शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

परातेंना सरकारी वकील पदावरून हटवा : न्यायाधीश संघटनेची हल्ला प्रकरणात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 20:46 IST

पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने उडी घेतली आहे. हल्लेखोर सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह संघटनेच्यावतीने विधी व न्याय विभाग आणि गृह विभागाचे प्रधान सचिवांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे व उपाध्यक्ष दिनेश कोठाळीकर यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

ठळक मुद्देराज्य सरकारला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने उडी घेतली आहे. हल्लेखोर सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह संघटनेच्यावतीने विधी व न्याय विभाग आणि गृह विभागाचे प्रधान सचिवांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे व उपाध्यक्ष दिनेश कोठाळीकर यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.पराते यांना सहायक सरकारी वकील पदावरून हटविण्यात यावे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पराते यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेण्यासाठी दिलेल्या आदेशामध्ये अन्य काही वकिलांची नावे नोंदवली असून त्या वकिलांवरही आवश्यक कारवाई करण्यात यावी, यापुढे हे प्रकरण दाबण्याचा किंवा कमकुवत करण्याचा प्रयत्न होऊ नये याकरिता या प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी आणि न्यायाधीशांना न्यायालयात व निवासस्थानी कडक सुरक्षा पुरविण्यात यावी अशा अन्य मागण्या संघटनेने केल्या आहेत. तसेच, या मागण्या निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची विनंती केली आहे.संघटनेने या मागण्या सरकारसमक्ष ठेवण्यासोबतच या घटनेचा तीव्र निषेधही केला आहे. हा हल्ला न्यायदान प्रक्रि येत अडथळे निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा, सामान्य माणसांचा न्यायदान व न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल. या हल्ल्यामुळे न्यायाधीशांना मानसिक धक्का पोहोचला आहे. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई ग्राहक पंचायतच्या प्रकरणात न्यायाधीशांना कडक सुरक्षा पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशाचे अद्याप पालन झाले नाही. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे. राज्यातील न्यायव्यवस्थेने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या हल्ल्यामुळे न्यायव्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहोचला आहे असे मत संघटनेने निवेदनात व्यक्त केले.सरकारी वकिलांवर गंभीर आरोपसंपूर्ण जिल्हा सरकारी वकील कार्यालय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माहिती मोडूनतोडून सादर करण्याचा व आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. तसेच, दोषी सरकारी वकिलांची हकालपट्टी करण्यात यावी असे म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल