शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घराघरांत ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण; पावसाच्या उघडझापचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2022 20:23 IST

Nagpur News आरोग्यासाठी अतिशय अपायकारक असलेल्या सध्याच्या वातावरणामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. मेडिकल, मेयोत दिवसाला २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमेडिकल, मेयोत दिवसाला २०० वर रुग्ण

नागपूर : आरोग्यासाठी अतिशय अपायकारक असलेल्या सध्याच्या वातावरणामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. मेडिकल, मेयोत दिवसाला २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. खाजगी हॉस्पिटलमध्येसुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे. व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे.

पावसाळ्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दूषित पाण्याच्या पुरवठ्याने गॅस्ट्रो, डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण, थंडी, पाऊस व मध्येच ऊन आणि दमट वातावरणामुळे जीवाणू व विषाणूंचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या वातावरणामुळे घराघरांत ‘व्हायरल’चे रुग्ण दिसून येत आहेत. यात लहान मुलांमध्ये १०१-१०३ अंशापर्यंत जाणारा ताप, सोबत अंगदुखी व ‘थ्रोट इन्फेक्शन’चे अधिक रुग्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- एकाच घरात दोनपेक्षा जास्त रुग्ण

बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ‘व्हायरल इन्फेक्शन’ पसरतो. यामुळे एकाच घरात दोनपेक्षा अधिक रुग्ण दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, बाधित रुग्णांपासून अंतर ठेवल्यास, मास्कचा वापर केल्यास व वारंवार हात साबणाने स्वच्छ धुऊन घेतल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.

- सर्दी-खोकल्यातही वाढ

सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे म्हणणे आहे. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, खोकला येणे आदी प्रकारचे त्रास डोके वर काढतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो.

- हे करा

शक्यतोवर पावसात ओले होऊ नका. बाहेरचे खाणे टाळा. उकळून थंड केलेलेच पाणी प्या. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवा. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवा. नियमित व्यायाम करा. जास्तीतजास्त पाणी प्या. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- ताप अंगावर काढू नका

ताप, सर्दी, पडसे अंगावर काढू नका. कोणत्याही आजारासाठी तात्पुरते उपचार करू नका. स्वत:हून औषधी घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार घ्या. मास्कचा वापर करा. गर्दीचे ठिकाण टाळा.

- डॉ. जय देशमुख, फिजिशियन

:: ‘इन्फेक्शन’ची लक्षणे

- सर्दी, खोकला

- डोके व संपूर्ण अंग दुखणे

- ताप येणे

- मळमळ होणे

- श्वास घ्यायला त्रास होणे

- औषध घेतल्यावरसुद्धा तीन दिवस ताप चढउतार होत राहणे

टॅग्स :Healthआरोग्य