शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील सत्तासमीकरण अपक्षांच्या मतावर

By admin | Updated: June 12, 2016 02:36 IST

राज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार सदस्यीय प्रभागाची व्यूहरचना : कमी टक्केवारीत मिळाली भाजपला सत्तागणेश हूड नागपूरराज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला अधिक लाभ होईल, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत अपक्षांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार असल्याने या मतांच्या कौलावर महापालिकेतील सत्तासमीकरण ठरणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक अवघड जाईल असा अंदाज आहे. एक ा प्रभागात ६० ते ७० हजार मतदार असल्याने ही एक मिनी विधानसभा निवडणूकच ठरणार आहे. या निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारेच ही निवडणूक लढू शकतील. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार आहे. पक्षाची परंपरागत मते फारसी बदलत नसतात. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता भाजपला काँग्रेसपेक्षा ९७७३८ मते अधिक मिळाली होती. भाजप-शिवसेना युतीचा विचार केला तर दोन्ही पक्षांना ६७८९१४ तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६०८३६० मते मिळाली होती. युती व आघाडीच्या मतातील अंतर केवळ ७०५५४ इतके आहे. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षांना मिळालेल्या मतांचा कौल या निवडणुकीत कुणाच्या बाजूने जातो, यावर सत्तासमीकरण ठरण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यात २०,६७,८०९ मते वैध ठरली होती. ७२ प्रभागातून १४५ उमेदवार निवडून आले होते. यात भाजपला ६,१३,७४९ मते पडली. त्यांचे ६२ उमेदवार निवडून आले होते. भाजपला ३२ टक्के मते मिळाली असतानाही अपक्षांच्या पदतीने नागपूर महापालिकेतील सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांच्या तुलनेत निम्मेहून अधिक ३,६५,८३९ मते मिळूनही केवळ १० अपक्ष निवडून आले होते.एकूण मताचा विचार करता २०,६७,८०९ मतापैकी १४,५३,७७० मते इतर पक्षांना मिळाली होती. यात काँग्रेसला ५१६०३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९२३२९, बसपाला २०३५९७, शिवसेना ६५१७५, मनसे ४७९४४, भाकप २३२०, माकप ३०४, समाजवादी पार्टी ६९२०,जनता दल युनायटेड ५६०७ इतर राज्यस्तरीय पक्षांना १७५३५, आघाडीच्या उमेदवारांना १३४२१६ मते मिळाली होती. एकूण मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता अगामी निवडणूक कुणालाही सोपी नसल्याचे चित्र आहे. विकास योजनांवर भरकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध योजना व शहरात हाती घेण्यात आलेल्या विकास कामांचा प्रचार करण्यावर भाजपचा भर राहील. परंतु या योजनांचा सर्वसामान्यांना थेट लाभ मिळत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीवर याचा प्रभाव कितपत राहील, हा प्रश्नच आहे. नकारात्मक वातावरणाचा फटकाकेंद्र व राज्य सरकाराच्या धोरणामुळे बाजारपेठेवर झालेला परिणाम यामुळे भाजपला साथ देणाऱ्या व्यापारी वर्गात असलेली नाराजी, तसेच सत्ताधारी पक्षाविषयी सर्वसामान्यांत नकारात्मक भावना निर्माण होते. महापालिकेत गेल्या काही वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. त्यातच मालमत्ता व पाणीकरातील दरवाढीचा फटका बसण्यची शक्यता नाकारता येत नाही.