शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

नागपुरात ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:29 IST

गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची कल्पना : गुन्हेगारांवर जरब बसविण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.२७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर २०१८ असे सलग १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ चालविले जाणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला रोज त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागणार आहे. ठाणेदाराने त्यांच्या सहकाऱ्यामार्फत किती गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, लुटमार, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, एटीएम, घरफोडी करणारे गुन्हेगार किती तपासले. त्यांच्याकडून किंवा दुसऱ्या नवीन गुन्हेगारांकडून किती शस्त्रे जप्त केली, त्यांच्यावर काय प्रतिबंधात्मक कारवाई केली, याचा अहवाल तयार करावा लागणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या कुठे राहत आहेत, ते काय करतात, त्याचीही माहिती रोजच्या रोज सर्व वरिष्ठांना सादर करावी लागणार आहे.ठाणेदारांनी केलेल्या कारवाईचा अहवाल डीसीपी, गुन्हे शाखेसह पोलीस नियंत्रण कक्षाला देणेही बंधनकारक आहे. ठाणेदारांनी तयार केलेल्या गुन्हेगार तपासणीच्या अहवालाची एसीपी, डीसीपींना त्यांच्या परिमंडळनिहाय शहानिशा करावी लागणार आहे.गुन्हेगारी नियंत्रणाची अपेक्षा‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ उपक्रमांतर्गत रोजच गुन्हेगार तपासले जातील. गुन्हेगारांवर पोलिसांकडून रोजच नजर ठेवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांवर जरब राहील. त्यांना उपद्रव करण्यास संधी मिळणार नाही. पोलिसांचा धाक वाढेल. अर्थात शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यश येईल, अशी यामागे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची कल्पना आहे.यापूर्वीचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरातील गुन्हेगार त्यांच्या घरीच आहे की आणखी कुठे, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांना रोज टास्क देणे सुरू केले होते. त्यानुसार, आज कोणता गुन्हेगार कुठे आहे, त्याची माहिती काढून त्याच्यासोबत सेल्फी काढायची आणि ती वरिष्ठांना पाठविण्याचे निर्देश प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आले होते. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, हे विशेष!

टॅग्स :Crimeगुन्हाNagpur Policeनागपूर पोलीस