शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

-तरच नागपुरात १४ दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ : पालकमंत्री राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:17 IST

जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊन लावला जाईल, परंतु तो १४ दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन असेल.

ठळक मुद्दे सर्व बाबींचा विचार करून समिती घेणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊन लावला जाईल, परंतु तो १४ दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन असेल.राऊत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत्यूदर कमी ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच पालकमंत्र्यांचीही आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ट्या लोक तुटतात व आत्महत्या करतात. आर्थिक व्यवहारही कमी होतो. त्यामुळेच लॉकडाऊन लावण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करायला हवा. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. यात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे वरिष्ठ अधिकारी असतील. ही समिती परिस्थिती पाहून लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय घेईल. तसेही केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार ग्रामीणची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि शहराची जबाबदारी ही मनपा आयुक्तांकडे आहे. पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी केवळ मार्गदर्शन करू शकतात. लॉकडाऊनबाबत पत्रपरिषदेत संभ्रमही दिसून आला. एकीकडे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला तर दुसरीकडे लॉकडाऊनबाबतही इशारा देण्यात आला.राऊत यांनी हे स्पष्ट केले की, खूपच गरज पडली तरच लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला जाईल. परंतु तो स्मार्ट लॉकडाऊन असेल आणि कमीत कमी १४ दिवसाचा कर्फ्यूसह राहील. या दरम्यान उद्योग, कार्यालयात कामे कशी सुरू राहावीत, या काळात कुणीही उपाशीपोटी मरू नये, आर्थिक संकटात येऊ नये, याची खबरदारी घेण्यात येईल. यादरम्यान नागरिकांना दिलासा मिळावा याचा प्रयत्न केला जाईल. मधुमेह रुग्ण, गर्भवती महिला, हृदयरोगी यांना घरातच एकांतवासात राहावे लागेल. कॅशलेश देवाण-घेवाणीला प्रोत्साहन दिले जाईल.प्रत्येक वस्तीत कोरोना दक्षता समितीपालकमंत्र्यांनी सांगितले की, नागरिकांना कोविड-१९ बाबत जागरूक करण्यासाठी प्रत्येक वस्तीमध्ये कोरोना दक्षता समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कोरोना संसर्ग काळात नागरिकांना कसे राहावे, याबाबत मार्गदर्शन करेल. तसेच प्रत्येक वॉर्डात अ‍ॅण्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ती नि:शुल्क राहील. तर खासगी रुग्णालये व क्लिनिकमध्ये अ‍ॅण्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात येईल. यासाठी ७०० रुपयांचे शुल्क घेण्यात येईल. सरकारी व मनपा रुग्णालयातही ही सुविधा नि:शुल्क राहील.प्रशासनाचा बचावमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर होत असलेल्या आरोपादरम्यान पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनासह पोलीस विभागाच्या कामाची प्रशंसा केली. या अधिकाऱ्यांमुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. आज डॉक्टरांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सारेच थकले आहेत. परंतु अजूनही ते निकराने लढा देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणातविभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण २८४८ पॉझिटिव्ह लोकांपैकी केवळ ८१५ अ‍ॅक्टिव्ह आहेत. ग्रामीणमधील १०३५ रुग्णांपैकी केवळ ६३४ अ‍ॅक्टिव्ह आहेत. व्हेंटिलेटर व बेड पुरेसे आहेत. त्यामुळेच संस्थागत क्वारंटाईन बंद करून होम क्वारंटाईन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये मृत्यूदर १.३ व शहरात १.५ आहे. देशात तो सर्वात कमी आहे. दररोज २२०० टेस्ट करण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे. १०,८०३ अ‍ॅण्टिजेन टेस्ट झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याguardian ministerपालक मंत्रीNitin Rautनितीन राऊत