शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऑरेंज फेस्टिव्हल; ७०० किलो संत्र्याचा असेल हलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 10:32 IST

लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ३ पासून विष्णू मनोहर संत्र्यापासून हलवा तयार करण्यास प्रारंभ करणार आहे.

ठळक मुद्देऑरेंज हलव्याची शेतकऱ्यांना ‘मेजवानी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्या पुढाकाराने ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चे चार दिवसीय आयोजन रेशीमबाग मैदानावर १८ जानेवारीपासून होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी ३ पासून विष्णू मनोहर संत्र्यापासून हलवा तयार करण्यास प्रारंभ करणार आहे. विष्णू मनोहर म्हणाले, ७०० किलो संत्र्याचा हलवा तयार करण्यात येणार आहे. पाककृती दुपारी ३ पासून सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहील. हलवा तयार करण्यासाठी २५०० संत्री, ५० किलो रवा, ५० किलो साखर, १५० किलो ऑरेंज क्रॅश (साखर व संत्र्याचा रसापासून तयार केलेला पाक), ५० किलो शुद्ध तूप, ५० लिटर दूध, १० किलो काजू आदी सामग्रीचा उपयोग होईल. हलवा तयार करण्यासाठी कराड येथून खास कढई मागविण्यात आली आहे. अ‍ॅल्युमिनियम धातूच्या कढईचे वजन १२० किलो असून ८ बाय ८ रुंद आणि ३ फूट खोल आहे. हलवा विशेष पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. प्रारंभी संपूर्ण संत्र्यातून बिया काढण्यात येणार आहे. यावेळी संत्र्याच्या सालीपासून मार्मटेड (जॅमसारखा एक प्रकार) तयार करण्यात येणार आहे. या पदार्थाला ब्रेडला लावून खाता येईल.हलव्याचे वाटप शेतकरी आणि लोकांना नि:शुल्क करण्यात येणार आहे. सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांनी मंचच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख मनोहर यांनी केला. विष्णू मनोहर यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रमाची नोंद आहे. वर्ष-२००२ मध्ये सखी मंचसोबत नागपुरात ५ बाय ५ फूट आकाराचा पराठा तयार केला होता.शिवाय नागपुरातच ९ फुटाचा कबाब, ५३ तासाचा कुकिंग रेकॉर्ड, ३ हजार किलो खिचडी आणि जळगांव येथे ३५०० किलो वांग्याचे भरीत, दिल्ली येथे ५ हजार किलोची खिचडी तयार केली होती. याशिवाय १० फेब्रुवारीला विष्णूजी की रसोई येथे सेंद्रीय भाज्या आणि सामग्रीपासून १५०० किलो करी तयार करणार आहेत.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल