शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:26 IST

:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देमहालमध्ये गडकरींच्या विजयाचा आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.महाल येथील गडकरींच्या निवासस्थानाजवळ झालेल्या झालेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, नागपूरचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.अनिल सोले, आ.मिलिंद माने, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, अ‍ॅड.सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरमध्ये अनेकांनी जातीपातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन गडकरी यांनी जातपात न मानता सर्वांचे काम केले. त्यामुळे सर्वांनी त्यांना मतदान केले. नागपूरच्या इतिहासात गडकरी यांच्याएवढी मतं कुणीही घेतली नाही. त्यामुळेच विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. मिळालेला विजय डोक्यात जाणार नाही, तो मनात साठवून ठेवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. निवडणुकीत आपण प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही. विचाराचा सामना विचाराने करायचा असतो. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अहंकार वाढणार नाही याचे वचन मी देतो. असे गडकरी म्हणाले. आज दिल्लीला जात असताना हवामान खराब झाले. त्यामुळे विमान वर-खाली झाले व मीदेखील दीड-दोन फूट उसळलो. वाटलं, आता काय होणार ? मात्र जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते व हीच माझी ताकद आहे, असेदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.ही राज्यातील शेवटची पाणीटंचाईआज महाराष्ट्रात दुष्काळ आहे व पाणीटंचाई जाणवते आहे. आम्ही राज्यभरात सिंचनाची कामे हाती घेतली आहे. यावर्षी असलेली पाण्याची टंचाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटची पाणीटंचाई असेल. पुढील वर्षी ती राहणार नाही. पाण्याचा प्रश्न आम्ही अग्रक्रमाने सोडवू, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री