शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

श्रेष्ठत्वाचा मार्ग अंतर्मनाच्या आनंदातूनच

By admin | Updated: November 17, 2014 00:56 IST

प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारची दु:ख आहेत. परंतु जीवन जगताना त्यांना कवटाळण्यापेक्षा अंतर्मनातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आनंदी व्यक्तींनाच श्रेष्ठत्व प्राप्त होते.

निधी चैतन्य : भगवद्गीतेचे सार संसारिक व्यक्तींसाठीचनागपूर : प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रकारची दु:ख आहेत. परंतु जीवन जगताना त्यांना कवटाळण्यापेक्षा अंतर्मनातील आनंद शोधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आनंदी व्यक्तींनाच श्रेष्ठत्व प्राप्त होते. भगवद्गीतेत हीच बाब वारंवार अधोरेखित करण्यात आली आहे, या शब्दांत चिन्मय मिशनच्या ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी गीतेमधील भावार्थाचे सार मांडले. ‘सप्तक’ तसेच काळे फाऊंडेशन ट्रस्टतर्फे लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह येथे आयोजित ‘मंत्रास्-२०१४’ या व्याख्यानमालेदरम्यान ‘एक्सलन्स थ्रू भगवद्गीता’ या विषयावर त्यांनी यथार्थ विवेचन केले.महाभारतातील अर्जुन आणि आजच्या युगातील सामान्य व्यक्ती यांच्या अडचणी व समस्या एकच होत्या. त्यांची व्याप्ती वेगवेगळी असली तरी त्यांचे कारण सारखेच आहे. आयुष्यात यश मिळते ते कौशल्य आणि क्षमतेवरून. अनेकांमध्ये कौशल्य असते, परंतु ते अंतर्गत म्हणजेच मनाच्या क्षमतेत कमी पडतात. त्यामुळे ते संभ्रमात पडतात व ते तणावात राहतात. विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये तर हा प्रकार वाढीस लागला आहे. अंतर्गत क्षमता, आत्मविश्वास जागविण्यात शिक्षणप्रणाली मागे पडते आहे अन् त्यामुळे विद्यार्थी लहान वयातच तणावाचे बळी ठरत आहेत असे मत ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी व्यक्त केले. महाभारताच्या रणांगणावर भगवद्गीतेचे उद्बोधन झाले. गीता ऐकणारा अर्जुन असो किंवा सांगणारा कृष्ण, दोघेही संसारिक होते आणि त्यांच्यासमोर अडचणी होत्याच. सामान्य मनुष्य अनेकदा मला खूप कठीण परिस्थिती सहन करावी लागत आहे, अशी तक्रार करतात. परंतु महाभारतातील दु:खांशी आपल्या आयुष्यातील लहानसहान अडचणींची तुलना केली तर नक्कीच मनाला दिलासा मिळेल. गीतेचा संदेश हा संन्यासीजनांसाठीच नाही तर संसारिक जीवनात असलेल्या नागरिकांसाठीदेखील आहे. गीतेचे अस्तित्व केवळ देवघरापुरते मर्यादित न राहता घराच्या सर्व कोपऱ्यात तिचा संदेश पोहोचला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांच्या माध्यमातून आयुष्यात शांती व समाधान कसे काय प्राप्त करता येईल याचा भावोपदेश गीतेमध्ये देण्यात आला आहे. ज्ञानयोगामुळे ज्ञानाची व्याप्ती वाढते. भक्तियोगामुळे प्रेमभावना वाढते तर कर्मयोगामुळे जे काम केले त्याचा निकाल जसा आहे तसा स्वीकारण्याची शक्ती मिळते असे ज्ञानामृत निधी चैतन्य यांनी दिले. मनुष्याच्या आयुष्यात बदलांना फार मोठे स्थान आहे. बदलांसाठी हिंमत व त्याग फार आवश्यक आहे. गीता हे आनंद, ज्ञान, समाधान, स्वीकार, त्याग या गुणांचे भंडार आहे व आजच्या युगातदेखील त्याचे महत्त्व अबाधित आहे असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमप्रसंगी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यावेळी ब्रह्मचारिणी निधी चैतन्य यांनी उपस्थितांच्या प्रश्नांनादेखील समर्पक उत्तरे दिली. (प्रतिनिधी)