शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कायदेशीर बाबींमुळे ‘पतंजली’ रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:40 IST

कायदेशीर बाबी आणि काही विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे मिहानमधील पतंजली प्रकल्पातील उत्पादन वेळेत सुरू होऊ शकले नाही, ....

ठळक मुद्देरामदेव बाबा : याच महिन्यात हजारो लोक काम करताना दिसतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायदेशीर बाबी आणि काही विभागांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झाल्यामुळे मिहानमधील पतंजली प्रकल्पातील उत्पादन वेळेत सुरू होऊ शकले नाही, अशी खंत रामदेव बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली असून, पतंजली प्रकल्पात याच महिन्यात हजारो लोक काम करताना दिसतील, अशी घोषणा त्यांनी केली.एक वर्षापूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सहा महिन्यातच प्रकल्प सुरू होईल, अशी घोषणा रामदेव बाबा यांनी व्यासपीठावरून हजारो लोकांसमोर केली होती, हे विशेष. रामदेव बाबा म्हणाले, मी देशविकासासाठी काम करीत आहे. काही प्रश्नांवरून राजकीय लोक विनाकारण मला गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना घाबरणारा नाही. अशांकडे दुर्लक्ष केलेले बरे, असा टोलाही त्यांनी लगावला.प्लास्टिकला ‘बायबाय’एका प्रश्नाच्या उत्तरात रामदेव बाबा म्हणाले, उत्पादनाच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकशिवाय पर्याय नाही. पण त्याचाही पर्याय आम्ही शोधला आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचा उपयोग करण्यात येत आहे. आम्ही पर्यावरणमित्र आहोत. देशात पतंजलीचे जवळपास पाच हजार सेंटर आहेत. प्लास्टिकचा एक तुकडाही पतंजली प्रकल्पात दिसणार नाही, लवकरच ‘बायबाय’ करू, असे त्यांनी स्पष्ट केले. मी घातलेले कपडे सुती असून हाताने तयार केले आहेत, असे ते म्हणाले.संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचा श्रीगणेशा पुढील वर्षीदेशातील पहिला मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प पुढील वर्षी नागपूरलगत सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्यातीत मालाचे उत्पादन करण्याचा मानस असून देशांतर्गतही विक्री होईल.अखेर त्यांनी बाबा कसा असावा, यावर सोदाहरण मत मांडले. ज्यांच्यात साधेपणा नाही, ते बाबा नाहीत. साधू म्हणजे चालते-फिरते तीर्थ म्हटले आहे. परोपकार करतात तो साधू, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.चुकीचे काम करणाºया बाबांवर कारवाई व्हावीकुप्रसिद्ध बाबांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी टीकास्त्र सोडले आहे. बाबा राम रहीमवर झालेली कारवाई योग्यच आहे. जो बाबा चुकीचे कार्य करत असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. ‘पतंजली’च्या वितरकांच्या संमेलनासाठी ते नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राम रहीमसारख्या व्यक्तींना कायद्याची भाषा समजावलीच पाहिजे, असेदेखील बाबा रामदेव म्हणाले. दरम्यान कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेवर बाबा रामदेव यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचे देशाकरिता काही योगदान नाही, दिवसभर नुसते बकवास करत असतात त्यांच्याबाबत उत्तर देण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव नसल्याबाबत सवाल करत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामदेवबाबांना लक्ष्य केले होते.पुढील वर्षात दोन वा तीन हजार कोटींचा कच्चा माल खरेदी करणारपतंजली समूहातर्फे देशातील शेतकºयांकडून दरवर्षी १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कच्च्या मालाची खरेदी करण्यात येते. आॅलिव्हराचा त्यात केवळ ५ टक्के वाटा आहे. येथील शेतकºयांकडून कच्च्या मालाची खरेदी करण्यात येणार आहे. अनेक कच्च्या मालापासून पतंजलीची उत्पादने तयार होतात. पुढील वर्षात दोन किंवा तीन हजार कोटी रुपयांचा कच्चा माल बाजारातून जास्त भावातच खरेदी करण्यात येणार आहे. त्याचा शेतकºयांना फायदाच होणार आहे. शिवाय विदर्भातील शेतकºयांचे उत्पादन खरेदी करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी समूह कटिबद्ध आहे.