शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्डकप जिंकूनही पदरी उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

महाराष्ट्रातील दिव्यांग क्रिकेटपटूंची व्यथा : ५ लाखांच्या बक्षिसांसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा मंगेश व्यवहारे नागपूर : इंग्लंडच्या वर्सेस्टरशायर मैदानावर इंग्लंडच्या संघाला ...

महाराष्ट्रातील दिव्यांग क्रिकेटपटूंची व्यथा : ५ लाखांच्या बक्षिसांसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा

मंगेश व्यवहारे

नागपूर : इंग्लंडच्या वर्सेस्टरशायर मैदानावर इंग्लंडच्या संघाला मात देऊन भारतीय संघाने दिव्यांग क्रिकेटचा वर्ल्डकप ऑगस्ट २०१९ मध्ये जिंकून आणला. या भारतीय क्रिकेट संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश होता. क्रिकेटला दैवत मानणाऱ्या भारतात जो सन्मान सामान्य खेळाडूंच्या नशिबी आला, तो सन्मान दिव्यांग क्रिकेटपटूंना लाभला नाही. राज्याच्या क्रीडा धोरणात तरतूद असूनही अवघ्या ५ लाख रुपयांच्या बक्षिसांसाठी या क्रिकेटपटूंना वर्षभरापासून प्रतीक्षा करावी लागत आहे.

दिव्यांग क्रिकेटचा पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप इंग्लंडमध्ये भरला होता. सहा देशांच्या टीम यात सहभागी झाल्या होत्या. भारतीय टीमने पाकिस्तान, बांग्लादेश, झिंबॉब्वे, अफगाणिस्तान या टीमवर मात करून, वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या टीमला पराभूत केले. दिव्यांगांच्या या भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंडच्या मातीत भारताचा ध्वज फडकविला. ही टीम जेव्हा विजयाचा वर्ल्डकप घेऊन भारतात परतली, तेव्हा त्यांचे कौतुक करायला सरकारचा साधा प्रतिनिधीही नव्हता. यातील विक्रांत केनी, गुरुदास राऊत व रवींद्र संते या तीन महाराष्ट्रातील खेळाडूंनी भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. या टीमचा विक्रांत केनी हा कर्णधार, तर नागपूरचा गुरुदास राऊत हा उपकर्णधार होता.

यापूर्वी जुलै २०१७ मध्ये महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद मिळाले होते. महिलांच्या या संघात महाराष्ट्रातील ३ महिला खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्र सरकारने या तीनही महिला खेळाडूंना ५० लाख रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला होता. या देशात सामान्य पुरुषांच्या क्रिकेटला ना पैशाचे मोल आहे, ना ही बक्षिसांचे. अमाप पैसा व अमाप बक्षिसे त्यांच्यावर लुटविली जातात.

मात्र या दिव्यांग खेळाडूंच्या पदरात क्रिकेटचे प्रशंसक असोत की सरकार, अनास्थाच पडली. हे खेळाडू दिव्यांगांसाठी आदर्श आहेत. दिव्यांग असल्यामुळे खेळाच्या माध्यमातून करिअरची दिशा सूकर होईल, अशी भाबडी अपेक्षा दिव्यांगांना आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या दिव्यांगांनी चमकदार कामगिरी केली, त्यांची जर उपेक्षा होत असेल, तर येणाऱ्या खेळाडूंनी काय आदर्श घ्यावा!

- वर्ल्डकप जिंकल्यांतर दिव्यांगाप्रती जाणिव ठेवणाऱ्या काही समाजबांधवांनी आमचा जाहीर सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावे, यासाठी सरकारकडे मागणी केली होती. क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महिला क्रिकेटपटूंचा राज्य सरकारने केलेल्या गौरवाचा संदर्भ देत विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे जाहीर सत्कार व ५ लाख रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासंदर्भातील शासन तरतुदीचा उल्लेख करून जानेवारी २०२० ला प्रस्ताव पाठविला होता. पण या प्रस्तावावर अजूनही निर्णय झाला नसल्याची खंत आहे.

विक्रांत केनी, कर्णधार

- वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये देऊन गौरव केला. विदर्भ क्रिकेट संघाने मला २ लाख रुपये देऊन गौरविले. पण केंद्र असो वा राज्य, सरकारचा मान-सन्मान आमच्या नशिबी लाभला नाही. आम्ही सुद्धा सामान्य खेळाडूंइतकीच मेहनत घेतो. एक हात नसतानाही फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चोखपणे करतो. वर्ल्डकपच नाही तर विविध देशात होणाऱ्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतो. तरीही ही उपेक्षा...आम्ही दिव्यांग आहोत म्हणून का?

-गुरुदास राऊत, उपकर्णधार