शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पालकांनो, मुलांमधील राग, आक्रमकता रोखायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:46 IST

Nagpur News पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

नागपूर : पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वर्तणुकीबद्दल दक्ष असायला हवे. विशेषत: राग व्यक्त करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करायला हवा, अतिकडक शिक्षा कटाक्षाने टाळायला हवी. मात्र कुठल्या गोष्टी केलेल्या चालणार नाहीत, याची मुलांना स्पष्ट जाणीव द्यायला हवी. मुलांना त्यांच्या भावना मांडण्यालाही प्राधान्य द्यायला हवे, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अलीकडे बदललेली जीवनशैली व वाढत्या भौतिक सुविधांमुळे मुलांमध्ये विचार व आचार बदलत आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने ते आपल्या पालकांशी, मित्रांशी कमी संपर्क ठेवतात. त्यातूनच जेवण कमी करणे, रात्री उशिरापर्यंत जागणे अशा गोष्टी घडतात. याचा परिणाम मुलांमध्ये राग आक्रमकतेच्या स्वरूपात दिसू लागतो. त्यामुळे पालकांनी मुलांना उलट रागावण्यापेक्षा त्यामागील कारण जाणून घेतले पाहिजे, त्यांच्यातील बदल वेळीच ओळखले पाहिजे.

- दहापैकी आठ केसेस रागीट, आक्रमक मुलांच्या

अलीकडच्या काळात मुलांमध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे. विविध कारणांमुळे मुले रागीट बनले आहेत. दहापैकी आठ मुले हे लवकर राग येणारे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-काय खबरदारी घ्याल

आई-वडिलांनी मुलांसोबत वागताना तारतम्य ठेवा. त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलणे, चिडून बालणे टाळा.

-हे करा

: पालकांनी मुलांसोबत किंवा त्याच्यासमोर व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, प्रार्थना करणे, सोबत जेवण करायला हवे. याचा सकारात्मक परिणाम होतो.

: पालकांनी मुलांच्या वयानुसार वागायला हवे. गरज पडल्यानुसार आपल्या भूमिका बदलायला हव्यात.

-मुले रागीट होण्याची कारणे काय?

: अभ्यासाचा अतिरिक्त ताण शिक्षकांकडून मिळणारी अपमानास्पद वर्तणूक.

: पालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्याचे रूपांतर रागात होणे.

: मोबाइलवर गेम खेळणे, त्यात पराभव झाल्यावर आदळआपट करणे.

: आई-वडील नोकरीला गेल्यानंतर घरात एकटेपणा घेऊन वावरणारी मुले.

-ही भावनिकता घसरत असल्याचे लक्षण

जेव्हा मनुष्यामध्ये भय नावाची भावना निर्माण होते तेव्हा तो पळवाट शोधतो किंवा आक्रमक होतो. मुलांना आई-वडिलांना सोडून जाता येत नसल्याने ते आक्रमक होतात. हे भावनिकता घसरत असल्याचे म्हणजे हताशपणा येत असल्याचे लक्षण आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांकडूनही बऱ्याच अपेक्षा, आकांक्षा ठेवतात. यामुळे मुलांच्या मनात संघर्ष निर्माण होतो. शिवाय, स्क्रीन टाइम वाढल्याचा परिणाम ‘डायलेक्टिक मेमरी’ म्हणजे ‘व्यवहारिक स्मृती’वर होतो. या स्मृतीची योग्य पद्धतीने वाढ न झाल्यानेही राग व आक्रमकता वाढताना दिसून येत आहे.

-डॉ. शैलेश पानगावकर, बाल मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य