शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गव्हावर हरभऱ्याची मात; नागपूर विभागात रबीचे नियोजन क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 09:40 IST

Nagpur News agriculture यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देचांगल्या पावसाचा परिणाम

मंगेश व्यवहारे

नागपूर : रब्बीचे मुख्य पीक गहू समजण्यात येते. परंतु यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, तळे, धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. त्याचा परिणाम म्हणून हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कृषी विभागाने यंदा नागपूर विभागातील रबीच्या पिकाचे ३७४४८२ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र १५५९९६.११ हेक्टर आहे तर गव्हाचे नियोजन १२१७८० हेक्टरवर केले आहे. साधारणत: रबीच्या हंगामात गव्हाची पेरणी अधिक होते. पण गेल्या काही वर्षापासून पॅटर्न बदलत आहे. राज्यातही रबीच्या हंगामात हरभरा मुख्य पिकाकडे वाटचाल करीत आहे.

कृषीतज्ज्ञांच्या मते यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. कारण २०१९ मध्ये कपाशीला समाधानकारक भाव मिळाला नाही. परंतु यंदा सलग दोन महिने सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीनवर येलो मोझॅक रोग, स्टेन फ्लाय किडीने अतिक्रमण केल्याने सोयाबीन पुरते नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभऱ्याकडे वाटचाल केली आहे.

- हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची कारणे

हरभऱ्याला मिळणारा चांगला हमीभाव

कमी खर्चाचे पीक

कमी पाण्यात चांगले पीक

यंदा झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल असल्यामुळे कोरडवाहून शेतकऱ्यांसाठी लाभदायक

 तसे गहू हे पंजाबचे मुख्य पीक आहे. गव्हाला साधारणत: १०० दिवसांची थंडी व ६ पाण्याची गरज असते तर दोन पाण्यात हरभऱ्याचे उत्पन्न येते. चांगला हमीभाव, कमी खर्च, जमिनीत असलेला ओलावा यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर कृषी आयुक्तालयाने सुद्धा कडधान्याची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी हरभऱ्याकडे वळले आहे.

डॉ.योगीराज जुमळे, कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती