शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

By नरेश डोंगरे | Updated: April 27, 2025 03:06 IST

विशिष्ट ट्रेनची एक्स्कॉर्टींग, अनेक गाड्यांमध्ये सशस्त्र जवाने तैनात

नागपूर : पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना सर्वत्र सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेला अलर्ट जारी करण्यात आला असून, रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना अतिसतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामला केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या क्रूरतेचा निषेध केला जात आहे. या घटनेनंतर सिमेवर युद्धसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे 'रेल्वेत घातपात घडवून आणण्याचा संशय' निर्माण झाल्यामुळे सर्वत्र अलर्ट देण्यात आला आहे. अतिसतर्कता बाळगा, सूक्ष्म नजर ठेवा आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करा, असे या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या विविध विभागात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दलाचे शिर्षस्थ आणि रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू झाले असून, सुरक्षेचा प्लॅनही चॉकआउट झाला आहे.या संबंधाने रेल्वेत कार्यरत प्रत्येकाला दक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांवर आणि प्रत्येक ट्रेनमध्येही मोठ्या संख्येत खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय करण्यात आले आहे. फलाटावरच्या सीसीटीव्हीवर नजर रोखण्यात आली असून, प्रत्येक घडामोडी डोळ्यात तेल टाकून टिपण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्थानकाबाहेरही खबरे कामी लावण्यात आले आहे. महत्वाच्या मार्गावर धावण्यात येणाऱ्या 'ट्रेनचे एक्स्कॉर्टींग' सुरू करण्यात आले आहे.

ट्रॅक मॅनसह अनेकांना विशेष खबरदारीचे आदेश -आम्ही आमच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोज ब्रिफिंग करीत असून, प्रत्येक बारिक सारिक घडामोडीचे अपडेट एकमेकांना कळवित असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी 'लोकमत'ला दिली. ट्रॅक मॅनसह सर्व स्टाफला विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून, काही गाड्यांमध्ये अतिरिक्त सशस्त्र जवान तैनात करण्यात आल्याचेही आर्य यांनी आज सांगितले.

रेल्वे प्रवाशांच्या सूरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहोत. स्टेशन किंवा ट्रेनमध्ये तिकिट तपासणीस (टीसी), आरपीएफ, जीआरपीच्या जवानांना सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कुठेही कोणता संशयीत व्यक्ती अथवा सामान आढळल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन किंवा जवळ दिसणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी.- अमन मित्तल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला