शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 11:02 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देएचव्हीडीएस कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मर केले बंद : १७९४९ शेतकऱ्यांनी भरले २१.५५ काेटी

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने जिल्ह्यातील ५००० शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे वीज कनेक्शन कापले. जवळपास ९२ हजार कृषिपंप कनेक्शनवर ४५० काेटी रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वीज कनेक्शन कापण्याचे पाऊल उचलून शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यादरम्यान एचव्हीडीसी कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मरही बंद करण्यात आले.

शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी पंप वीज धाेरण कार्यान्वित केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. या धाेरणानुसार मूळ थकबाकीच्या ५० टक्के भरल्यास व्याज आणि दंड माफ करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील १७९४९ शेतकऱ्यांनी २१.५५ काेटी रुपये भरून याेजनेचा लाभ घेतला आहे. याेजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी चालू बिल भरले नसल्यास त्यांची वीज धडाक्याने कापली जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फाॅर्मरच बंद करण्यात आल्याची माहिती आहे. 

महावितरणने याबाबत आकडे उपलब्ध केले नसले तरी ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यानंतरही दुरुस्त केले जात नसल्याचे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, नंतरच दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे एचडीव्हीसी अंतर्गत जिल्ह्यात २४०० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात आले आहेत. थकीत वसुली अभियानांतर्गत महावितरणने यातील ६१७ ट्रान्स्फाॅर्मर बंद केले.

सिंचनासाठी पाण्याची गरज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. पुढच्या १५ दिवसात कापूस व तुरीच्या पिकासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पाण्याविना पीक खराब हाेण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शेतकऱ्यांनाे वीज बिल भरा : महावितरण

महावितरणचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी, कंपनीची आर्थिक स्थिती बिघडल्याने थकबाकी वसूल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी थकबाकी भरून कंपनीला सहकार्य करावे, जेणेकरून राज्यात वीजपुरवठा अबाधित राहील. शेतकऱ्यांनी महाकृषी पंप वीज धाेरणाचा लाभ घेऊन स्वत:ला थकबाकीमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीGovernmentसरकार