शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे २४ व २५ ला आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:29 IST

नागपुरात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देडॉ. वि.स. जोग अध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. वि. स. जोग हे संमेलनाचे अध्यक्ष राहणार आहेत. आयोजन समितीच्या कांचनताई गडकरी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल येथे आयोजित साहित्य संंमेलनाचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उदघाट्न करण्यात येईल. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या संमेलनाचे उदघाट्न करणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित राहतील. तत्पूर्वी सकाळी १० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. स्वा. सावरकरांच्या विचारातील सार्थकतेचा शोध घेऊन नव्या भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा घेण्यास्तव हे दोन दिवसीय वाड्मयीन विचारमंथन होणार असल्याचे त्या म्हणाल्या. दुपारी २ वाजता ‘सावरकरांचे वाड्मयविश्व’ या परिसंवादाने विचारमंथनाला सुरुवात होणार आहे.प्रसिद्ध साहित्यिक व कलावंत डॉ. वीणा देव या परिसंवादाच्या अध्यक्ष राहणार असून प्रकाश एदलाबादकर, डॉ. श्याम धोंड व तीर्थराज कापगते हे विचार मांडतील. त्यानंतर ‘एकात्मता, समरसता व सावरकर’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाची मैफिल सजणार आहे.२५ फेब्रुवारीला प्रेरणा लांबे यांच्या ‘मी येसू बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाने दुसऱ्या दिवशीचे सत्र सुरू होईल. त्यानंतर विविध विषयावर परिसंवाद होतील. यादरम्यान शिवकथाकर विजयराव देशमुख यांचा सत्कार करण्यात येईल. प्रा. विवेक अलोणी यांनी संपादन केलेल्या ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकाचे विमोचन करण्यात येणार असल्याचे कांचन गडकरी यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव डॉ. अजय कुळकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन