शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाकडे अर्ज नाहीत तरीही दिल्लीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:52 IST

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली.

ठळक मुद्देशहर काँग्रेसकडे अर्ज करून अर्थ काय? इच्छुक उमेदवारांची नाराजी

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बैठकीत चर्चेला आली. त्यामुळे शहर काँग्रेसकडे फक्त दिखाव्यासाठी अर्ज मागविण्यात आले का, असा सवाल इच्छुक उमेदवारांनी उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली आहे.लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी १६ जानेवारीपर्यंत शहर काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज सादर केले. २०१४ मध्ये लोकसभा लढलेल्या उमेदवाराला अर्ज करण्यातून सूट देण्यात आली होती. यावेळी मुत्तेमवार विरोधी गटाचे माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. बबनराव तायवाडे, माजी मुख्य आयकर आयुक्त धनंजय धार्मिक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीत संबंधित अर्जांवर चर्चा झाली व शहर काँग्रेसने आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे १८ जानेवारी रोजी सादर केला. विशेष म्हणजे माजी खासदार नाना पटोले, शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी शहर काँग्रेसकडे अर्जही केला नव्हता. असे असताना दिल्लीत मात्र या तीन नेत्यांच्या दावेदारीवरच चर्चा करण्यात आली.शहर काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेसकडे गेलेल्या अहवालात या तीनपैकी कुणाचे नाव होते का, अर्जच केला नव्हता तर नाव प्रदेशकडून केंद्रीय समितीकडे कसे गेले, दिल्लीतच थेट उमेदवार निश्चित करायचा होता तर स्थानिक पातळीवर अर्ज मागविण्याचे सोंग कशासाठी करण्यात आले, असे प्रश्न उपस्थित करीत इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहर काँग्रेसकडे अर्ज न करताही उमेदवारी दिली जात असेल तर शहर काँग्रेसच्या अधिकारांवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.

विधानसभेसाठी अर्जांचे सोंग करू नकाशहर काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागविल्यानंतरही अर्ज न करणाऱ्यांपैकी कुणालाही थेट दिल्लीतून तिकीट दिले जात असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शहर काँग्रेसकडे अर्ज मागविण्याचे सोंग करू नका. उगाच कुणाच्या भावनांशी खेळ करू नका. दिल्लीत बसूनच उमेदवार ठरवा, अशा संतप्त भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस