शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

डॉक्टरांवर रुग्णांचा विश्वास संवादाने वाढतो : नितीन वरघणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:44 IST

डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले.

ठळक मुद्देशासकीय आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले हा वैद्यकीय जगतासाठी चिंतेचा विषय आहे. डॉक्टर व रुग्ण संवाद खुंटला की अशा घटना घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अगदतंत्र विभागाच्यावतीने ‘डॉक्टरांविरुद्ध वाढते हिंसाचार रोखण्यासाठी उपाय’ विषयावर डॉ. वरघणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार, डॉ. शमा सूर्यवंशी, संहिता विभाग प्रमुख डॉ. भटकर व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र लांबट प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. वरघणे म्हणाले, संवाद खुंटल्यामुळेच डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. बरेचदा रुग्णालयातील स्टॉफ, नर्सेस किंवा ज्युनियर डॉक्टरांशी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद होतो व त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण होते. अशावेळी अनुचित गोष्ट घडली तर नातेवाईकांचा रोष वाढतो व अशा घटना घडतात. त्यामुळे डॉक्टरांनी नेहमी संवाद साधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याशिवाय रुग्णांच्या बदलत्या प्रत्येक स्थितीची डॉक्टरांकडून नातेवाईकांना मिळणे आवश्यक आहे. असे झाल्यास लोकांचा विश्वास वाढतो. डॉक्टरांचे कर्तव्य रुग्णांच्या जीवाशी संबंधित असते. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविणे हे आपले कर्तव्य आहे, अशी प्रामाणिक भावना असावी. वेळ पडल्यास उपचारादरम्यान वरिष्ठांची मदत घेण्यात काही गैर नाही, असे मार्गदर्शन त्यांनी केले.याशिवाय शासनाने डॉक्टरांसाठी रुग्णालयामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करावे, सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि तीन स्तराची सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहनही डॉ. वरघणे यांनी केले. जमाव घुसणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. गणेश मुक्कावार यांनी सुरक्षेबाबतचे मार्गदर्शन समजून भावी डॉक्टरांनी भविष्यात सेवाकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन मीरा कदम यांनी तर सुप्रिया शेंडे यांनी आभार मानले. अगदतंत्र विभागाचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने या व्याख्यानात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरdoctorडॉक्टर