शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:02 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मर केले बंद : १७९४९ शेतकऱ्यांनी भरले २१.५५ काेटी

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने जिल्ह्यातील ५००० शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे वीज कनेक्शन कापले. जवळपास ९२ हजार कृषिपंप कनेक्शनवर ४५० काेटी रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वीज कनेक्शन कापण्याचे पाऊल उचलून शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यादरम्यान एचव्हीडीसी कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मरही बंद करण्यात आले.

शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी पंप वीज धाेरण कार्यान्वित केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. या धाेरणानुसार मूळ थकबाकीच्या ५० टक्के भरल्यास व्याज आणि दंड माफ करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील १७९४९ शेतकऱ्यांनी २१.५५ काेटी रुपये भरून याेजनेचा लाभ घेतला आहे. याेजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी चालू बिल भरले नसल्यास त्यांची वीज धडाक्याने कापली जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फाॅर्मरच बंद करण्यात आल्याची माहिती आहे. 

महावितरणने याबाबत आकडे उपलब्ध केले नसले तरी ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यानंतरही दुरुस्त केले जात नसल्याचे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, नंतरच दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे एचडीव्हीसी अंतर्गत जिल्ह्यात २४०० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात आले आहेत. थकीत वसुली अभियानांतर्गत महावितरणने यातील ६१७ ट्रान्स्फाॅर्मर बंद केले.

सिंचनासाठी पाण्याची गरज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. पुढच्या १५ दिवसात कापूस व तुरीच्या पिकासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पाण्याविना पीक खराब हाेण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शेतकऱ्यांनाे वीज बिल भरा : महावितरण

महावितरणचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी, कंपनीची आर्थिक स्थिती बिघडल्याने थकबाकी वसूल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी थकबाकी भरून कंपनीला सहकार्य करावे, जेणेकरून राज्यात वीजपुरवठा अबाधित राहील. शेतकऱ्यांनी महाकृषी पंप वीज धाेरणाचा लाभ घेऊन स्वत:ला थकबाकीमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीGovernmentसरकार