शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशभरातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे देशभरातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेदेखील त्यात उडी घेतली आहे. दोन महिन्याच्या अवधीत दुसऱ्यांदा केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. जर खाद्य तेलांचे आयात शुल्क वाढविण्यात आले नाही तर पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत दिल्लीत येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशाराच केंद्र शासनाला देण्यात आला आहे.

सणासुदीच्या कालावधीत खाद्य तेलांच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे केंद्र शासनातर्फे २७ नोव्हेंबर रोजी खाद्य तेलांवरील आयात शुल्क ४१ टक्क्यांवरून ३० टक्के इतके कमी करण्यात आले. यामुळे ग्राहकांना खाद्य तेल सात रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मात्र शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्रानेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. आता शेतकऱ्यांनी ते उत्पादन घेतले असताना आयात शुल्क कमी झाल्याने बाहेरचा माल सहजपणे देशात येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळणार, असा प्रश्न किसान संघातर्फे उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णयाचा केंद्र शासनाने पुनर्विचार करीत आयात शुल्क ५० टक्के करावे. जर असे झाले नाही तर पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबतच किसान संघालादेखील जुळावे लागेल, अशी भूमिका किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आखरे यांनी मांडली आहे.

कसे बनणार शेतकरी आत्मनिर्भर?

देशात दरवर्षी ९० हजार कोटी रुपयाचे खाद्य तेल आयात करण्यात येते. आयात करण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्राने शेतकऱ्यांनी तेलबियांचे उत्पादन वाढवावे यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. केंद्राच्या अशा भूमिकेमुळे शेतकरी आत्मनिर्भर कसे बनणार, असा सवाल भारतीय किसान संघातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

दोन महिन्यात दुसऱ्यांदा विरोध

भारतीय किसान संघाने दोन महिन्यात केंद्राच्या धोरणांना दुसऱ्यांदा विरोध केला आहे. संसदेत कृषी विधेयके संमत झाल्यानंतर किसान संघाने सार्वजनिकपणे केंद्रावर टीकास्त्र सोडले होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील त्यांच्या विजयादशमीच्या भाषणात कृषी स्वावलंबन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करत केंद्राच्या कृषी धोरणांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.