शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

मनपातील सत्तासमीकरण अपक्षांच्या मतावर

By admin | Updated: June 12, 2016 02:36 IST

राज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार सदस्यीय प्रभागाची व्यूहरचना : कमी टक्केवारीत मिळाली भाजपला सत्तागणेश हूड नागपूरराज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला अधिक लाभ होईल, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत अपक्षांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार असल्याने या मतांच्या कौलावर महापालिकेतील सत्तासमीकरण ठरणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक अवघड जाईल असा अंदाज आहे. एक ा प्रभागात ६० ते ७० हजार मतदार असल्याने ही एक मिनी विधानसभा निवडणूकच ठरणार आहे. या निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारेच ही निवडणूक लढू शकतील. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार आहे. पक्षाची परंपरागत मते फारसी बदलत नसतात. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता भाजपला काँग्रेसपेक्षा ९७७३८ मते अधिक मिळाली होती. भाजप-शिवसेना युतीचा विचार केला तर दोन्ही पक्षांना ६७८९१४ तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६०८३६० मते मिळाली होती. युती व आघाडीच्या मतातील अंतर केवळ ७०५५४ इतके आहे. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षांना मिळालेल्या मतांचा कौल या निवडणुकीत कुणाच्या बाजूने जातो, यावर सत्तासमीकरण ठरण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यात २०,६७,८०९ मते वैध ठरली होती. ७२ प्रभागातून १४५ उमेदवार निवडून आले होते. यात भाजपला ६,१३,७४९ मते पडली. त्यांचे ६२ उमेदवार निवडून आले होते. भाजपला ३२ टक्के मते मिळाली असतानाही अपक्षांच्या पदतीने नागपूर महापालिकेतील सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांच्या तुलनेत निम्मेहून अधिक ३,६५,८३९ मते मिळूनही केवळ १० अपक्ष निवडून आले होते.एकूण मताचा विचार करता २०,६७,८०९ मतापैकी १४,५३,७७० मते इतर पक्षांना मिळाली होती. यात काँग्रेसला ५१६०३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९२३२९, बसपाला २०३५९७, शिवसेना ६५१७५, मनसे ४७९४४, भाकप २३२०, माकप ३०४, समाजवादी पार्टी ६९२०,जनता दल युनायटेड ५६०७ इतर राज्यस्तरीय पक्षांना १७५३५, आघाडीच्या उमेदवारांना १३४२१६ मते मिळाली होती. एकूण मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता अगामी निवडणूक कुणालाही सोपी नसल्याचे चित्र आहे. विकास योजनांवर भरकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध योजना व शहरात हाती घेण्यात आलेल्या विकास कामांचा प्रचार करण्यावर भाजपचा भर राहील. परंतु या योजनांचा सर्वसामान्यांना थेट लाभ मिळत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीवर याचा प्रभाव कितपत राहील, हा प्रश्नच आहे. नकारात्मक वातावरणाचा फटकाकेंद्र व राज्य सरकाराच्या धोरणामुळे बाजारपेठेवर झालेला परिणाम यामुळे भाजपला साथ देणाऱ्या व्यापारी वर्गात असलेली नाराजी, तसेच सत्ताधारी पक्षाविषयी सर्वसामान्यांत नकारात्मक भावना निर्माण होते. महापालिकेत गेल्या काही वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. त्यातच मालमत्ता व पाणीकरातील दरवाढीचा फटका बसण्यची शक्यता नाकारता येत नाही.