शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आॅपरेशन ‘मुस्कान’ने २० हजारावर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 21:14 IST

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.

ठळक मुद्देगृहराज्यमंत्री रणजित पाटील : सुरक्षेच्या दृष्टीने झोपडपट्टी भागात सीसीटीव्ही बसवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३२५९८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यात सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी २९५०५ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या कालावधीत १६ ते २५ वयोगटातील १६२८१ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यातील १४१४१ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १८ वर्षांखालील हरविलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मूल सापडले नाही तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबईतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बृहन्मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात बीट पेट्रोलिंग तसेच पोलीस ठाणे हद्दीत मोहल्ला कमिटी यांची सभा घेऊन त्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात व अनोळखी व्यक्ती मिळाल्यास पोलीस ठाण्यास कळवावे असे सांगितले जाते.यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र पाटणी, प्रताप सरनाईक, भारती लव्हेकर यांनी भाग घेतला.बालक शोधण्यासाठी पालकांचे वाहनयावेळी सदस्यांनी बेपत्ता बालक शोधण्यासाठी पोलीस पालकांनाच वाहनाची व्यवस्था करायला लावत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा गृहराज्यमंत्री पाटील यांनी ही बाब अतिशय गंभीर असून यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Home Ministryगृह मंत्रालय