शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

केवळ सात टक्के फौजदारी प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: June 26, 2017 01:41 IST

राज्यातील न्यायालयांमध्ये फौजदारी प्रकरणांचा निपटारा केवळ सात टक्के आहे. दररोज नवनवीन प्रकरणे दाखल होत आहेत.

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये होत आहे वाढ राहुल अवसरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील न्यायालयांमध्ये फौजदारी प्रकरणांचा निपटारा केवळ सात टक्के आहे. दररोज नवनवीन प्रकरणे दाखल होत आहेत. त्यामानाने प्रकरणे प्रलंबित होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये न्यायालयांमध्ये १४ लाख ८० हजार ८८४ प्रकरणे सुनावणीस होती. त्यापैकी १ लाख २९ हजार १०९ प्रकरणांचा निपटारा होऊन १३ लाख ५१ हजार ७७५ प्रकरणे प्रलंबित राहिली. ८.७ टक्के प्रकरणांचा निपटारा होऊन ९१.३ टक्के प्रकरणे प्रलंबित राहिली. २०१३ मध्ये १५ लाख ३ हजार ४८६ प्रकरणांपैकी १ लाख ३४ हजार १९२ प्रकरणे निकाली निघून १३ लाख ६९ हजार २९४ प्रकरणे प्रलंबित राहिली. प्रकरणांच्या प्रलंबनाची ही टक्केवारी ९१.१ आणि प्रकरणे निकाली निघाल्याची टक्केवारी ८.९ होती. २०१४ मध्ये १५ लाख ३१ हजार ९६६ प्रकरणांपैकी १ लाख २० हजार ४७४ प्रकरणे निकाली निघून १४ लाख ११ हजार ४९२ प्रकरणे प्रलंबित राहिली. प्रकरणांचा निपटारा होण्याचे प्रमाण ७.९ आणि प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण ९२.१ टक्के होते. खटले प्रलंबनात नागपूर दुसरे वाढत्या गुन्हेगारीच्या मानाने न्यायालयांकडून खटला चालविण्याचे प्रमाण वाढलेले नाही. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आणि न्यायालयांनी खटले निकाली काढण्याचे गुणोत्तर २:१ असे आहे. ही तफावत कमी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. २०१५ मध्ये राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी आलेल्या प्रलंबित खटल्याची सरासरी टक्केवारी ९२.१६ एवढी होती. त्यापैकी सर्वाधिक ९७.०५ टक्के प्रलंबित प्रकरणे पुणे, त्याखालोखाल ९७.०४ टक्के नागपूर, ९६.०९ टक्के नवी मुंबई, ९६.७८ टक्के प्रकरणे ठाणे आणि ९६.४ टक्के प्रकरणे सोलापूर न्यायालयात आहेत.