शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:52 IST

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली.

ठळक मुद्देशहर काँग्रेसकडे अर्ज करून अर्थ काय? इच्छुक उमेदवारांची नाराजी

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली. त्यामुळे शहर काँग्रेसकडे फक्त दिखाव्यासाठी अर्ज मागविण्यात आले का, असा सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली आहे.लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी १६ जानेवारीपर्यंत शहर काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज सादर केले. २०१४ मध्ये लोकसभा लढलेल्या उमेदवाराला अर्ज करण्यातून सूट देण्यात आली होती. यावेळी मुत्तेमवार विरोधी गटाचे माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. बबनराव तायवाडे, माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत संबंधित अर्जांवर चर्चा झाली व शहर काँग्रेसने आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे १८ जानेवारी रोजी सादर केला. विशेष म्हणजे माजी खासदार नाना पटोले, शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी शहर काँग्रेसकडे अर्जही केला नव्हता. असे असताना दिल्लीत मात्र या तीन नेत्यांच्या दावेदारीवरच चर्चा करण्यात आली.शहर काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेसकडे गेलेल्या अहवालात या तीनपैकी कुणाचे नाव होते का, अर्जच केला नव्हता तर नाव प्रदेशकडून केंद्रीय समितीकडे कसे गेले, दिल्लीतच थेट उमेदवार निश्चित करायचा होता तर स्थानिक पातळीवर अर्ज मागविण्याचे सोंग कशासाठी करण्यात आले, असे प्रश्न उपस्थित करीत इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर काँग्रेसकडे अर्ज न करताही उमेदवारी दिली जात असेल तर शहर काँग्रेसच्या अधिकारांवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

विधानसभेसाठी अर्जांचे सोंग करू नकाशहर काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागविल्यानंतरही अर्ज न करणाऱ्यांपैकी कुणालाही थेट दिल्लीतून तिकीट दिले जात असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शहर काँग्रेसकडे अर्ज मागविण्याचे सोंग करू नका. उगाच कुणाच्या भावनांशी खेळ करू नका. दिल्लीत बसूनच उमेदवार ठरवा, अशा संतप्त भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस