शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

कार्यादेशादेपूर्वीच पाणंद रस्ते ; राजकीय वजन वापरून बीलही काढले

By गणेश हुड | Updated: May 17, 2024 22:04 IST

११ जणांच्या पॅनलच्या मर्जीने कामाचे वाटप : उपकंत्राटदारांकडून कामे

नागपूर : मातोश्री ग्रामसमृद्धी  पाणंद रस्ते योजना आरोपांच्या भोवऱ्यात अडकली आहे. कार्यादेश नसताना अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली. यासाठी मुरुमाचा वापर केला नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होणार असल्याने पाणंद रस्त्यांच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे कार्यादेश काढण्यापूर्वीच काही रस्त्यांची कामे करण्यात आली. एवढेच नव्हे तर राजकीय वजन वापरुन लाखो रुपयांची बिलेही काढली जात असल्याने ही योजना आरोपाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

पाणंद रस्त्यांच्या कामांच्या मोठयाप्रमाणात तक्रारी   असल्याने पाणंद रस्त्यांचे काम योग्य प्रकारे झाल्याबाबतचे आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे सहमती पत्र असल्यानंतर कामाचे बील काढण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व बांधकाम सभापती कुंदा राऊत यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  नागपूर  जिल्ह्यात मातोश्री शेतरस्त्याची २७६  कामांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ७०  कोटींचा निधी मंजूर आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ११ बड्या ठेकेदारांची समिती नियुक्त केली आहे. यातील काही सदस्य स्वत: पाणंद रस्त्यांचे ठेकेदार आहेत. घेतलेल्या कामासाठी उपकंत्राटदार नियुक्त केले आहेत. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. पाणंद रस्त्यांसदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी विचारात घेता पाणंद रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे  सहमती पत्र असल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराला बील देवू नका, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावण्यात आले. पॅनलला अधिकार अन् बांधकाम विभाग बघ्याच्या भूमिकेतजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची सक्षम यंत्रणा असताना या विभागाकडे पाणंद रस्त्याची कामे न देता  राजकीय नेत्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना पाणंद रस्त्यांची कामे मिळावी यासाठी ११ जणांचे पॅनल नियुक्त करण्यात आले. या पॅनलच्या माध्यमातून कामाला मंजुरी व निधी वाटप सुरू आहे.  पॅनलच्या माध्यमातून आपल्यालाच काम मिळणार असल्याचे गृहीत धरून काही ठेकेदारांनी या रस्त्यांची कामे केली.  दुसरीकडे यंत्रणा असूनही बांधकाम विभाकडे ही जबाबदारी दिली नाही. विभागाने बिलात आडकाठी आणू नये यासाठी राजकीय वजनाचा वापर सुरू आहे. अशा परिस्थितीत चांगल्या कामाची अपेक्षा कशी करणार असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :nagpurनागपूर