शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:02 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मर केले बंद : १७९४९ शेतकऱ्यांनी भरले २१.५५ काेटी

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने जिल्ह्यातील ५००० शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे वीज कनेक्शन कापले. जवळपास ९२ हजार कृषिपंप कनेक्शनवर ४५० काेटी रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वीज कनेक्शन कापण्याचे पाऊल उचलून शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यादरम्यान एचव्हीडीसी कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मरही बंद करण्यात आले.

शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी पंप वीज धाेरण कार्यान्वित केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. या धाेरणानुसार मूळ थकबाकीच्या ५० टक्के भरल्यास व्याज आणि दंड माफ करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील १७९४९ शेतकऱ्यांनी २१.५५ काेटी रुपये भरून याेजनेचा लाभ घेतला आहे. याेजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी चालू बिल भरले नसल्यास त्यांची वीज धडाक्याने कापली जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फाॅर्मरच बंद करण्यात आल्याची माहिती आहे. 

महावितरणने याबाबत आकडे उपलब्ध केले नसले तरी ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यानंतरही दुरुस्त केले जात नसल्याचे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, नंतरच दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे एचडीव्हीसी अंतर्गत जिल्ह्यात २४०० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात आले आहेत. थकीत वसुली अभियानांतर्गत महावितरणने यातील ६१७ ट्रान्स्फाॅर्मर बंद केले.

सिंचनासाठी पाण्याची गरज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. पुढच्या १५ दिवसात कापूस व तुरीच्या पिकासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पाण्याविना पीक खराब हाेण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शेतकऱ्यांनाे वीज बिल भरा : महावितरण

महावितरणचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी, कंपनीची आर्थिक स्थिती बिघडल्याने थकबाकी वसूल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी थकबाकी भरून कंपनीला सहकार्य करावे, जेणेकरून राज्यात वीजपुरवठा अबाधित राहील. शेतकऱ्यांनी महाकृषी पंप वीज धाेरणाचा लाभ घेऊन स्वत:ला थकबाकीमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीGovernmentसरकार