शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

नागपुरात पाणीपुरीचे ठेले बनताहेत ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:27 IST

रस्त्यावरील खाद्यपदार्थ व पाणीपुरीच्या दुकानात सुरक्षेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा ठेल्यांवर स्वच्छता आणि शारीरिक अंतराचे नियमही धाब्यावर बसलेले असतात. त्यात चौकाचौकातील पाणीपुरीचे ठेले ‘कोरोना’चे वाहक ठरू पाहात आहेत.

ठळक मुद्दे नियम धाब्यावर : व्यवसाय करा पण स्वच्छतेकडे तरी लक्ष द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही आठवड्यात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असल्याने प्रत्येकाच्या मनात धडकी भरली आहे. काही साहित्य, भाज्या खरेदी करण्यास गेल्यावर मनात संशयाचे ढग जमा होतात. अशा अवस्थेत किराणा व्यावसायिक व इतर साहित्य विक्रेते सुरक्षेची काळजी घेताना दिसतात. मात्र रस्त्यावरील खाद्यपदार्थ व पाणीपुरीच्या दुकानात सुरक्षेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा ठेल्यांवर स्वच्छता आणि शारीरिक अंतराचे नियमही धाब्यावर बसलेले असतात. त्यात चौकाचौकातील पाणीपुरीचे ठेले ‘कोरोना’चे वाहक ठरू पाहात आहेत.एकीकडे सर्व व्यवहार सुरू करण्याकडे पावले उचलली जात आहेत तर दुसरीकडे कोविड रुग्णांची वाढही झपाट्याने होत आहे. अशावेळी आपणच आपल्या सुरक्षेची काळजी घेणे अगत्याचे आहे. मात्र पाणीपुरीच्या ठेल्यांवर या सुरक्षेचे सर्रास उल्लंघन होत आहे. रोजगाराचा प्रश्न म्हणून विक्रेत्यांना दुकाने लावू दिली आहेत पण नियमांकडेच दुर्लक्ष होत आहे. रामदासपेठ, गांधीनगर, प्रतापनगर, आयटी पार्क, सीताबर्डी, सदर, गांधीबाग, महाल किंवा दक्षिण नागपूरमध्ये मानेवाडा रोडच्या वस्त्यांमध्ये अशा सर्वच भागात पाणीपुरीचे ठेले लागलेले आपल्याला दिसतील. मात्र या ठेल्यांवर दिसणारे दृश्य चिंताजनकच म्हणावे लागेल. एकतर या ठेल्यांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला असतो. गर्दीमध्ये कुणीही याबाबत काळजी घेताना दिसत नाही. स्वच्छतेचेही नियम पाळताना दिसत नाही.एकच प्लेट अनेकांनाविक्रेते प्लेटमध्ये पाणी देऊन गुपचूप खायला देतात आणि हीच प्लेट इतरांनाही पास केली जाते. एकाच प्लेटमध्ये वारंवार गुपचूप खाणे सुरू असते. दुकानदारही एकाच कपड्याने प्लेट पुसून दुसऱ्या ग्राहकाला देतो. अंतराचे पालन नाही, तोंडावर मास्क नाही आणि स्वच्छतेचाही आग्रह होत नाही. पाणीपुरी विक्रेतेसुद्धा ग्राहकांना नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरत नाहीत. अशा निष्काळजीपणामुळे एकमेकांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे पाणीपुरी विक्रेते कोरोनाचे वाहक ठरणार नाही का, असा सवाल करण्यात येत आहे. त्यामुळे एकतर पाणीपुरी विक्रेत्यांना नियमांचे पालन बंधनकारक करा किंवा चौकाचौकातील हे ठेले सक्तीने बंद करा, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर