शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

... तरच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुराेगामी हाेईल; महात्मा ज्याेतिबा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 21:34 IST

Nagpur News महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना चालना दिली तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुराेगामी हाेईल, असे मत राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

नागपूर : वेगवेगळे सामाजिक प्रश्न साेडविणे व समाज विघटन थांबवून समाज प्रस्थापित करणे आजच्या पिढीसमाेरचे आव्हान आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करूनच समतामूलक समाजाची स्थापना शक्य हाेईल. महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना चालना दिली तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुराेगामी हाेईल, असे मत राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ पर्यंत ‘सामाजिक न्याय पर्व’ साजरे केले जात आहे. याअंतर्गत महात्मा ज्याेतिबा फुले यांचा जयंती कार्यक्रम मंगळवारी दीक्षाभूमीस्थित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयाेजित करण्यात आली. याप्रसंगी नागालँडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे, महाज्याेतिचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, क्रीष्णा इंगळे, भूषण दवडे, भूपेश थुलकर, मायाताई घोरपडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीप्रथा नष्ट करण्यासाठी लढा दिला, स्त्रि शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. सामाजिक न्याय विभागाद्वारे फुलेवाडा शैक्षणिक योजना तयार करुन सामजिक समता निर्माण करण्याचे हाती घेतले असून ज्योतिबांच्या प्रति हेच खरे अभिवादन ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध याेजनांची माहिती दिली.

याप्रसंगी संदीप तामगाडगे यांनी सामाजिक समतेमुळे पूर्वोत्तर भारतातील नागालँड राज्यात प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य निवडून आल्याचे सांगितले. महात्मा फुले यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या चार तत्वांवर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना करुन समाजातील अनेक कुप्रथा बंद केल्या व पर्यायवाचक समाज व्यवस्था निर्माण केली. पुरुष बरोबरच महिलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले. महिलांची गुलामगिरीच्या बेड्यातून सुटका केली. ज्योतिबांच्या प्रागतिक विचारांमुळेच महिलांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाल्याचे संदीप तामगाडगे म्हणाले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. सुकेशिनी तेलगोटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक