शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

साठीनंतर संधी बेरोजगारांना बंदी!

By admin | Updated: July 17, 2016 01:29 IST

निवृत्तीचे वय ६०, कामाचे तास ८ ! या समाजशास्त्रीय सिद्धांताची युवकांच्या उत्कर्षाच्या गप्पा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कोंडी केली आहे.

गतिमान प्रशासनाचा पदभरतीला ब्रेक : २५१ पदांचा बॅकलॉग कशा‘साठी’ ? जितेंद्र ढवळे नागपूर निवृत्तीचे वय ६०, कामाचे तास ८ ! या समाजशास्त्रीय सिद्धांताची युवकांच्या उत्कर्षाच्या गप्पा करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कोंडी केली आहे. राजकीय स्वार्थापोटी पदभरतीला ब्रेक लागल्याने विद्यापीठात २५१ पदांचा महाबॅकलॉग (अनुशेष) तयार झाला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाची ही आकडेवारी विदर्भात बॅकलॉग (अनुशेष) नकोच, असा कौशल्य विकासाचा दावा करणाऱ्या सत्तापक्षासाठी अंजन घालणारी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २००९ मध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००८ मध्ये राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी दिलेल्या निर्णयाच्या आधारावर नऊ विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांचा आकृतीबंध निश्चित केला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पन्नाशी नागपूर : राज्य उच्च शिक्षण संचालनालयाने अलीकडेच राज्यातील विद्यापीठातील रिक्त पदांचा आढावा घेतला. तीत नागपूर विद्यापीठात विविध संवर्गातील २५१ पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. इकडे मात्र ‘सेवानिवृत्तांना संधी, बेरोजगारांना बंदी’ हे ब्रीद मानत विद्यापीठाची ढकलगाडी प्रशासनाने सुरू केली आहे. विद्यापीठात नोकरी करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आकड्याने पन्नाशी गाठली आहे ! अपुऱ्या मनुष्यबळामुळे राज्यातील विद्यापीठाचे प्रशासन मोडकळीस येत असल्याचे लक्षात घेत सरकारने २३ डिसेंबर २०११ रोजी विद्यापीठातील शिक्षकेतर पदांचा सुधारित आकृतीबंधला मंजुरी दिली होती. यानुसार नागपूर विद्यापीठासाठी ८६४ पदांना मंजुरी देण्यात आली होती. यात वर्ग १ ची ६०, वर्ग (२)-५२, वर्ग- ३(४७६) आणि वर्ग-४(२७६) पदांचा समावेश करण्यात आला होता. जगाने तंत्रज्ञान स्वीकारल्याने विद्यापीठात तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या सुपर क्लासवन अधिकाऱ्यांच्या पदांची वाढ करण्यात आली होती. मध्यल्या काळात दोन कुलगुरुंनी पदभरती प्रक्रिया राबविण्याचा संकल्प केला. मात्र आताच्या गतिमान प्रशासनाने पदभरतीच्या गतीला ब्रेक लावला आहे. त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संधी देत बेरोजगारांना विद्यापीठात बंदी टाकली आहे. राज्य शिक्षण संचालनालयाने मात्र यावर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. इकडे मात्र सरकारकडून आलेल्या सध्याच्या आदेशाचा अन्वयार्थ काढत विद्यापीठाने पदभरतीला ब्रेक लावला आहे. मुळात पदभरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती थांबविण्यात यावी, असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतला नसल्याचे पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)