शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नागपुरात पावसाळी नाल्यांची सफाई अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 02:09 IST

शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला आहे. गडर लाईनचीही कामे अर्धवट आहेत.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या सूचनेनंतरही सफाई नाही: पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोव्हिड-१९ चा ससर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने मागील अडीच महिन्यापासून शहरातील बाजारपेठ, दुकाने बंद होती. रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचऱ्याचे प्रमाण घटल्याने सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्यात आला आहे. गडर लाईनचीही कामे अर्धवट आहेत.प्रभाग क्रमांक ३० मधील पावसाळी नाल्यातील कचरा व गाळ काढला जावा, यासाठी प्रभागाचे नगरसेक संजय महाकाळकर यांनी झोन अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केल्या, परंतु अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. अशीच अवस्था अन्य प्रभागातील आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्या गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात वस्त्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे.महापौर व आयुक्तांनी आढावा बैठकीत पावसाळ्यापूर्वी नाल्या व गडर लाईन साफ करण्याचे निर्देश दिले होते. परंतु झोनस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी होत नाही. नगरसेवकांनी प्रभागातील तुंबलेल्या नाल्या साफ करण्यास सांगितल्यानंतरही प्रभाग ३० मधील कामे सुरू झालेली नाही, अशी माहिती संजय महाकाळकर यांनी दिली.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नागपुरातील तीन नद्या, शहरातील नाले आणि पावसाळी नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी काम वेळेआधी सुरू करण्यात आले असले तरी पावसाळी नाल्याची सफाई झालेली नाही. नाल्याची कामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते. पण दहा दिवस झाले तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, अशी नगरसेवकांची तक्रार आहे.पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोकाशहरातील पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा काढण्याची कामे अर्धवट आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका आहे. पावसाला सुरुवात झाल्यास गाळ काढणे शक्य न झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcivic issueनागरी समस्या