शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हमारा गाव, हमारा राज!

By admin | Updated: June 23, 2014 01:20 IST

आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन

आदिवासी निर्धार मेळावा : मधुकर पिचड यांचे आवाहननागपूर : आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी केले.आदिवासी समाज संयुक्त कृती समितीतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आदिवासी निर्धार व प्रबोधन मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात पिचड बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, केवलराम काळे आदी उपस्थित होते.मागासलेपणा व संस्कृती या आधारावर घटनेने आदिवासींना आरक्षण दिले आहे. आरक्षण देताना प्रत्येक राज्याची परिस्थिती व संस्कृती विचारात घेतली जाते. कर्नाटक व केरळ राज्यात मराठा समाजाचा आदिवासीत समावेश आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश आहे. या आधारावर त्यांना महाराष्ट्रात आरक्षण देणार का? असा सवाल पिचड यांनी केला.आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. परंतु आदिवासींच्या आरक्षणात दुसऱ्यांचा वाटा आम्ही खपवून घेणार नाही. आदिवासी पेटला तर महाराष्ट्रही पेटेल याचा राज्यातील ७८ विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल, असा इशारा पिचड यांनी दिला. मताच्या राजकारणासाठी आदिवासींचा बळी देऊ नका, बोगस आदिवासींचे अतिक्र मण थोपविण्यासाठी आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाच्या हक्कासाठी आम्ही प्राणांचीही पर्वा करणार नाही. वाट्याला जाणाऱ्यावर आदिवासींचे हात उठतील असा इशारा वसंत पुरके यांनी दिला. देशात दहा कोटी तर राज्यात सव्वाकोटी आदिवासी आहे. लोकसंख्येचा विचार करता आदिवासींना १० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. २२ जातींचा आदिवासीत समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहे. याऐवजी त्यांनी वेगळ्या सवलती मागण्याला आमचा विरोध नाही. आदिवासी हक्कासाठी संघटित होणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नसल्याचे शिवाजीराव मोघे म्हणाले.काही राजकीय नेते बोगस आदिवासींना आरक्षणाचे आश्वासन देत आहेत. याचा समाजाने विरोध करावा, असे आवाहन पद्माकर वळवी यांनी केले. मारोतराव क ोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेव उसेंडी, केवलराम काळे यांच्यासह माजी महापौर माया इवनाते, पुष्पाताई आत्राम, सुखदेव पारधी, दिलीप मडावी, ज्ञानेश्वर मडावी, मणिराम मडावी आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला आदिवासी संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)