शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

श्रेष्ठत्वाचा मार्ग अंतर्मनाच्या आनंदातूनच

By admin | Updated: November 17, 2014 00:56 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारची दु:ख आहेत. परंतु जीवन जगताना त्यांना कवटाळण्यापेक्षा अंतर्मनातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आनंदी व्यक्तींनाच श्रेष्ठत्व प्राप्त होते.

निधी चैतन्य : भगवद्गीतेचे सार संसारिक व्यक्तींसाठीचनागपूर : प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारची दु:ख आहेत. परंतु जीवन जगताना त्यांना कवटाळण्यापेक्षा अंतर्मनातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आनंदी व्यक्तींनाच श्रेष्ठत्व प्राप्त होते. भगवद्गीतेत हीच बाब वारंवार अधोरेखित करण्यात आली आहे, या शब्दांत चिन्मय मिशनच्या ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी गीतेमधील भावार्थाचे सार मांडले. ‘सप्तक’ तसेच काळे फाऊंडेशन ट्रस्टतर्फे लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह येथे आयोजित ‘मंत्रास्-२०१४’ या व्याख्यानमालेदरम्यान ‘एक्सलन्स थ्रू भगवद्गीता’ या विषयावर त्यांनी यथार्थ विवेचन केले.महाभारतातील अर्जुन आणि आजच्या युगातील सामान्य व्यक्ती यांच्या अडचणी व समस्या एकच होत्या. त्यांची व्याप्ती वेगवेगळी असली तरी त्यांचे कारण सारखेच आहे. आयुष्यात यश मिळते ते कौशल्य आणि क्षमतेवरून. अनेकांमध्ये कौशल्य असते, परंतु ते अंतर्गत म्हणजेच मनाच्या क्षमतेत कमी पडतात. त्यामुळे ते संभ्रमात पडतात व ते तणावात राहतात. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये तर हा प्रकार वाढीस लागला आहे. अंतर्गत क्षमता, आत्मविश्वास जागविण्यात शिक्षणप्रणाली मागे पडते आहे अन् त्यामुळे विद्यार्थी लहान वयातच तणावाचे बळी ठरत आहेत असे मत ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी व्यक्त केले. महाभारताच्या रणांगणावर भगवद्गीतेचे उद्बोधन झाले. गीता ऐकणारा अर्जुन असो किंवा सांगणारा कृष्ण, दोघेही संसारिक होते आणि त्यांच्यासमोर अडचणी होत्याच. सामान्य मनुष्य अनेकदा मला खूप कठीण परिस्थिती सहन करावी लागत आहे, अशी तक्रार करतात. परंतु महाभारतातील दु:खांशी आपल्या आयुष्यातील लहानसहान अडचणींची तुलना केली तर नक्कीच मनाला दिलासा मिळेल. गीतेचा संदेश हा संन्यासीजनांसाठीच नाही तर संसारिक जीवनात असलेल्या नागरिकांसाठीदेखील आहे. गीतेचे अस्तित्व केवळ देवघरापुरते मर्यादित न राहता घराच्या सर्व कोपऱ्यात तिचा संदेश पोहोचला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांच्या माध्यमातून आयुष्यात शांती व समाधान कसे काय प्राप्त करता येईल याचा भावोपदेश गीतेमध्ये देण्यात आला आहे. ज्ञानयोगामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते. भक्तियोगामुळे प्रेमभावना वाढते तर कर्मयोगामुळे जे काम केले त्याचा निकाल जसा आहे तसा स्वीकारण्याची शक्ती मिळते असे ज्ञानामृत निधी चैतन्य यांनी दिले. मनुष्याच्या आयुष्यात बदलांना फार मोठे स्थान आहे. बदलांसाठी हिंमत व त्याग फार आवश्यक आहे. गीता हे आनंद, ज्ञान, समाधान, स्वीकार, त्याग या गुणांचे भंडार आहे व आजच्या युगातदेखील त्याचे महत्त्व अबाधित आहे असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमप्रसंगी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यावेळी ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी उपस्थितांच्या प्रश्नांनादेखील समर्पक उत्तरे दिली. (प्रतिनिधी)