शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

-तर देशाची फाळणी झाली असती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:30 IST

१९७९ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी पंजाबमध्ये  दहशतवादी  जर्नेलसिंह भिंद्रानवाले याची दहशत निर्माण झाली होती.  वेगळे  खलिस्तान राज्य स्थापन करण्याचा त्याचा डाव होता.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवारांनी उलगडला जीवनपट : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत नागपूर : १९७९ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी पंजाबमध्ये  दहशतवादी  जर्नेलसिंह भिंद्रानवाले याची दहशत निर्माण झाली होती.  वेगळे  खलिस्तान राज्य स्थापन करण्याचा त्याचा डाव होता. परंतु इंदिरा गांधी  यांनी  आॅपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय  घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. मंदिरातील ‘अकालतख्त’ लष्कराने उद्ध्वस्त केले.  लष्करी कारवाईचा धाडसी निर्णय घेतला नसता तर देशाची फाळणी झाली असती, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी रविवारी येथे केले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर  आयोजित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात ‘इंदिराजींचा क्रांतिकारी जीवनपट’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना द्वादशीवार म्हणाले,  देश एकसंघ ठेवायचा असेल तर इंदिरा गांधी यांच्या मार्गावरून जाण्याची गरज आहे.  आणीबाणीत इंदिराजींच्या तुरुंगात मी होतो. विरोधी पक्षाचेही नेते होते. सहा महिन्यांनी इंदिराजी आनंदवनात आल्या. त्यांचे स्वागत करताना अंध मुलाने त्यांना दिवा दिला. त्यावर ‘जिसके आँखो में रोशनी नही, उसने दिया दिया’. असे सूचक उद्गार काढले. हे मातृत्वाचे लक्षण आहे. २००२ मध्ये बीबीसीने सहस्रातील सर्वश्रेष्ठ महिला म्हणून  इंदिरा गांधी यांच्यावर शिक्कामोर्तब केले तर अमेरिकेतील एका नियतकालिकाने महात्मा गांधी यांचा जगातील सर्वात मोठी व्यक्ती म्हणून उल्लेख केला. जगातील सर्वात मोठे पुरुष व आई आपल्या देशात आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे द्वादशीवार म्हणाले. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून त्यावर गरीब माणसांचे नियंत्रण आणले होते. आता सत्ताधारी गरिबांनाच हटवत आहेत. बांगला देशाला स्वातंत्र्य बहाल करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. इंदिरा गांधी यांना देशाचा इतिहास माहीत होता. नेहरूजींनी त्यांना इतिहासाचे दोन हजार पानांचे पुस्तक दिले होते, असे द्वादशीवार म्हणाले.  कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके, एस.क्यू. जामा, अनंतराव घारड, केशवराव शेंडे, धनंजय धार्मिक, शेख हुसैन, अ‍ॅड. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, संजय महाकाळकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. बाळ कुळकर्णी यांनी संचालन  तर आभार विशाल मुत्तेमवार यांनी मानले. सूर संगमच्या पथकाने देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.देशात अघोषित आणीबाणीइंदिरा गांधी यांनी घटनेतील कायद्यानुसार आणीबाणी आणली होती. परंतु आता दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडून  त्यांना ठार केले जाते. गाईचे मांस आहे, म्हणून मारले जाते. लाजेखातर आरोपीवर बक्षीस जाहीर केले जाते पण आरोपीं मिळत नाही. देशात अशी अघोषित आणीबाणी आहे. असे राज्यकर्ते इंग्रजही नव्हते. लोकशाहीवाद्यांनी या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे सुरेश द्वादशीवार म्हणाले.