शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
2
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
3
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
4
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
5
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
6
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
7
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
8
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
9
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
10
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
11
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
12
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
13
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
14
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
15
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
16
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
17
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
18
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
19
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
20
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप

टिपेश्वरमधील वाघ अभयारण्याबाहेर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:27 IST

sanctuary in Tipeshwar,Yawatmal News तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे.

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यातील वाघाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्यांचे अधिवास क्षेत्र कमी पडत आहे. त्याचप्रमाणे तृणभक्षी प्राणी अभयारण्यातून नजीकच्या शेतशिवारात शिरत असल्यामुळे त्यांच्यामागे वाघसुद्धा टिपेश्वर अभयारण्याबाहेर पडत आहे. अन्नसाखळी तुटल्यामुळेच हे वाघ अभयारण्याबाहेर पडत असल्याचे बोलले जात आहे.१५ हजार हेक्टरमध्ये विस्तारलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघांनी तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांना नेहमीच दहशतीखाली ठेवले आहेत. अभयारण्याला लागून असलेल्या शेतजमिनीच्या शेतमालकांना, शेतमजुरांना व सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: रडकुंडीस आणले आहे. वाघ व मानवामधील संघर्षामधे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष सतत वाढतच आहे. त्यामुळे वन्यजीव व मानवामधील संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलणे महत्वाचे आहे. तालुक्यातील टिपेश्वर या जंगलाला सन १९८७ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर टिपेश्वरमधील मारेगाव वन या गावाचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली झाल्या. बऱ्याच कालावधीनंतर गावकऱ्यांमध्ये वाटाघाटी होऊन मारेगाव वन या गावाचे पुनर्वसन करण्यात आले.

टिपेश्वरच्या जंगलामध्ये इतर वन्यप्राण्यांसह पट्टेदार वाघाचाही वावर होता. जंगलातील गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर अभयारण्याचे कामही वाढले. वाघांची संख्याही झपाट्याने वाढायला लागली.आजमितीस टिपेश्वर अभयारण्यात एकूण २० वाघ आहेत. यामध्ये सात मोठे वयस्कर वाघ, १० वयस्क होण्याच्या मार्गावर असलेले वाघ व तीन बछड्यांचा समावेश आहे. १५ हजार हेक्टर जागेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात जास्तीत जास्त सात-आठ वाघ राहू शकतात. परंतु ही संख्या आजच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. वाघाच्या संख्येच्या मानाने टिपेश्वर अभयारण्यातील जागा ही अतिशय कमी पडत आहे. त्यामुळेसुद्धा वाघ अभयारण्याबाहेर पडत असून वन्यप्राणी व मानवामध्ये संघर्ष वाढत आहे.

अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणावर गावे लागून असल्याने या गावातील शेतशिवारामध्ये अभयारण्यातील रानडुकरे, हरिण, रोही आदी प्राणी शिरून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करित आहे. आता या प्राण्यापाठोपाठ वाघांनीही धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. या वाघांना अभयारण्यात आपले भक्ष मिळत नसल्यामुळे ते सरळ गावशिवारात शिरतात. त्यामुळेच वाघाद्वारे जनावरांच्या व मानवांच्या शिकारीत वाढत होत आहे.लाखो रूपयांचा निधी जातो तरी कुठे?टिपेश्वर अभयारण्यातील वाघ व इतर प्राण्यांच्या पाणी व त्यांच्या शिकारीसाठी इतर महत्वाच्या व उपयुक्त कामासाठी तसेच प्राण्यांच्या सुविधेसाठी अभयारण्य प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होत असते. परंतु या निधीतून प्राण्यांच्या सुविधेसाठी व इतर उपाययोजनेसाठी किती खर्च केला जातो, हा संशोधनाचा विषय आहे. आतापर्यंत कोटयवधी रूपयांचा निधी खर्च करूनही अभयारण्यातील वाघांकरिता पुरेसे पाणी, शिकार व खाद्याची उत्पत्ती अभयारण्य प्रशासन करू शकले नाही, ही शोकांतिका आहे.

टॅग्स :Tigerवाघ