शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

विरोधकांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:26 IST

:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देमहालमध्ये गडकरींच्या विजयाचा आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.महाल येथील गडकरींच्या निवासस्थानाजवळ झालेल्या झालेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, नागपूरचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.अनिल सोले, आ.मिलिंद माने, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, अ‍ॅड.सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरमध्ये अनेकांनी जातीपातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन गडकरी यांनी जातपात न मानता सर्वांचे काम केले. त्यामुळे सर्वांनी त्यांना मतदान केले. नागपूरच्या इतिहासात गडकरी यांच्याएवढी मतं कुणीही घेतली नाही. त्यामुळेच विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. मिळालेला विजय डोक्यात जाणार नाही, तो मनात साठवून ठेवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. निवडणुकीत आपण प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही. विचाराचा सामना विचाराने करायचा असतो. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अहंकार वाढणार नाही याचे वचन मी देतो. असे गडकरी म्हणाले. आज दिल्लीला जात असताना हवामान खराब झाले. त्यामुळे विमान वर-खाली झाले व मीदेखील दीड-दोन फूट उसळलो. वाटलं, आता काय होणार ? मात्र जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते व हीच माझी ताकद आहे, असेदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.ही राज्यातील शेवटची पाणीटंचाईआज महाराष्ट्रात दुष्काळ आहे व पाणीटंचाई जाणवते आहे. आम्ही राज्यभरात सिंचनाची कामे हाती घेतली आहे. यावर्षी असलेली पाण्याची टंचाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटची पाणीटंचाई असेल. पुढील वर्षी ती राहणार नाही. पाण्याचा प्रश्न आम्ही अग्रक्रमाने सोडवू, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री