शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

टिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:27 IST

sanctuary in Tipeshwar,Yawatmal News तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे.

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील वाघाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्यांचे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. त्याचप्रमाणे तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे. अन्नसाखळी तुटल्यामुळेच हे वाघ अभयारण्याबाहेर पडत असल्याचे बोलले जात आहे.१५ हजार हेक्टरमध्ये विस्तारलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघांनी तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांना नेहमीच दहशतीखाली ठेवले आहेत. अभयारण्याला लागून असलेल्या शेतजमिनीच्या शेतमालकांना, शेतमजुरांना व सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: रडकुंडीस आणले आहे. वाघ व मानवामधील संघर्षामधे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष सतत वाढतच आहे. त्यामुळे वन्यजीव व मानवामधील संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलणे महत्वाचे आहे. तालुक्यातील टिपेश्वर या जंगलाला सन १९८७ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर टिपेश्वरमधील मारेगाव वन या गावाचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली झाल्या. बऱ्याच कालावधीनंतर गावकऱ्यांमध्ये वाटाघाटी होऊन मारेगाव वन या गावाचे पुनर्वसन करण्यात आले.

टिपेश्वरच्या जंगलामध्ये इतर वन्यप्राण्यांसह पट्टेदार वाघाचाही वावर होता. जंगलातील गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर अभयारण्याचे कामही वाढले. वाघांची संख्याही झपाट्याने वाढायला लागली.आजमितीस टिपेश्वर अभयारण्यात एकूण २० वाघ आहेत. यामध्ये सात मोठे वयस्कर वाघ, १० वयस्क होण्याच्या मार्गावर असलेले वाघ व तीन बछड्यांचा समावेश आहे. १५ हजार हेक्टर जागेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात जास्तीत जास्त सात-आठ वाघ राहू शकतात. परंतु ही संख्या आजच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. वाघाच्या संख्येच्या मानाने टिपेश्वर अभयारण्यातील जागा ही अतिशय कमी पडत आहे. त्यामुळेसुद्धा वाघ अभयारण्याबाहेर पडत असून वन्यप्राणी व मानवामध्ये संघर्ष वाढत आहे.

अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणावर गावे लागून असल्याने या गावातील शेतशिवारामध्ये अभयारण्यातील रानडुकरे, हरिण, रोही आदी प्राणी शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करित आहे. आता या प्राण्यापाठोपाठ वाघांनीही धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. या वाघांना अभयारण्यात आपले भक्ष मिळत नसल्यामुळे ते सरळ गावशिवारात शिरतात. त्यामुळेच वाघाद्वारे जनावरांच्या व मानवांच्या शिकारीत वाढत होत आहे.लाखो रूपयांचा निधी जातो तरी कुठे?टिपेश्वर अभयारण्यातील वाघ व इतर प्राण्यांच्या पाणी व त्यांच्या शिकारीसाठी इतर महत्वाच्या व उपयुक्त कामासाठी तसेच प्राण्यांच्या सुविधेसाठी अभयारण्य प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होत असते. परंतु या निधीतून प्राण्यांच्या सुविधेसाठी व इतर उपाययोजनेसाठी किती खर्च केला जातो, हा संशोधनाचा विषय आहे. आतापर्यंत कोटयवधी रूपयांचा निधी खर्च करूनही अभयारण्यातील वाघांकरिता पुरेसे पाणी, शिकार व खाद्याची उत्पत्ती अभयारण्य प्रशासन करू शकले नाही, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :Tigerवाघ