शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पॅकेज फसवे; कर्जमाफीच हवी!

By admin | Updated: December 18, 2015 03:23 IST

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असल्याचे सांगत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे

विरोधकांची मागणी : राज्यपालांना भेटले विरोधकांचे शिष्टमंडळगणेश खवसे नागपूरमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज हे फसवे असल्याचे सांगत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेत कर्जमाफी देण्याबाबत शासनाला निर्देश द्यावे, अशी मागणी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी १० हजार ५१२ कोटी रुपयांचे पॅकेज विधानसभेत जाहीर केले. हे पॅकेज फसवे असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीच देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाने घेतली आहे. पॅकेज जाहीर केल्यानंतर हे सर्व विरोधक एकवटत राज्यपालांना गुरुवारी दुपारच्या सुमारास भेटले. कर्जमाफीची घोषणा करण्याबाबत शासनाला निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. याबाबत सांगताना सुनील तटकरे म्हणाले, आम्ही सर्व विरोधी पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे. हे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक विवंचनेत सापडला असून कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. यासाठी शासनाने कर्जमाफी करणे गरजेचे आहे, हे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, हे शासन शेतकरीविरोधी असून त्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणे-घेणे नाही. हे शासन जुन्याच योजना नव्या नावाने जनतेसमोर आणत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी होणे गरजेचे आहे. सातबारा कोरा झाल्याशिवाय त्यांना नव्याने कर्ज मिळणार नाही. त्यामुळे शासनाने कर्जमाफी करणे आवश्यक आहे, असे म्हणत शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन लढा देऊ, असे स्पष्ट केले.विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेली पॅकेजची घोषणा ही निव्वळ धूळफेक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा निधी एकत्रित करून त्यांनी हे पॅकेज जाहीर केले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुष्काळ हटविण्यासाठीही तातडीने उपाययोजना करावी. जिथे वीज नाही, तेथील वीज बिल माफ करणे हास्यास्पद आहे. संवेदना नसलेले हे सरकार शेतकरीविरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला.कायदा-सुव्यवस्थेचेही धिंडवडेराज्यात सध्या गुंडगिरी सुरू आहे. जळगावमध्ये गुरुवारी भरदिवसा न्यायालय परिसरात गुंडांनी एकाची हत्या केली. गेल्या वर्षभरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. ही गुन्हेगारी कमी करण्यात या शासनाला यश आले नाही. त्यातल्यात्यात अधिकारी आमचे ऐकत नाही, असे या शासनातील मंत्री सांगत सुटले आहेत. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, हेच यातून स्पष्ट होते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या राज्यात २००८ पेक्षाही भयावह स्थिती उद्भवली आहे. शेतमालाला योग्य भाव नाही, उत्पादनातही घट आली आहे. त्यामुळे अशास्थितीत शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचे जुने कर्ज ‘निल’ होत नाही तोपर्यंत त्यांना नव्याने कर्ज मिळणार नाही. ही भूमिका आम्ही घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेजची घोषणा केल्यानंतर आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.