शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

नॉनब्रँडेड धान्यावरील जीएसटीला विरोध; ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 19:15 IST

Nagpur News नॉनब्रँडेड धान्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवार, १६ जुलैला नागपुरातील व्यापाऱ्यांनी धान्य बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दालमिल बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देधान्य बाजार बंद, बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट, दालमिलची चाके थांबली

नागपूर : नॉनब्रँडेड धान्यावर पाच टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्याच्या निर्णयाविरुद्ध शनिवार, १६ जुलैला नागपुरातील व्यापाऱ्यांनी धान्य बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दालमिल बंद ठेवून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. नागपूर शहरात एकाच दिवसात ५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. या बंदमुळे धान्य आणि बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता, तर दालमिलची चाके थांबली होती.

जीएसटी परिषदेने नॉनब्रँडेड धान्य, डाळी, दाल मिरची आणि इतर खाद्यान्नांवर १८ जुलैपासून पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध व्यापाऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला.

इतवारी धान्य व बाजार समितीत व्यवहार ठप्प

इतवारी धान्य बाजार, बाजार समिती आणि नागपूर शहरातील लहानमोठी धान्याची दुकाने बंद होती. कळमना बाजार समितीत २५० पेक्षा जास्त आडतिये व १२५ दुकाने, इतवारी धान्य बाजारात २०० पेक्षा जास्त दुकाने आणि नागपुरात विशेषत: जवळपास ३०० दुकानांमधून धान्य आणि डाळींची विक्री झालीच नाही, शिवाय आवक आणि जावक बंद होती.

डाळींचे उत्पादन थांबले

नागपुरात १२० पेक्षा जास्त दालमिल असून, दररोज डाळींचे उत्पादन घेतले जाते. मात्र, शनिवारी दालमिल बंद ठेवण्यात आल्याने डाळींचे उत्पादन थांबले.

कळमन्यात १० कोटींची उलाढाल थांबली

कळमन्यात शनिवारी धान्याची खरेदी-विक्री झाली नाही. त्यामुळे जवळपास १० कोटींची खरेदी-विक्रीची उलाढाल थांबली. आडतियांनी असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध घोषणा दिल्या.

जीएसटीचा पुतळा जाळला

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सिव्हिल लाइन्स येथील प्रांगणात चेंबरच्या अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध जीएसटीचा पुतळा जाळून निषेध केला. ५ टक्के जीएसटी आकारणीचा लहान-मोठ्या धान्य व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा.

व्यापारी व आडतियांकडून १०० टक्के बंद

नॉनब्रँडेड धान्य, डाळीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय म्हणजे व्यापारी, शेतकरी, सामान्य नागरिक यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचे व्यापारी संघटनांचे मत आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, इतवारी धान्य बाजार असोसिएशन सचिव प्रताप मोटवानी, दाल मिल ओनर्स असोसिएशन, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी केली आहे.

टॅग्स :GSTजीएसटी