शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो, मुलांमधील राग, आक्रमकता रोखायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:46 IST

Nagpur News पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

नागपूर : पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वर्तणुकीबद्दल दक्ष असायला हवे. विशेषत: राग व्यक्त करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करायला हवा, अतिकडक शिक्षा कटाक्षाने टाळायला हवी. मात्र कुठल्या गोष्टी केलेल्या चालणार नाहीत, याची मुलांना स्पष्ट जाणीव द्यायला हवी. मुलांना त्यांच्या भावना मांडण्यालाही प्राधान्य द्यायला हवे, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अलीकडे बदललेली जीवनशैली व वाढत्या भौतिक सुविधांमुळे मुलांमध्ये विचार व आचार बदलत आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने ते आपल्या पालकांशी, मित्रांशी कमी संपर्क ठेवतात. त्यातूनच जेवण कमी करणे, रात्री उशिरापर्यंत जागणे अशा गोष्टी घडतात. याचा परिणाम मुलांमध्ये राग आक्रमकतेच्या स्वरूपात दिसू लागतो. त्यामुळे पालकांनी मुलांना उलट रागावण्यापेक्षा त्यामागील कारण जाणून घेतले पाहिजे, त्यांच्यातील बदल वेळीच ओळखले पाहिजे.

- दहापैकी आठ केसेस रागीट, आक्रमक मुलांच्या

अलीकडच्या काळात मुलांमध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे. विविध कारणांमुळे मुले रागीट बनले आहेत. दहापैकी आठ मुले हे लवकर राग येणारे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-काय खबरदारी घ्याल

आई-वडिलांनी मुलांसोबत वागताना तारतम्य ठेवा. त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलणे, चिडून बालणे टाळा.

-हे करा

: पालकांनी मुलांसोबत किंवा त्याच्यासमोर व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, प्रार्थना करणे, सोबत जेवण करायला हवे. याचा सकारात्मक परिणाम होतो.

: पालकांनी मुलांच्या वयानुसार वागायला हवे. गरज पडल्यानुसार आपल्या भूमिका बदलायला हव्यात.

-मुले रागीट होण्याची कारणे काय?

: अभ्यासाचा अतिरिक्त ताण शिक्षकांकडून मिळणारी अपमानास्पद वर्तणूक.

: पालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्याचे रूपांतर रागात होणे.

: मोबाइलवर गेम खेळणे, त्यात पराभव झाल्यावर आदळआपट करणे.

: आई-वडील नोकरीला गेल्यानंतर घरात एकटेपणा घेऊन वावरणारी मुले.

-ही भावनिकता घसरत असल्याचे लक्षण

जेव्हा मनुष्यामध्ये भय नावाची भावना निर्माण होते तेव्हा तो पळवाट शोधतो किंवा आक्रमक होतो. मुलांना आई-वडिलांना सोडून जाता येत नसल्याने ते आक्रमक होतात. हे भावनिकता घसरत असल्याचे म्हणजे हताशपणा येत असल्याचे लक्षण आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांकडूनही बऱ्याच अपेक्षा, आकांक्षा ठेवतात. यामुळे मुलांच्या मनात संघर्ष निर्माण होतो. शिवाय, स्क्रीन टाइम वाढल्याचा परिणाम ‘डायलेक्टिक मेमरी’ म्हणजे ‘व्यवहारिक स्मृती’वर होतो. या स्मृतीची योग्य पद्धतीने वाढ न झाल्यानेही राग व आक्रमकता वाढताना दिसून येत आहे.

-डॉ. शैलेश पानगावकर, बाल मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य