शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
5
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
6
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
7
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
8
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
9
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
10
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
11
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
12
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
13
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
14
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
15
Stock Markets News: फार्मावर १००% टॅरिफ, सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी २४,८०० च्या खाली, फार्मा शेअर्स आपटले
16
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
18
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
19
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
20
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव

महाकाव्यातून संयम, चारित्र्याचा संदेश

By admin | Updated: March 28, 2017 01:58 IST

स्त्रीमनाचे अंतरंग उलगडणारे, सक्तीने लादलेले ब्रह्मचर्य कसे विकृतीकडे वळते, ....

वि.स. जोग : महाकवी सुधाकर गायधनींच्या ‘योगिनींच्या स्वप्न सावल्या’चे प्रकाशन नागपूर : स्त्रीमनाचे अंतरंग उलगडणारे, सक्तीने लादलेले ब्रह्मचर्य कसे विकृतीकडे वळते, अशा विषयांवर हात घालत स्त्रीमन जपणाऱ्या ‘योगिनींच्या स्वप्न सावल्या’ या महाकाव्यातून संयम आणि चारित्राचा संदेश महाकवी सुधाकर गायधनी यांनी दिला असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. वि.स. जोग यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्या वतीने महाकवी सुधाकर गायधनी यांचे दुसरे महाकाव्य ‘योगिनींच्या स्वप्न सावल्या’या काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा सोमवारी बाबुराव धनवटे सभागृहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. वि.स. जोग, अध्यक्ष टी.एम. करडे, वक्ते दा.गो. काळे, संजय बोरुडे, रमेश बोरकुटे उपस्थित होते. याप्रसंगी योगिनींच्या स्वप्न सावल्यांचा उल्लेख करीत जोग म्हणाले की, सुधाकर गायधनी यांनी हे साहित्य रचून खूप मोठे उड्डाण घेतले आहे. दोन महाकाव्य रचून त्यांनी गाठलेली उंची महाराष्ट्रात कोणताही साहित्यिक गाठू शकत नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही महाकाव्य रचले गेले, परंतु ते घटनेवर आधारित होते. परंतु गायधनींनी हे महाकाव्य रचून अभिजात भाषेचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. बोलीभाषेतील कविता लिहिणारा हा कवी मासेस बरोबरच क्लासेससचासुद्धा आहे. हे महाकाव्य म्हणजे काश्मीरच्या गालिचाचा समूह आहे. याप्रसंगी संजय बोरुडे म्हणाले की, हे महाकाव्य अभिजात संवेदनशीलता प्रदान करणारे आहे. आकाशव्यापी आवाका असलेले महाकाव्य आजच्या सैराट झालेल्या पिढीला वास्तव्यात आणणारे आहे. भोग, कर्म आणि मोक्ष याचे तत्त्वज्ञान सांगणारे हे महाकाव्य आहे. कवीने नव्या सांस्कृतिक संचेताचा दस्ता आम्हाला प्रदान केल्याच्या भावना बोरुडे यांनी व्यक्त केल्या. स्त्रीजाणिवेचे अंतर्सूत्र या साहित्यातून जागृत झाल्याचे दा.गो. क ाळे म्हणाले. याप्रसंगी महाकवी सुधाकर गायधनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, अलंकार आणि आभूषणाने परिधान के लेली कोणतीही कलाकृती उत्कृष्ट ठरत नाही. कवितासुद्धा त्यातीलच एक आहे. त्यामुळे रसिकांनी ती अनुभवल्यासच त्याची महती कळते. अतिशिष्ट कलावंत हा रसिकांसाठी कधीच सहृदयी ठरू शकत नसल्याचे गायधनी म्हणाले. (प्रतिनिधी)