शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

वर्ल्डकप जिंकूनही पदरी उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

महाराष्ट्रातील दिव्यांग क्रिकेटपटूंची व्यथा : ५ लाखांच्या बक्षिसांसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा मंगेश व्यवहारे नागपूर : इंग्लंडच्या वर्सेस्टरशायर मैदानावर इंग्लंडच्या संघाला ...

महाराष्ट्रातील दिव्यांग क्रिकेटपटूंची व्यथा : ५ लाखांच्या बक्षिसांसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा

मंगेश व्यवहारे

नागपूर : इंग्लंडच्या वर्सेस्टरशायर मैदानावर इंग्लंडच्या संघाला मात देऊन भारतीय संघाने दिव्यांग क्रिकेटचा वर्ल्डकप ऑगस्ट २०१९ मध्ये जिंकून आणला. या भारतीय क्रिकेट संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश होता. क्रिकेटला दैवत मानणाऱ्या भारतात जो सन्मान सामान्य खेळाडूंच्या नशिबी आला, तो सन्मान दिव्यांग क्रिकेटपटूंना लाभला नाही. राज्याच्या क्रीडा धोरणात तरतूद असूनही अवघ्या ५ लाख रुपयांच्या बक्षिसांसाठी या क्रिकेटपटूंना वर्षभरापासून प्रतीक्षा करावी लागत आहे.

दिव्यांग क्रिकेटचा पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप इंग्लंडमध्ये भरला होता. सहा देशांच्या टीम यात सहभागी झाल्या होत्या. भारतीय टीमने पाकिस्तान, बांग्लादेश, झिंबॉब्वे, अफगाणिस्तान या टीमवर मात करून, वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या टीमला पराभूत केले. दिव्यांगांच्या या भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंडच्या मातीत भारताचा ध्वज फडकविला. ही टीम जेव्हा विजयाचा वर्ल्डकप घेऊन भारतात परतली, तेव्हा त्यांचे कौतुक करायला सरकारचा साधा प्रतिनिधीही नव्हता. यातील विक्रांत केनी, गुरुदास राऊत व रवींद्र संते या तीन महाराष्ट्रातील खेळाडूंनी भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. या टीमचा विक्रांत केनी हा कर्णधार, तर नागपूरचा गुरुदास राऊत हा उपकर्णधार होता.

यापूर्वी जुलै २०१७ मध्ये महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद मिळाले होते. महिलांच्या या संघात महाराष्ट्रातील ३ महिला खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्र सरकारने या तीनही महिला खेळाडूंना ५० लाख रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला होता. या देशात सामान्य पुरुषांच्या क्रिकेटला ना पैशाचे मोल आहे, ना ही बक्षिसांचे. अमाप पैसा व अमाप बक्षिसे त्यांच्यावर लुटविली जातात.

मात्र या दिव्यांग खेळाडूंच्या पदरात क्रिकेटचे प्रशंसक असोत की सरकार, अनास्थाच पडली. हे खेळाडू दिव्यांगांसाठी आदर्श आहेत. दिव्यांग असल्यामुळे खेळाच्या माध्यमातून करिअरची दिशा सूकर होईल, अशी भाबडी अपेक्षा दिव्यांगांना आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या दिव्यांगांनी चमकदार कामगिरी केली, त्यांची जर उपेक्षा होत असेल, तर येणाऱ्या खेळाडूंनी काय आदर्श घ्यावा!

- वर्ल्डकप जिंकल्यांतर दिव्यांगाप्रती जाणिव ठेवणाऱ्या काही समाजबांधवांनी आमचा जाहीर सत्कार करून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात यावे, यासाठी सरकारकडे मागणी केली होती. क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी महिला क्रिकेटपटूंचा राज्य सरकारने केलेल्या गौरवाचा संदर्भ देत विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे जाहीर सत्कार व ५ लाख रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासंदर्भातील शासन तरतुदीचा उल्लेख करून जानेवारी २०२० ला प्रस्ताव पाठविला होता. पण या प्रस्तावावर अजूनही निर्णय झाला नसल्याची खंत आहे.

विक्रांत केनी, कर्णधार

- वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये देऊन गौरव केला. विदर्भ क्रिकेट संघाने मला २ लाख रुपये देऊन गौरविले. पण केंद्र असो वा राज्य, सरकारचा मान-सन्मान आमच्या नशिबी लाभला नाही. आम्ही सुद्धा सामान्य खेळाडूंइतकीच मेहनत घेतो. एक हात नसतानाही फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चोखपणे करतो. वर्ल्डकपच नाही तर विविध देशात होणाऱ्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतो. तरीही ही उपेक्षा...आम्ही दिव्यांग आहोत म्हणून का?

-गुरुदास राऊत, उपकर्णधार