शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पालकांनो, मुलांमधील राग, आक्रमकता रोखायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:46 IST

Nagpur News पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

नागपूर : पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वर्तणुकीबद्दल दक्ष असायला हवे. विशेषत: राग व्यक्त करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करायला हवा, अतिकडक शिक्षा कटाक्षाने टाळायला हवी. मात्र कुठल्या गोष्टी केलेल्या चालणार नाहीत, याची मुलांना स्पष्ट जाणीव द्यायला हवी. मुलांना त्यांच्या भावना मांडण्यालाही प्राधान्य द्यायला हवे, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अलीकडे बदललेली जीवनशैली व वाढत्या भौतिक सुविधांमुळे मुलांमध्ये विचार व आचार बदलत आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने ते आपल्या पालकांशी, मित्रांशी कमी संपर्क ठेवतात. त्यातूनच जेवण कमी करणे, रात्री उशिरापर्यंत जागणे अशा गोष्टी घडतात. याचा परिणाम मुलांमध्ये राग आक्रमकतेच्या स्वरूपात दिसू लागतो. त्यामुळे पालकांनी मुलांना उलट रागावण्यापेक्षा त्यामागील कारण जाणून घेतले पाहिजे, त्यांच्यातील बदल वेळीच ओळखले पाहिजे.

- दहापैकी आठ केसेस रागीट, आक्रमक मुलांच्या

अलीकडच्या काळात मुलांमध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे. विविध कारणांमुळे मुले रागीट बनले आहेत. दहापैकी आठ मुले हे लवकर राग येणारे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-काय खबरदारी घ्याल

आई-वडिलांनी मुलांसोबत वागताना तारतम्य ठेवा. त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलणे, चिडून बालणे टाळा.

-हे करा

: पालकांनी मुलांसोबत किंवा त्याच्यासमोर व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, प्रार्थना करणे, सोबत जेवण करायला हवे. याचा सकारात्मक परिणाम होतो.

: पालकांनी मुलांच्या वयानुसार वागायला हवे. गरज पडल्यानुसार आपल्या भूमिका बदलायला हव्यात.

-मुले रागीट होण्याची कारणे काय?

: अभ्यासाचा अतिरिक्त ताण शिक्षकांकडून मिळणारी अपमानास्पद वर्तणूक.

: पालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्याचे रूपांतर रागात होणे.

: मोबाइलवर गेम खेळणे, त्यात पराभव झाल्यावर आदळआपट करणे.

: आई-वडील नोकरीला गेल्यानंतर घरात एकटेपणा घेऊन वावरणारी मुले.

-ही भावनिकता घसरत असल्याचे लक्षण

जेव्हा मनुष्यामध्ये भय नावाची भावना निर्माण होते तेव्हा तो पळवाट शोधतो किंवा आक्रमक होतो. मुलांना आई-वडिलांना सोडून जाता येत नसल्याने ते आक्रमक होतात. हे भावनिकता घसरत असल्याचे म्हणजे हताशपणा येत असल्याचे लक्षण आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांकडूनही बऱ्याच अपेक्षा, आकांक्षा ठेवतात. यामुळे मुलांच्या मनात संघर्ष निर्माण होतो. शिवाय, स्क्रीन टाइम वाढल्याचा परिणाम ‘डायलेक्टिक मेमरी’ म्हणजे ‘व्यवहारिक स्मृती’वर होतो. या स्मृतीची योग्य पद्धतीने वाढ न झाल्यानेही राग व आक्रमकता वाढताना दिसून येत आहे.

-डॉ. शैलेश पानगावकर, बाल मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य