शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आशावाद; शेतकरी आत्महत्या आणि पाल्यसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 08:00 IST

आमच्या निंभा गावात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. ही जमेची व अभिमानास्पद बाब आहे.

जयश्री दुधेनागपूर:यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातोय. शेतीबहुल असणारा जिल्हा असा ओळखला जावा हे निश्चितच भूषणावह नाही. नैसर्गिक आपदा व इतर काही कारणांनी उत्पादनात आलेली तूट शेतकऱ्यांंना निराश करणारी आहे व म्हणूनच येथील शेतकरी वैफल्यग्रस्त झालाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात आशा निर्माण करणे, त्यांचे मनोरंजन करणे व आपल्या उज्ज्वल भविष्याविषयी शेतकऱ्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे. अशा बिकट परिस्थितीत आत्यंतिक गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांच्या मनात त्यांची मुलेच हा आशावाद निर्माण करू शकतात. आपली लेकरं गुणवंत आहेत. त्यामुळे त्यांचे व आपलेही भविष्य सुरक्षित असून किमान या मुलांसाठी तरी आपण जगले पाहिजे, असा विचार पालकांच्या मनात निर्माण करणारा उपक्रम शाळेत राबवावयाचे ठरविले.हा, तुमचाही अनुभव असेल की, मुले जेव्हा शाळेत शिकलेली एखादी कविता, गाणे, पाढा असे काही म्हणून दाखवितात त्यावेळी पालक म्हणून तुम्हाला त्या पाल्याचा खूप अभिमान वाटतो. पाहुण्यांसमोर आपण जाणीवपूर्वक मुलांना ते म्हणायला लावतो. खरंतर हा उपक्रम राबविण्याची प्रेरणा मला माझ्या मुलीकडून मिळाली. ती दररोज सायंकाळी मला तिच्या शाळेत काय काय झाले ते सांगायची. तिच्या शाळेत शिकविलेली कविता, गाणे व इतर गोष्टी तिच्या तोंडून ऐकताना मला खूप बरे वाटायचे. दिवसभराचा थकवा पार कुठच्या कुठे पळून जायचा. तिचं सर्व ऐकून मुलीचं व पर्यायाने आपलेही भविष्य सुरक्षित असल्याचे समाधान वाटायचे. हेच समाधान आपण ज्या शाळेत काम करतो तेथील पालकांनाही मिळते किंवा नाही याची पडताळणी मी केली.मुले शाळेत काय शिकली, हे काही सूज्ञ पालक त्यांना घरी विचारत असतात. शहरी पालक आपल्या मुलांशी असा संवाद नियमित साधतात तर ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांशी असा संवाद साधतातच असे नाही हे माझ्या लक्षात आले. मुलांशी जाणीवपूर्वक शैक्षणिक संवाद साधणाऱ्या पालकांची संख्या ग्रामीण भागात फार थोडी असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. पालकांचा मुलांशी व मुलांचा पालकांशी सहज संवाद होणे अपेक्षित होते. मात्र ते दिसले नाही. म्हणून जे सहज होत नसेल ते जाणीवपूर्वक राबविले पाहिजे, असा संकल्प करुन ‘पालक संवाद’ उपक्रमाला शाळेत सुरवात केली. मुलांशी पालकांचा नियमित संवाद व्हावा हा धागा धरुन उपक्रमाची आखणी केली.मुलांच्या पालकांशी होणाऱ्या संवादाने कुटुंबात होणारा आनंद आपल्या शाळेतील मुलांमुळे त्यांच्या पालकांना मिळावा म्हणूनही ‘पालक संवाद’ हा उपक्रम सुरु केला. यात पालकांऐवजी मुलांनी पालकांशी संवाद सुरु करावा, अशा सूचना दिल्या. मुलांनी शाळेत घडलेल्या चांगल्या बाबी पालकांना सांगाव्यात. गाणी, कविता, प्रार्थना म्हणून दाखवाव्यात. परिपाठ किंवा शाळेत घडलेला एखादा किस्सा, विनोद पालकांशी शेअर करावा. इंग्रजी पाढे, कविता, संभाषण, छोटे इंग्रजी शब्द व वाक्यांचा घरी जाणीवपूर्वक वापर करावा. शाळेत मिळालेली शाबासकी घरच्यांना सांगावी. बक्षीस दाखवावे. शाळेत झालेल्या कार्यक्रमाची घरी चर्चा करावी. आपले शिक्षक, मित्र यांच्या चांगल्या गोष्टी आईबाबांना सांगाव्यात. एखादा विषय, घटना यावर आपली मते मांडावीत. पालकांना या विषयावर बोलते करावे. आपला गृहपाठ, प्रकल्प तयार करताना मुलांनी पालकांची मदत घ्यावी, असे या उपक्रमाचे स्वरुप होते.या उपक्रमाचे खूप असे फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा हा की आमच्या गावात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. शाळेच्या अनेक चांगल्या बाबी विनासायास पालकांपर्यंत पोहचल्या. या माध्यमातून शाळेचा मॉक प्रचार खूप चांगल्या प्रकारे झाला. त्यामुळे पालक शाळेकडे आकर्षित झाले. दुसरी महत्त्वाची व मोठी बाब शाळेची पटसंख्या वाढविण्यास हा उपक्रम अत्यंत उपयोगी सिद्ध झाला. शाळेचा पट १५४ वरुन २१५ वर पोचला. पालकांना मुलांमध्ये आपले उज्ज्वल भविष्य दिसू लागले. आपली मुले अभ्यासात हुशार असून त्यांच्यासाठी तरी आपण जगले पाहिजे हा भाव अनेक पालकांच्या मनात निर्माण झाला. पालक व मुले यांच्यामध्ये संवाद सुरु झाला. त्यामुळे परस्परांविषयी प्रेम, सहानुभूती निर्माण झाली. शिक्षक, पालक व मुले यांचा आता असा थेट संबंध येऊ लागला. आमच्या निंभा गावात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. ही जमेची व अभिमानास्पद बाब आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या