शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

... तरच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुराेगामी हाेईल; महात्मा ज्याेतिबा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2023 21:34 IST

Nagpur News महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना चालना दिली तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुराेगामी हाेईल, असे मत राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

नागपूर : वेगवेगळे सामाजिक प्रश्न साेडविणे व समाज विघटन थांबवून समाज प्रस्थापित करणे आजच्या पिढीसमाेरचे आव्हान आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करूनच समतामूलक समाजाची स्थापना शक्य हाेईल. महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना चालना दिली तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुराेगामी हाेईल, असे मत राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ पर्यंत ‘सामाजिक न्याय पर्व’ साजरे केले जात आहे. याअंतर्गत महात्मा ज्याेतिबा फुले यांचा जयंती कार्यक्रम मंगळवारी दीक्षाभूमीस्थित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयाेजित करण्यात आली. याप्रसंगी नागालँडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे, महाज्याेतिचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, क्रीष्णा इंगळे, भूषण दवडे, भूपेश थुलकर, मायाताई घोरपडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीप्रथा नष्ट करण्यासाठी लढा दिला, स्त्रि शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. सामाजिक न्याय विभागाद्वारे फुलेवाडा शैक्षणिक योजना तयार करुन सामजिक समता निर्माण करण्याचे हाती घेतले असून ज्योतिबांच्या प्रति हेच खरे अभिवादन ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध याेजनांची माहिती दिली.

याप्रसंगी संदीप तामगाडगे यांनी सामाजिक समतेमुळे पूर्वोत्तर भारतातील नागालँड राज्यात प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य निवडून आल्याचे सांगितले. महात्मा फुले यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या चार तत्वांवर आधारित सत्यशोधक समाजाची स्थापना करुन समाजातील अनेक कुप्रथा बंद केल्या व पर्यायवाचक समाज व्यवस्था निर्माण केली. पुरुष बरोबरच महिलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले. महिलांची गुलामगिरीच्या बेड्यातून सुटका केली. ज्योतिबांच्या प्रागतिक विचारांमुळेच महिलांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाल्याचे संदीप तामगाडगे म्हणाले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. सुकेशिनी तेलगोटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Socialसामाजिक