शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवर रुग्णांचा विश्वास संवादाने वाढतो : नितीन वरघणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:44 IST

डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले.

ठळक मुद्देशासकीय आयुर्वेद महाविद्यालयात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले हा वैद्यकीय जगतासाठी चिंतेचा विषय आहे. डॉक्टर व रुग्ण संवाद खुंटला की अशा घटना घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अगदतंत्र विभागाच्यावतीने ‘डॉक्टरांविरुद्ध वाढते हिंसाचार रोखण्यासाठी उपाय’ विषयावर डॉ. वरघणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार, डॉ. शमा सूर्यवंशी, संहिता विभाग प्रमुख डॉ. भटकर व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र लांबट प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. वरघणे म्हणाले, संवाद खुंटल्यामुळेच डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. बरेचदा रुग्णालयातील स्टॉफ, नर्सेस किंवा ज्युनियर डॉक्टरांशी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद होतो व त्यामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण होते. अशावेळी अनुचित गोष्ट घडली तर नातेवाईकांचा रोष वाढतो व अशा घटना घडतात. त्यामुळे डॉक्टरांनी नेहमी संवाद साधणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याशिवाय रुग्णांच्या बदलत्या प्रत्येक स्थितीची डॉक्टरांकडून नातेवाईकांना मिळणे आवश्यक आहे. असे झाल्यास लोकांचा विश्वास वाढतो. डॉक्टरांचे कर्तव्य रुग्णांच्या जीवाशी संबंधित असते. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचविणे हे आपले कर्तव्य आहे, अशी प्रामाणिक भावना असावी. वेळ पडल्यास उपचारादरम्यान वरिष्ठांची मदत घेण्यात काही गैर नाही, असे मार्गदर्शन त्यांनी केले.याशिवाय शासनाने डॉक्टरांसाठी रुग्णालयामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करावे, सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि तीन स्तराची सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहनही डॉ. वरघणे यांनी केले. जमाव घुसणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. गणेश मुक्कावार यांनी सुरक्षेबाबतचे मार्गदर्शन समजून भावी डॉक्टरांनी भविष्यात सेवाकार्य करावे, असे आवाहन केले. संचालन मीरा कदम यांनी तर सुप्रिया शेंडे यांनी आभार मानले. अगदतंत्र विभागाचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने या व्याख्यानात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरdoctorडॉक्टर