यायालयाने सांगितले.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असलेल्या आशा वर्कर्सची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांना समाधानकारक मानधन दिले जात नाही. आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली नाहीत. तसेच, त्यांना वेळोवेळी नाश्ता, चहा व पाणीही पुरवले जात नाही, असे अर्जदारांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. महानगरपालिकेने त्यावरील प्रत्युत्तरात आशा वर्कर्सना वैयक्तिक सुरक्षेकरिता सॅनिटायझर, ग्लोव्हज, मास्क व जोडे पुरविण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय आशा वर्कर्सचा ५० लाख रुपयाचा जीवन विमा काढण्यात आला आहे. त्यांना १००० रुपयाशिवाय आणखी मासिक १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. तसेच, २०० रुपये रोज मानधन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यानंतर तो आशा वर्कर्सना वितरित केला जाईल. मनपा आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त मानधन देणे कठीण आहे. आशा वर्कर्सना नाश्ता व चहा देण्याची कायद्यात तरतूद नाही, असेही मनपाने न्यायालयाला सांगितले. अर्जदारातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.आशा वर्कर्सना अशी वागणूक मिळणे खेदजनकमहानगरपालिका आशा वर्कर्सना सध्या १००० रुपये महिना मानधन देत आहे. याशिवाय त्यांना आणखी १५०० रुपये देण्यात येणार आहे. ही रक्कम एकूण २५०० रुपये होते, पण तीही जगण्यासाठी अपूर्ण आहे. महिन्याचा हिशेब केल्यास आशा वर्कर्सना रोज १०० रुपयेही मानधन मिळत नाही. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून कर्तव्य बजावत असलेल्या आशा वर्कर्सना अशी वागणूक मिळणे खेदजनक आहे, असे परखड मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHigh Courtउच्च न्यायालय