शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी व पुरामुळे २६ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:22 IST

अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर जिल्ह्यातील सरासरी २६ हजार ९० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ हजार ६५८ बाधित शेतकरी आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात सरासरी ११५.१२ टक्के पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सरासरी २६ हजार ९० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये ६ हजार ६५८ बाधित शेतकरी आहेत. जिल्ह्यात जुलै व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे उमरेड भिवापूर, कुही, कामठी आदी तालुक्यात पिकांचे नुकसान झाले असून नुकसानीसंदर्भात सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.अतिवृष्टी व पुरामुळे ३१ जुलै रोजी भिवापूर व उमरेड तालुक्यात झालेल्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार २ कोटी ७२ लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले क्षेत्र, शेतकरी व नुकसानीपोटी आवश्यक असलेल्या निधीबाबत संयुक्त सर्वेक्षण सुरू आहे.जिल्ह्यात ३१ जुलै रोजी भिवापूर तालुक्यात १३९ मि.मी., उमरेड १३५.०३ मिमी तर नागपूर ग्रामीणमध्ये ८७ मिमी. पावसाची नोंद २४ तासांत झाली होती. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील ३ हजारपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ७ सप्टेंबर रोजी भिवापूर तालुक्यात २९० मि. मी., कुही १४३ मि.मी., उमरेड ११९ मि.मी. तर कामठी तालुक्यात १०३ मि.मी. पाऊस पडला.अतिवृष्टी व पुरामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सात व्यक्ती मृत झाल्या असून मृत व्यक्तींच्या वारसांना २० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. याच काळात ८२ जनावरे दगावली असून मदतीपोटी ४ लाख ९१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ३३३ घरांचे नुकसान झाले आहे.गेल्यावर्षीेच्या नुकसानभरपाईच्या निधीचे वाटपमागील वर्षाच्या खरीप हंगामाचे दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने काटोल, नरखेड व कळमेश्वर तालुक्यातील ८० हजार ४३१ शेतकऱ्यांना ५४ कोटी ५६ लक्ष रुपये तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील २८ हजार ५९५ शेतकऱ्यांना ३१ कोटी ३० लक्ष ८६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमीन वाहून तसेच खरडून गेलेल्या जमिनीच्या क्षेत्रासाठी ८३८ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख ९३२ हजार रुपयांचे तसेच याच कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी २ हजार ६८३ शेतकऱ्यांना ९४ लाख ८६ हजार रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. नैसर्गिक आपत्तीतील बाधित शेतकऱ्यांना निधी वाटपाचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसfloodपूर