शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:52 IST

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली.

ठळक मुद्देशहर काँग्रेसकडे अर्ज करून अर्थ काय? इच्छुक उमेदवारांची नाराजी

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली. त्यामुळे शहर काँग्रेसकडे फक्त दिखाव्यासाठी अर्ज मागविण्यात आले का, असा सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली आहे.लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी १६ जानेवारीपर्यंत शहर काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज सादर केले. २०१४ मध्ये लोकसभा लढलेल्या उमेदवाराला अर्ज करण्यातून सूट देण्यात आली होती. यावेळी मुत्तेमवार विरोधी गटाचे माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. बबनराव तायवाडे, माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत संबंधित अर्जांवर चर्चा झाली व शहर काँग्रेसने आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे १८ जानेवारी रोजी सादर केला. विशेष म्हणजे माजी खासदार नाना पटोले, शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी शहर काँग्रेसकडे अर्जही केला नव्हता. असे असताना दिल्लीत मात्र या तीन नेत्यांच्या दावेदारीवरच चर्चा करण्यात आली.शहर काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेसकडे गेलेल्या अहवालात या तीनपैकी कुणाचे नाव होते का, अर्जच केला नव्हता तर नाव प्रदेशकडून केंद्रीय समितीकडे कसे गेले, दिल्लीतच थेट उमेदवार निश्चित करायचा होता तर स्थानिक पातळीवर अर्ज मागविण्याचे सोंग कशासाठी करण्यात आले, असे प्रश्न उपस्थित करीत इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर काँग्रेसकडे अर्ज न करताही उमेदवारी दिली जात असेल तर शहर काँग्रेसच्या अधिकारांवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

विधानसभेसाठी अर्जांचे सोंग करू नकाशहर काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागविल्यानंतरही अर्ज न करणाऱ्यांपैकी कुणालाही थेट दिल्लीतून तिकीट दिले जात असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शहर काँग्रेसकडे अर्ज मागविण्याचे सोंग करू नका. उगाच कुणाच्या भावनांशी खेळ करू नका. दिल्लीत बसूनच उमेदवार ठरवा, अशा संतप्त भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस