शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

भूमी अधिग्रहणावर खुली चर्चा व्हावी

By admin | Updated: March 29, 2015 02:26 IST

भूमी अधिग्रहण विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत या मुद्यावर खुली चर्चा व्हावी,

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत या मुद्यावर खुली चर्चा व्हावी, असे मत केंद्रीय नगर विकास खात्याचे मंत्री व भाजपचे नेते वेंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.नायडू शनिवारी महापालिकेच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे आले असता एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. भूमी अधिग्रहण विधेयकावर सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेकडे त्यांचे लक्ष वेधले असता नायडू म्हणाले, काँग्रेसच्याच राजवटीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या. काँग्रेस राजवटीत इंग्रजकालीन कायद्यानुसार जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यामुळेच २०१३ मध्ये काँग्रेसने त्यात बदल केला. तेव्हा भारतीय जनता पक्षाने सहकार्य केले होते. आता केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर तत्कालीन ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली होती. त्यात २८ राज्यांनी यात सुधारणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसारच यात बदल करण्यात आले. यावर संसदेत प्रदीर्घ चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या अनेक सूचना स्वीकारण्यात आल्या. सुधारित विधेयकामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यांना चारपट अधिक जमिनीचा मोबदला मिळणार असून त्यांच्या मुलांना नोकरी व नोकरी न मिळाल्यास २० वर्षांपर्यंत दरमहा मानधन देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध हा केवळ विरोधासाठी आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. संसदेत या विधेयकावर चर्चा झाली आहे. यात लपवण्यासारखे काहीच नाही. या मुद्यावर देशव्यापी चर्चा व्हावी, असे नायडू म्हणाले.सुधारित विधेयकात अधिक मोबदल्याची तरतूद असल्याने केंद्राच्या विविध योजनांसाठी जमीन अधिग्रहित करताना त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून वटहुकूम काढणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)