शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरात ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:29 IST

गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची कल्पना : गुन्हेगारांवर जरब बसविण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.२७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर २०१८ असे सलग १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ चालविले जाणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला रोज त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागणार आहे. ठाणेदाराने त्यांच्या सहकाऱ्यामार्फत किती गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, लुटमार, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, एटीएम, घरफोडी करणारे गुन्हेगार किती तपासले. त्यांच्याकडून किंवा दुसऱ्या नवीन गुन्हेगारांकडून किती शस्त्रे जप्त केली, त्यांच्यावर काय प्रतिबंधात्मक कारवाई केली, याचा अहवाल तयार करावा लागणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या कुठे राहत आहेत, ते काय करतात, त्याचीही माहिती रोजच्या रोज सर्व वरिष्ठांना सादर करावी लागणार आहे.ठाणेदारांनी केलेल्या कारवाईचा अहवाल डीसीपी, गुन्हे शाखेसह पोलीस नियंत्रण कक्षाला देणेही बंधनकारक आहे. ठाणेदारांनी तयार केलेल्या गुन्हेगार तपासणीच्या अहवालाची एसीपी, डीसीपींना त्यांच्या परिमंडळनिहाय शहानिशा करावी लागणार आहे.गुन्हेगारी नियंत्रणाची अपेक्षा‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ उपक्रमांतर्गत रोजच गुन्हेगार तपासले जातील. गुन्हेगारांवर पोलिसांकडून रोजच नजर ठेवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांवर जरब राहील. त्यांना उपद्रव करण्यास संधी मिळणार नाही. पोलिसांचा धाक वाढेल. अर्थात शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यश येईल, अशी यामागे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची कल्पना आहे.यापूर्वीचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरातील गुन्हेगार त्यांच्या घरीच आहे की आणखी कुठे, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांना रोज टास्क देणे सुरू केले होते. त्यानुसार, आज कोणता गुन्हेगार कुठे आहे, त्याची माहिती काढून त्याच्यासोबत सेल्फी काढायची आणि ती वरिष्ठांना पाठविण्याचे निर्देश प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आले होते. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, हे विशेष!

टॅग्स :Crimeगुन्हाNagpur Policeनागपूर पोलीस