शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
2
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्यूत्तर; किनी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
3
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
4
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
5
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
6
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
7
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
8
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
9
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
10
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
11
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
12
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
13
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
14
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
15
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
16
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
17
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
18
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
19
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
20
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 

गव्हावर हरभऱ्याची मात; नागपूर विभागात रबीचे नियोजन क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 9:39 AM

Nagpur News agriculture यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देचांगल्या पावसाचा परिणाम

मंगेश व्यवहारे

नागपूर : रब्बीचे मुख्य पीक गहू समजण्यात येते. परंतु यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, तळे, धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. त्याचा परिणाम म्हणून हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कृषी विभागाने यंदा नागपूर विभागातील रबीच्या पिकाचे ३७४४८२ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र १५५९९६.११ हेक्टर आहे तर गव्हाचे नियोजन १२१७८० हेक्टरवर केले आहे. साधारणत: रबीच्या हंगामात गव्हाची पेरणी अधिक होते. पण गेल्या काही वर्षापासून पॅटर्न बदलत आहे. राज्यातही रबीच्या हंगामात हरभरा मुख्य पिकाकडे वाटचाल करीत आहे.

कृषीतज्ज्ञांच्या मते यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. कारण २०१९ मध्ये कपाशीला समाधानकारक भाव मिळाला नाही. परंतु यंदा सलग दोन महिने सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीनवर येलो मोझॅक रोग, स्टेन फ्लाय किडीने अतिक्रमण केल्याने सोयाबीन पुरते नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभऱ्याकडे वाटचाल केली आहे.

- हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची कारणे

हरभऱ्याला मिळणारा चांगला हमीभाव

कमी खर्चाचे पीक

कमी पाण्यात चांगले पीक

यंदा झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल असल्यामुळे कोरडवाहून शेतकऱ्यांसाठी लाभदायक

 तसे गहू हे पंजाबचे मुख्य पीक आहे. गव्हाला साधारणत: १०० दिवसांची थंडी व ६ पाण्याची गरज असते तर दोन पाण्यात हरभऱ्याचे उत्पन्न येते. चांगला हमीभाव, कमी खर्च, जमिनीत असलेला ओलावा यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर कृषी आयुक्तालयाने सुद्धा कडधान्याची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी हरभऱ्याकडे वळले आहे.

डॉ.योगीराज जुमळे, कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती