शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

गव्हावर हरभऱ्याची मात; नागपूर विभागात रबीचे नियोजन क्षेत्र वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 09:40 IST

Nagpur News agriculture यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देचांगल्या पावसाचा परिणाम

मंगेश व्यवहारे

नागपूर : रब्बीचे मुख्य पीक गहू समजण्यात येते. परंतु यंदा कृषी विभागाने केलेल्या रबी हंगामाच्या नियोजनात गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसते आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी, तळे, धरणांमध्ये पाण्याचा साठा मुबलक आहे. त्याचा परिणाम म्हणून हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार आहे.

कृषी विभागाने यंदा नागपूर विभागातील रबीच्या पिकाचे ३७४४८२ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्यात हरभऱ्याचे क्षेत्र १५५९९६.११ हेक्टर आहे तर गव्हाचे नियोजन १२१७८० हेक्टरवर केले आहे. साधारणत: रबीच्या हंगामात गव्हाची पेरणी अधिक होते. पण गेल्या काही वर्षापासून पॅटर्न बदलत आहे. राज्यातही रबीच्या हंगामात हरभरा मुख्य पिकाकडे वाटचाल करीत आहे.

कृषीतज्ज्ञांच्या मते यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. कारण २०१९ मध्ये कपाशीला समाधानकारक भाव मिळाला नाही. परंतु यंदा सलग दोन महिने सातत्याने झालेल्या पावसामुळे सोयाबीनवर येलो मोझॅक रोग, स्टेन फ्लाय किडीने अतिक्रमण केल्याने सोयाबीन पुरते नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभऱ्याकडे वाटचाल केली आहे.

- हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची कारणे

हरभऱ्याला मिळणारा चांगला हमीभाव

कमी खर्चाचे पीक

कमी पाण्यात चांगले पीक

यंदा झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल असल्यामुळे कोरडवाहून शेतकऱ्यांसाठी लाभदायक

 तसे गहू हे पंजाबचे मुख्य पीक आहे. गव्हाला साधारणत: १०० दिवसांची थंडी व ६ पाण्याची गरज असते तर दोन पाण्यात हरभऱ्याचे उत्पन्न येते. चांगला हमीभाव, कमी खर्च, जमिनीत असलेला ओलावा यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. त्याचबरोबर कृषी आयुक्तालयाने सुद्धा कडधान्याची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी हरभऱ्याकडे वळले आहे.

डॉ.योगीराज जुमळे, कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती