शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अधिग्रहणावर खुली चर्चा व्हावी

By admin | Updated: March 29, 2015 02:26 IST

भूमी अधिग्रहण विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत या मुद्यावर खुली चर्चा व्हावी,

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत या मुद्यावर खुली चर्चा व्हावी, असे मत केंद्रीय नगर विकास खात्याचे मंत्री व भाजपचे नेते वेंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.नायडू शनिवारी महापालिकेच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे आले असता एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. भूमी अधिग्रहण विधेयकावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेकडे त्यांचे लक्ष वेधले असता नायडू म्हणाले, काँग्रेसच्याच राजवटीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या. काँग्रेस राजवटीत इंग्रजकालीन कायद्यानुसार जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यामुळेच २०१३ मध्ये काँग्रेसने त्यात बदल केला. तेव्हा भारतीय जनता पक्षाने सहकार्य केले होते. आता केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर तत्कालीन ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात २८ राज्यांनी यात सुधारणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसारच यात बदल करण्यात आले. यावर संसदेत प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या अनेक सूचना स्वीकारण्यात आल्या. सुधारित विधेयकामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यांना चारपट अधिक जमिनीचा मोबदला मिळणार असून त्यांच्या मुलांना नोकरी व नोकरी न मिळाल्यास २० वर्षांपर्यंत दरमहा मानधन देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध हा केवळ विरोधासाठी आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. संसदेत या विधेयकावर चर्चा झाली आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही. या मुद्यावर देशव्यापी चर्चा व्हावी, असे नायडू म्हणाले.सुधारित विधेयकात अधिक मोबदल्याची तरतूद असल्याने केंद्राच्या विविध योजनांसाठी जमीन अधिग्रहित करताना त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून वटहुकूम काढणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)