शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

By नरेश डोंगरे | Updated: April 27, 2025 03:06 IST

विशिष्ट ट्रेनची एक्स्कॉर्टींग, अनेक गाड्यांमध्ये सशस्त्र जवाने तैनात

नागपूर : पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असताना सर्वत्र सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेला अलर्ट जारी करण्यात आला असून, रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना अतिसतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामला केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. जगभरातून या क्रूरतेचा निषेध केला जात आहे. या घटनेनंतर सिमेवर युद्धसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे 'रेल्वेत घातपात घडवून आणण्याचा संशय' निर्माण झाल्यामुळे सर्वत्र अलर्ट देण्यात आला आहे. अतिसतर्कता बाळगा, सूक्ष्म नजर ठेवा आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करा, असे या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या विविध विभागात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दलाचे शिर्षस्थ आणि रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मंथन सुरू झाले असून, सुरक्षेचा प्लॅनही चॉकआउट झाला आहे.या संबंधाने रेल्वेत कार्यरत प्रत्येकाला दक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांवर आणि प्रत्येक ट्रेनमध्येही मोठ्या संख्येत खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय करण्यात आले आहे. फलाटावरच्या सीसीटीव्हीवर नजर रोखण्यात आली असून, प्रत्येक घडामोडी डोळ्यात तेल टाकून टिपण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्थानकाबाहेरही खबरे कामी लावण्यात आले आहे. महत्वाच्या मार्गावर धावण्यात येणाऱ्या 'ट्रेनचे एक्स्कॉर्टींग' सुरू करण्यात आले आहे.

ट्रॅक मॅनसह अनेकांना विशेष खबरदारीचे आदेश -आम्ही आमच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोज ब्रिफिंग करीत असून, प्रत्येक बारिक सारिक घडामोडीचे अपडेट एकमेकांना कळवित असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी 'लोकमत'ला दिली. ट्रॅक मॅनसह सर्व स्टाफला विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असून, काही गाड्यांमध्ये अतिरिक्त सशस्त्र जवान तैनात करण्यात आल्याचेही आर्य यांनी आज सांगितले.

रेल्वे प्रवाशांच्या सूरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहोत. स्टेशन किंवा ट्रेनमध्ये तिकिट तपासणीस (टीसी), आरपीएफ, जीआरपीच्या जवानांना सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कुठेही कोणता संशयीत व्यक्ती अथवा सामान आढळल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईन किंवा जवळ दिसणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी.- अमन मित्तल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला