शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

अतिवृष्टी व पुरामुळे २६ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:22 IST

अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर जिल्ह्यातील सरासरी २६ हजार ९० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ हजार ६५८ बाधित शेतकरी आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात सरासरी ११५.१२ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सरासरी २६ हजार ९० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ हजार ६५८ बाधित शेतकरी आहेत. जिल्ह्यात जुलै व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे उमरेड भिवापूर, कुही, कामठी आदी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीसंदर्भात सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.अतिवृष्टी व पुरामुळे ३१ जुलै रोजी भिवापूर व उमरेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार २ कोटी ७२ लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले क्षेत्र, शेतकरी व नुकसानीपोटी आवश्यक असलेल्या निधीबाबत संयुक्त सर्वेक्षण सुरू आहे.जिल्ह्यात ३१ जुलै रोजी भिवापूर तालुक्यात १३९ मि.मी., उमरेड १३५.०३ मिमी तर नागपूर ग्रामीणमध्ये ८७ मिमी. पावसाची नोंद २४ तासांत झाली होती. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील ३ हजारपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी भिवापूर तालुक्यात २९० मि. मी., कुही १४३ मि.मी., उमरेड ११९ मि.मी. तर कामठी तालुक्यात १०३ मि.मी. पाऊस पडला.अतिवृष्टी व पुरामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सात व्यक्ती मृत झाल्या असून मृत व्यक्तींच्या वारसांना २० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. याच काळात ८२ जनावरे दगावली असून मदतीपोटी ४ लाख ९१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ३३३ घरांचे नुकसान झाले आहे.गेल्यावर्षीेच्या नुकसानभरपाईच्या निधीचे वाटपमागील वर्षाच्या खरीप हंगामाचे दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने काटोल, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील ८० हजार ४३१ शेतकऱ्यांना ५४ कोटी ५६ लक्ष रुपये तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील २८ हजार ५९५ शेतकऱ्यांना ३१ कोटी ३० लक्ष ८६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमीन वाहून तसेच खरडून गेलेल्या जमिनीच्या क्षेत्रासाठी ८३८ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख ९३२ हजार रुपयांचे तसेच याच कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी २ हजार ६८३ शेतकऱ्यांना ९४ लाख ८६ हजार रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीतील बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपाचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसfloodपूर