शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

घरांना रंग चढवणारे पेन्टर्स झाले बेरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 19:24 IST

कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा मार रोजगारावर, कुटूंबावर उपासमारीचे ओझेवर्षभर तरी काम मिळण्याची शक्यता नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यमवर्गावर हा मार जास्त पडत असल्याचे दिसून येते. हा वर्ग अतिशय स्वाभिमानी असल्याने स्थिती दयनीय आहे. घरादारांना रंगसाज चढवून चकचकीत करणारे पेन्टर्स मध्यमवर्गातच मोडतात. लॉकडाऊनमुळे किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भिती निर्माण झाली आहे.साधारणत: जानेवारी ते जून हा काळ पेण्टर्ससाठी अतिशय अनुकूल असतो. या काळात नविन बांधकामे झालेली असतात तर जुन्याच घरांवर नवीन रंगरंगोटी करण्यासाठी नागरिक उत्सुक असतात. मात्र, चिनपासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रसार भारतातही झाला आणि मार्च पासून संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला. इतर रोजगारांप्रमाणे पेन्टर्सही घरीच बसून राहिले. आॅर्डरप्रमाणे काम करावे आणि आपला पैसा घरी न्यावा, अशी दैनंदिनी असलेल्या या वर्गावर आता उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही म्हणून पैसाही नाही. असे जवळपास २५ हजार पेण्टर्स शहरात पुढे येणाºया संकटाशी झुंज देत आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि कधी उठेल याचा नेम नाही. लॉकडाऊन उठल्यावरही जिवनमान सुरळित होण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यातच पावसाळ्यात पेण्टिंग्जची कामे नसतात. दिवाळीत कामे निघत असली तरी यंदा उन्हाळ्याची तुट भरून काढण्यासाठीच नागरिकांचा प्रथम कल असेल. अशा स्थितीत पेण्टरवर्ग दयनिय अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. वर्षभर तरी पेण्टर्स वर्ग विनारोजगार असण्याची भिती निर्माण झाली आहे.पालकमंत्र्यांकडे दिले निवेदनपेण्टर्सच्या असंघटित कामगार संघटनेचे संयोजक रमेश नागदवणे यांनी ही दयनिय अवस्था नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. आम्ही परीश्रमी आहोत आणि कुणापुढे कधी हात पसरवत नाही. मात्र, शासनाने साथ दिली नाही तर भिक मागण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. गरीबांना शासन व इतर संघटना मदत पोहोचवत आहेत. मात्र, आमचे घर स्लॅबचे असल्याने आम्ही सधन असल्याचा भ्रम होतो. आम्ही सधन नसलो तरी थोडीफार प्रतिष्ठा आहे. तेव्हा पालकमंत्र्यांनी शासकीय योजनेतून प्रत्येक पेण्टर्सला या काळात दोन ते अडिच हजार रुपयाची मदत करावी, अशी मागणी रमेश नागदवणे यांच्यासह राजेश नागदवणे, सुरेश नागदवणे, शेखर डोंगरे, महिपाल ढवळे, दिनेश वर्मा, अनिल नंदेश्वर, बंटी हिरेखण, सुनिल वानखेडे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस