शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 10:21 IST

बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.

ठळक मुद्दे४५६ नव्या रुग्णांची नोंद७ जणांचा मृत्यू

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी नागपुरात आढळून आला. त्यानंतर ७० दिवसानंतर पहिल्या हजार रुग्णांची नोंद झाली. परंतु जून महिन्यात रुग्णसंख्येचा वेग वाढला. हजार रुग्ण गाठण्याचे दिवस ७० वरून १५ दिवसांवर आले. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.विदर्भात झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसमोर चिंतेची बाब ठरली आहे. आज तर रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच ४४३ रुग्णांची नोंद झाली. शिवाय, सात बाधितांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णांची संख्या १० हजार २५६ तर मृतांची संख्या २७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत ६ हजार ७२१ रुग्ण बरे झाले असून ३ हजार २०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांचे शतकनागपूर जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी रुग्णांनी शंभरी गाठली. १२२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३,२९३ झाली आहे. २,११३ रुग्ण बरे व १,११९ रुग्ण उपचाराखाली आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातही रुग्ण वाढतच चालले आहेत. ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ८३४ झाली आहे. या जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात ४० बाधितांचे निदान झाले. रुग्णसंख्या २,२४६ झाली आहे.वर्धा जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू तर ११ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १२६ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १९, चंद्रपूर जिल्ह्यात १५, तर गोंदिया जिल्ह्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

यवतमाळात एक मृत्यू, सात दिवस लॉकडाऊनयवतमाळ जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात यवतमाळातील इस्लामपुरा स्थित ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा मृत्यू झाला. तर ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधिक २२ जण पुसदचे तर १७ पांढरकवडा येथील आहेत. दरम्यान प्रशासनाने २५ जुलैपासून सात दिवसांसाठी यवतमाळ व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे.अमरावती जिल्ह्यात दिवसभरात ६९ संक्रमितांची नोंद झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १,४८५ वर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारच्या अहवालात मोर्शी शहरात ११ व तालुक्यात दोन अशा १३ व्यक्तींची नोंद झाली. याव्यतिरिक्त तिवसा व परतवाडा, चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

-चंद्रपूरमध्ये शून्य मृत्यूविदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर गेली आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकाही मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. येथे १०४ मृत्यूची नोंद आहे. त्यानंतर नागपुरात ६३, अमरावती जिल्ह्यात ४२, बुलडाणा जिल्ह्यात २४, यवतमाळ जिल्ह्यात २३, वाशिम जिल्ह्यात नऊ, वर्धा जिल्ह्यात आठ, गोंदिया जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात दोन तर गडचिरोली जिल्ह्यात एका रुग्णाचा बळी गेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस