शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाडवा भोवला; १०० हून अधिक बसेस उभ्या: कंडक्टर व चालकांची सामूहिक दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:07 IST

पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या.

ठळक मुद्देआपली बसला लाखोंचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या. शहरातील अनेक मार्गावरील बसफेऱ्या बंद होत्या. यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.आपली बसच्या ताफ्यात ३३७ मोठ्या रेड बसेस व ४२ मनी बसेस आहेत. परंतु यातील दररोज जवळपास ३६० बसेस धावतात तीन ऑपरेटरच्या माध्यमातून या बसेस चालविल्या जातात. बस कंडकटर व चालक उपलब्ध करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिगे्रटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टीम (डीआयएमटीएस) कंपनीकडे आहे. १५०० हून अधिक कंडक्टर व चालक आहेत. असे असतानाही शुक्रवारी कंडक्टर व चालक नसल्याने ४५ बसेस धावल्या नाही, तर शनिवारी जवळपास ११० बसेस उभ्या होत्या. यात मोठ्या बस सोबतच मिनी बसचाही समावेश होता. यामुळे सीताबर्डीहून पारडी, हिंगणा, गोधनी, बुटीबोरी, बहादुरा, डिफेन्स, वाडी व न्यू नरसाळा आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या कमी होती. यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले.गेल्या दोन वर्षात कंडक्टर व चालक नसल्याने अचानक बसेस बंद राहिल्याने महापालिकेला जवळपास सात कोटींचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. वारंवार दांडी मारूनही संबंधित कंडक्टरवर कारवाई होत नाही. संबंधित कंत्राटदारालाही जाब विचारला जात नसल्याने हा प्रकार सुरू आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक