शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

हमारा गाव, हमारा राज!

By admin | Updated: June 23, 2014 01:20 IST

आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन

आदिवासी निर्धार मेळावा : मधुकर पिचड यांचे आवाहननागपूर : आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी केले.आदिवासी समाज संयुक्त कृती समितीतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आदिवासी निर्धार व प्रबोधन मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात पिचड बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, केवलराम काळे आदी उपस्थित होते.मागासलेपणा व संस्कृती या आधारावर घटनेने आदिवासींना आरक्षण दिले आहे. आरक्षण देताना प्रत्येक राज्याची परिस्थिती व संस्कृती विचारात घेतली जाते. कर्नाटक व केरळ राज्यात मराठा समाजाचा आदिवासीत समावेश आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश आहे. या आधारावर त्यांना महाराष्ट्रात आरक्षण देणार का? असा सवाल पिचड यांनी केला.आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. परंतु आदिवासींच्या आरक्षणात दुसऱ्यांचा वाटा आम्ही खपवून घेणार नाही. आदिवासी पेटला तर महाराष्ट्रही पेटेल याचा राज्यातील ७८ विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल, असा इशारा पिचड यांनी दिला. मताच्या राजकारणासाठी आदिवासींचा बळी देऊ नका, बोगस आदिवासींचे अतिक्र मण थोपविण्यासाठी आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाच्या हक्कासाठी आम्ही प्राणांचीही पर्वा करणार नाही. वाट्याला जाणाऱ्यावर आदिवासींचे हात उठतील असा इशारा वसंत पुरके यांनी दिला. देशात दहा कोटी तर राज्यात सव्वाकोटी आदिवासी आहे. लोकसंख्येचा विचार करता आदिवासींना १० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. २२ जातींचा आदिवासीत समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहे. याऐवजी त्यांनी वेगळ्या सवलती मागण्याला आमचा विरोध नाही. आदिवासी हक्कासाठी संघटित होणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नसल्याचे शिवाजीराव मोघे म्हणाले.काही राजकीय नेते बोगस आदिवासींना आरक्षणाचे आश्वासन देत आहेत. याचा समाजाने विरोध करावा, असे आवाहन पद्माकर वळवी यांनी केले. मारोतराव क ोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेव उसेंडी, केवलराम काळे यांच्यासह माजी महापौर माया इवनाते, पुष्पाताई आत्राम, सुखदेव पारधी, दिलीप मडावी, ज्ञानेश्वर मडावी, मणिराम मडावी आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला आदिवासी संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)