शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:06 IST

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक : ११,४७,४६७ प्राधान्य गट - ६,४६,८६५ अंत्योदय - १,२१,७६५ केशरी - ३,७८,८३७ लोकमत न्यूज नेटवर्क ...

जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक : ११,४७,४६७

प्राधान्य गट - ६,४६,८६५

अंत्योदय - १,२१,७६५

केशरी - ३,७८,८३७

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाही आता सवलतीत धान्य मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील १,११,१४२ केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ३,९९,९४८ व्यक्तींना याचा लाभ मिळेल. जून महिन्यात याचे वाटप होईल.

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात २५ मे रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या अध्यादेशानुसार मागच्या वर्षी मे, जून आणि जुलै २०२० मध्ये शासनातर्फे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीत रेशन वितरित करण्यात आले होते. यात ८ रुपये किलोप्रमाणे गहू व १२ रुपये किलोप्रमाणे तांदूळ प्रति व्यक्ती देण्यात आले होते. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर धान्याचा कोटा उपलब्ध करून देण्यात आला होता. नंतर असे लक्षात आले की, यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये धान्य शिल्लक राहिले. त्यामुळे शिल्लक राहिलेले ते धान्य या वर्षी याच योजनेप्रमाणे वितरित करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बॉक्स

बीपीएलच्या ७,६८,४३० कुटुंबांना लाभ

नागपूर जिल्ह्यात ६,४६,८६५ प्राधान्य गट असलेले शिधापत्रिकाधारक तर १,२१,७६५ अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. यांनाच मोफत धान्य वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात असे एकूण ७ लाख ६८ हजार ४३० कुटुंबांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बॉक्स

केवळ ग्रामीण भाागातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाच लाभ

नागपूर जिल्ह्यात एकूण ३,७८,८३७ केशरी शिधापत्रिका असलेले कुटुंब आहेत. यापैकी शहरात २,६७,६९५ कुटुंबांकडे केशरी शिधापत्रिका आहे, तर ग्रामीण भागातील १,११,१४२ कुटुंबांकडे केशरी शिधापत्रिका आहे. यापैकी नागपूर शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांच्या धान्याचा कोटा मागच्याच वर्षी पूर्ण संपला. त्यामुळे नवीन आदेशानुसार शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. ग्रामीण भागातील ११०० मेट्रिक टन धान्याचे वाटप शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भाागातील केशरी कार्डधारकांना याचा लाभ मिळेल.

(बॉक्स)

काय मिळणार?

या योजनेनुसार केशरी शिधापत्रिकेवर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला

१ किलो गहू (८ रुपये किलोप्रमाणे) व १ किलो तांदूळ १२ रुपये किलोप्रमाणे मिळेल. जितके सदस्य असतील तितके धान्य दिले जाईल.

कोट

‘पहिले या, पहिले घ्या’

जिल्ह्यात ११०० मेट्रिक टन धान्याचे वाटप करावयाचे आहे. यापैकी ४२३ टन तांदूळ व ६७७ टन गहू आहे. धान्य संपल्यानंतर वाटप करता येणार नाही. ‘पहिले या, पहिले घ्या’, यानुसार त्याचे वितरण होईल. त्यामुळे केशरी शिधापत्रिकाधारकांनी आवर्जून आपले धान्य घेऊन जावे.

भास्कर तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी