शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:02 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मर केले बंद : १७९४९ शेतकऱ्यांनी भरले २१.५५ काेटी

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने जिल्ह्यातील ५००० शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे वीज कनेक्शन कापले. जवळपास ९२ हजार कृषिपंप कनेक्शनवर ४५० काेटी रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वीज कनेक्शन कापण्याचे पाऊल उचलून शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यादरम्यान एचव्हीडीसी कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मरही बंद करण्यात आले.

शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी पंप वीज धाेरण कार्यान्वित केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. या धाेरणानुसार मूळ थकबाकीच्या ५० टक्के भरल्यास व्याज आणि दंड माफ करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील १७९४९ शेतकऱ्यांनी २१.५५ काेटी रुपये भरून याेजनेचा लाभ घेतला आहे. याेजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी चालू बिल भरले नसल्यास त्यांची वीज धडाक्याने कापली जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फाॅर्मरच बंद करण्यात आल्याची माहिती आहे. 

महावितरणने याबाबत आकडे उपलब्ध केले नसले तरी ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यानंतरही दुरुस्त केले जात नसल्याचे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, नंतरच दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे एचडीव्हीसी अंतर्गत जिल्ह्यात २४०० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात आले आहेत. थकीत वसुली अभियानांतर्गत महावितरणने यातील ६१७ ट्रान्स्फाॅर्मर बंद केले.

सिंचनासाठी पाण्याची गरज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. पुढच्या १५ दिवसात कापूस व तुरीच्या पिकासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पाण्याविना पीक खराब हाेण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शेतकऱ्यांनाे वीज बिल भरा : महावितरण

महावितरणचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी, कंपनीची आर्थिक स्थिती बिघडल्याने थकबाकी वसूल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी थकबाकी भरून कंपनीला सहकार्य करावे, जेणेकरून राज्यात वीजपुरवठा अबाधित राहील. शेतकऱ्यांनी महाकृषी पंप वीज धाेरणाचा लाभ घेऊन स्वत:ला थकबाकीमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीGovernmentसरकार