शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पारधींनाही हवाय जगण्याचा अधिकार ; मोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:41 IST

अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी विभागामार्फत २०० कोटींचे पारधी पॅकेज द्यावप्रत्येक कुटुंबाला ४५ किलो धान्य देण्यात यावे

आॅनलाईन लोकमतनागपूर : अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु आमचा समाज अस्पृश्यतेखाली जीवन जगत आहे. शासनाने पारधी समाजाचा सर्वे करून, पारधी कृती आराखडा तयार करावा, उपेक्षित जीवन जगणाऱ्या पारध्यांना शैक्षणिक सवलती, घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या घेऊन आदिवासी पारधी समाज संघटना व आदिवासी पारधी युवा विकास परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व बाबूसिंग पवार, राजेंद्र काळे, रजनी पवार, रेखा कराड, देशराज पवार, नरेश पवार, आतिष पवार, अनिल पवार, सिकंदर पवार, प्रकाश पवार आदींनी केले. हिंगोली जिल्ह्यातील जोडतोंडा गावात झालेल्या खून प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, शासनाच्या निकषाप्रमाणे अतिक्रमित जमिन, त्वरित पट्टे व सातबारा देऊन नावाने करावे, आदिवासी विभागामार्फत २०० कोटींचे पारधी पॅकेज द्यावे, समाजाच्या शिक्षित युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे, छबरी आदिवासी विकास महामंडळांतर्गत देण्यात येणाऱ्या  घरकूल निधीमध्ये वाढ करावी, पारधी तांड्यावर बालसंस्कार केंद्र व अंगणवाडी देण्यात यावी, प्रत्येक कुटुंबाला ४५ किलो धान्य देण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनVidhan Bhavanविधान भवन