शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हायकोर्टाचा आदेश : निवडणुकीची कामे टाळणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:13 IST

लोकसभा निवडणुकीची कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या कामांविरुद्ध चंद्रपूर, अकोला व गोंदिया येथील शाळा-महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या तीन रिट याचिका फेटाळून लावल्या.

ठळक मुद्देमहाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या याचिका फेटाळल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची कामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या कामांविरुद्ध चंद्रपूर, अकोला व गोंदिया येथील शाळा-महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या तीन रिट याचिका फेटाळून लावल्या.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्यांना वैयक्तिक आदेश जारी करून त्यांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे व त्याकरिता प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. उन्हाळी परीक्षा सुरू झाल्यामुळे निवडणुकीची कामे करणे अशक्य आहे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून निवडणुकीची कामे करता येणार नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाच्या नोटीसनंतर राज्य सरकारने उत्तर दाखल करून याचिकाकर्त्यांचे म्हणणे निरर्थक ठरवले. निवडणुकीमुळे शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळा-महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक वेळ सोडून निवडणूक कामांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे सरकारने उत्तरात स्पष्ट केले. त्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे, अ‍ॅड. अनुप ढोरे व अ‍ॅड. ए. आय. शेख, राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज पाटील व अ‍ॅड. विनोद ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक