शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

विदर्भात वाढले कोरोना रुग्ण; १९ दिवसात ५,०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 10:21 IST

बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.

ठळक मुद्दे४५६ नव्या रुग्णांची नोंद७ जणांचा मृत्यू

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात पहिला रुग्ण ११ मार्च रोजी नागपुरात आढळून आला. त्यानंतर ७० दिवसानंतर पहिल्या हजार रुग्णांची नोंद झाली. परंतु जून महिन्यात रुग्णसंख्येचा वेग वाढला. हजार रुग्ण गाठण्याचे दिवस ७० वरून १५ दिवसांवर आले. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.बुधवारी विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर पोहचली. ही संख्या गाठण्यास १३२ दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, मागील १९ दिवसांत रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे.विदर्भात झपाट्याने वाढत असलेली रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसमोर चिंतेची बाब ठरली आहे. आज तर रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच ४४३ रुग्णांची नोंद झाली. शिवाय, सात बाधितांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णांची संख्या १० हजार २५६ तर मृतांची संख्या २७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत ६ हजार ७२१ रुग्ण बरे झाले असून ३ हजार २०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांचे शतकनागपूर जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी रुग्णांनी शंभरी गाठली. १२२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३,२९३ झाली आहे. २,११३ रुग्ण बरे व १,११९ रुग्ण उपचाराखाली आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातही रुग्ण वाढतच चालले आहेत. ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ८३४ झाली आहे. या जिल्ह्यात दोन मृत्यूची नोंंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात ४० बाधितांचे निदान झाले. रुग्णसंख्या २,२४६ झाली आहे.वर्धा जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू तर ११ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १२६ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात १९, चंद्रपूर जिल्ह्यात १५, तर गोंदिया जिल्ह्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

यवतमाळात एक मृत्यू, सात दिवस लॉकडाऊनयवतमाळ जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात यवतमाळातील इस्लामपुरा स्थित ४६ वर्षीय मोबाईल विक्रेत्याचा मृत्यू झाला. तर ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधिक २२ जण पुसदचे तर १७ पांढरकवडा येथील आहेत. दरम्यान प्रशासनाने २५ जुलैपासून सात दिवसांसाठी यवतमाळ व पांढरकवडा शहरात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे.अमरावती जिल्ह्यात दिवसभरात ६९ संक्रमितांची नोंद झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १,४८५ वर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारच्या अहवालात मोर्शी शहरात ११ व तालुक्यात दोन अशा १३ व्यक्तींची नोंद झाली. याव्यतिरिक्त तिवसा व परतवाडा, चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

-चंद्रपूरमध्ये शून्य मृत्यूविदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १० हजारावर गेली आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकाही मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात झाले आहेत. येथे १०४ मृत्यूची नोंद आहे. त्यानंतर नागपुरात ६३, अमरावती जिल्ह्यात ४२, बुलडाणा जिल्ह्यात २४, यवतमाळ जिल्ह्यात २३, वाशिम जिल्ह्यात नऊ, वर्धा जिल्ह्यात आठ, गोंदिया जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात दोन तर गडचिरोली जिल्ह्यात एका रुग्णाचा बळी गेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस