शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन ‘मुस्कान’ने २० हजारावर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 21:14 IST

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्री रणजित पाटील : सुरक्षेच्या दृष्टीने झोपडपट्टी भागात सीसीटीव्ही बसवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३२५९८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यात सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी २९५०५ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या कालावधीत १६ ते २५ वयोगटातील १६२८१ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यातील १४१४१ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १८ वर्षांखालील हरविलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मूल सापडले नाही तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबईतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात बीट पेट्रोलिंग तसेच पोलीस ठाणे हद्दीत मोहल्ला कमिटी यांची सभा घेऊन त्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात व अनोळखी व्यक्ती मिळाल्यास पोलीस ठाण्यास कळवावे असे सांगितले जाते.यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र पाटणी, प्रताप सरनाईक, भारती लव्हेकर यांनी भाग घेतला.बालक शोधण्यासाठी पालकांचे वाहनयावेळी सदस्यांनी बेपत्ता बालक शोधण्यासाठी पोलीस पालकांनाच वाहनाची व्यवस्था करायला लावत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा गृहराज्यमंत्री पाटील यांनी ही बाब अतिशय गंभीर असून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Home Ministryगृह मंत्रालय