शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील सत्तासमीकरण अपक्षांच्या मतावर

By admin | Updated: June 12, 2016 02:36 IST

राज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार सदस्यीय प्रभागाची व्यूहरचना : कमी टक्केवारीत मिळाली भाजपला सत्तागणेश हूड नागपूरराज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला अधिक लाभ होईल, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत अपक्षांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार असल्याने या मतांच्या कौलावर महापालिकेतील सत्तासमीकरण ठरणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक अवघड जाईल असा अंदाज आहे. एक ा प्रभागात ६० ते ७० हजार मतदार असल्याने ही एक मिनी विधानसभा निवडणूकच ठरणार आहे. या निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारेच ही निवडणूक लढू शकतील. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार आहे. पक्षाची परंपरागत मते फारसी बदलत नसतात. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता भाजपला काँग्रेसपेक्षा ९७७३८ मते अधिक मिळाली होती. भाजप-शिवसेना युतीचा विचार केला तर दोन्ही पक्षांना ६७८९१४ तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६०८३६० मते मिळाली होती. युती व आघाडीच्या मतातील अंतर केवळ ७०५५४ इतके आहे. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षांना मिळालेल्या मतांचा कौल या निवडणुकीत कुणाच्या बाजूने जातो, यावर सत्तासमीकरण ठरण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यात २०,६७,८०९ मते वैध ठरली होती. ७२ प्रभागातून १४५ उमेदवार निवडून आले होते. यात भाजपला ६,१३,७४९ मते पडली. त्यांचे ६२ उमेदवार निवडून आले होते. भाजपला ३२ टक्के मते मिळाली असतानाही अपक्षांच्या पदतीने नागपूर महापालिकेतील सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांच्या तुलनेत निम्मेहून अधिक ३,६५,८३९ मते मिळूनही केवळ १० अपक्ष निवडून आले होते.एकूण मताचा विचार करता २०,६७,८०९ मतापैकी १४,५३,७७० मते इतर पक्षांना मिळाली होती. यात काँग्रेसला ५१६०३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९२३२९, बसपाला २०३५९७, शिवसेना ६५१७५, मनसे ४७९४४, भाकप २३२०, माकप ३०४, समाजवादी पार्टी ६९२०,जनता दल युनायटेड ५६०७ इतर राज्यस्तरीय पक्षांना १७५३५, आघाडीच्या उमेदवारांना १३४२१६ मते मिळाली होती. एकूण मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता अगामी निवडणूक कुणालाही सोपी नसल्याचे चित्र आहे. विकास योजनांवर भरकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध योजना व शहरात हाती घेण्यात आलेल्या विकास कामांचा प्रचार करण्यावर भाजपचा भर राहील. परंतु या योजनांचा सर्वसामान्यांना थेट लाभ मिळत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीवर याचा प्रभाव कितपत राहील, हा प्रश्नच आहे. नकारात्मक वातावरणाचा फटकाकेंद्र व राज्य सरकाराच्या धोरणामुळे बाजारपेठेवर झालेला परिणाम यामुळे भाजपला साथ देणाऱ्या व्यापारी वर्गात असलेली नाराजी, तसेच सत्ताधारी पक्षाविषयी सर्वसामान्यांत नकारात्मक भावना निर्माण होते. महापालिकेत गेल्या काही वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. त्यातच मालमत्ता व पाणीकरातील दरवाढीचा फटका बसण्यची शक्यता नाकारता येत नाही.