शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

नागपूर  मनपात  पाणीटंचाईवरून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:37 IST

महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही सुरू झालेली नाही. मंगळवारी सर्वसाधारण सभेत या मुद्यावरून विरोधकांना सत्तापक्षाची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसमधील गटबाजीमुळे विरोधक निष्प्रभ : नागरिकांच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यातच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही सुरू झालेली नाही. मंगळवारी सर्वसाधारण सभेत या मुद्यावरून विरोधकांना सत्तापक्षाची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु विरोधक सभागृहात कशी भूमिका घेतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक संभाव्य पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चेची मागणी करू शकतात. यावर चर्चा झाल्यास संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात महापालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मिळू शकते. परंतु काँग्रेस दोन गटात विभागली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच अन्य महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेस संघटित होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मोमीनपुरा भागातील महिला मध्यरात्री पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक आहेत. परंतु पाणीटंचाईच्या मुद्यावर गप्प आहेत. दुसरीकडे उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत आहे.तसेच नगरसेवकांना निधी वाटप करताना भेदभाव केला जातो. महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात १२ टक्के कपात केली आहे. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप आहे. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक नितीश ग्वालबन्शी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला आहे.अमृत योजनेवर होणार निर्णयकेंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिजूनेशन आॅफ अर्बन ट्रान्समिशन(अमृत)अभियानांतर्गत महापालिकेला २८२.५९ कोटींचा निधी पाणीपुरवठा योजनांसाठी प्राप्त झाला आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देश मुंबई येथे आयोजित बैठकीत देण्यात आले होते. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ही केंद्र सरकारची योजना असल्याने महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात यावी, अशा स्वरूपाचे निर्देश दिले आहे. याबाबतचा विषय मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी