शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आॅपरेशन ‘मुस्कान’ने २० हजारावर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 21:14 IST

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्री रणजित पाटील : सुरक्षेच्या दृष्टीने झोपडपट्टी भागात सीसीटीव्ही बसवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३२५९८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यात सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी २९५०५ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या कालावधीत १६ ते २५ वयोगटातील १६२८१ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यातील १४१४१ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १८ वर्षांखालील हरविलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मूल सापडले नाही तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबईतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात बीट पेट्रोलिंग तसेच पोलीस ठाणे हद्दीत मोहल्ला कमिटी यांची सभा घेऊन त्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात व अनोळखी व्यक्ती मिळाल्यास पोलीस ठाण्यास कळवावे असे सांगितले जाते.यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र पाटणी, प्रताप सरनाईक, भारती लव्हेकर यांनी भाग घेतला.बालक शोधण्यासाठी पालकांचे वाहनयावेळी सदस्यांनी बेपत्ता बालक शोधण्यासाठी पोलीस पालकांनाच वाहनाची व्यवस्था करायला लावत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा गृहराज्यमंत्री पाटील यांनी ही बाब अतिशय गंभीर असून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Home Ministryगृह मंत्रालय