शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

विरोधकांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:26 IST

:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देमहालमध्ये गडकरींच्या विजयाचा आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.महाल येथील गडकरींच्या निवासस्थानाजवळ झालेल्या झालेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, नागपूरचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.अनिल सोले, आ.मिलिंद माने, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, अ‍ॅड.सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरमध्ये अनेकांनी जातीपातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन गडकरी यांनी जातपात न मानता सर्वांचे काम केले. त्यामुळे सर्वांनी त्यांना मतदान केले. नागपूरच्या इतिहासात गडकरी यांच्याएवढी मतं कुणीही घेतली नाही. त्यामुळेच विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. मिळालेला विजय डोक्यात जाणार नाही, तो मनात साठवून ठेवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. निवडणुकीत आपण प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही. विचाराचा सामना विचाराने करायचा असतो. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अहंकार वाढणार नाही याचे वचन मी देतो. असे गडकरी म्हणाले. आज दिल्लीला जात असताना हवामान खराब झाले. त्यामुळे विमान वर-खाली झाले व मीदेखील दीड-दोन फूट उसळलो. वाटलं, आता काय होणार ? मात्र जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते व हीच माझी ताकद आहे, असेदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.ही राज्यातील शेवटची पाणीटंचाईआज महाराष्ट्रात दुष्काळ आहे व पाणीटंचाई जाणवते आहे. आम्ही राज्यभरात सिंचनाची कामे हाती घेतली आहे. यावर्षी असलेली पाण्याची टंचाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटची पाणीटंचाई असेल. पुढील वर्षी ती राहणार नाही. पाण्याचा प्रश्न आम्ही अग्रक्रमाने सोडवू, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री