शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पानठेले, 'बीअर बार'मधील गर्दीमुळे 'कोरोना' होत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:11 IST

‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद्याप दिलेले नाहीत.

ठळक मुद्देशाळा-महाविद्यालये बंद, यांनाच सूट का? : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या गर्दीमुळे ‘कोरोना’चा संसर्ग होत नाही का, असा उपरोधिक सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.एकीकडे सरकारी कार्यालयांमध्येही गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परंतु कोरोनाला खरोखरच प्रतिबंध घालायचा असेल तर पानठेले, बीअर बार, वाईन शॉप्स व रेस्टॉरेन्ट्समधील गर्दीवरदेखील आळा घालणे तेवढेच आवश्यक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे.सध्या नागपूर शहरात ‘कोरोना’ दुसऱ्या टप्प्यात आहे. तो जर तिसºया किंवा चौथ्या टप्प्यामध्ये गेला तर नागपुरात हाहाकार माजेल. शहरातील फुटपाथवरील हातठेले, पानठेले, हॉटेल्स, बीअर बार आणि वाईन शॉप्स या ठिकाणी आरोग्याबाबत कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले आहे.शहरातील बहुतांश पानठेल्यांवर दिवसभर गर्दी असते. त्या परिसरात जागोजागी लोक थुंकताना दिसून येतात. शिवाय खर्रा खाणारे लोक शहरभर ‘पिचकाºया’ मारत असतात. ‘बीअर बार’ व ‘वाईन्स शॉप’मध्ये तर सायंकाळनंतर जास्त गर्दी होते. तेथे ना तपासणी होत आहे ना कुणी ‘मास्क’ किंवा ‘सॅनिटायझर’चा वापर करत आहे. येथून संक्रमित होऊन नागरिक शहरात वेगवेगळ््या ठिकाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात तातडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक वर्तुळातूनदेखील व्यक्त होत आहे.दारू, खर्रा जीवनावश्यक बाबी नाहीत‘कोरोना’वर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने चार दिवस उपरोक्त ठिकाणे बंद केली तर काही आभाळ कोसळणार नाही किंवा कुणी मृत्युमुखीदेखील पडणार नाही. दारू, खर्रा या गोष्टी काही जीवनावश्यक वस्तू किंवा औषधे म्हणून गणली जात नाही. मग अशा वेळी जिल्हा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर