शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

केवळ सात टक्के फौजदारी प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: June 26, 2017 01:41 IST

राज्यातील न्यायालयांमध्ये फौजदारी प्रकरणांचा निपटारा केवळ सात टक्के आहे. दररोज नवनवीन प्रकरणे दाखल होत आहेत.

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये होत आहे वाढ राहुल अवसरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील न्यायालयांमध्ये फौजदारी प्रकरणांचा निपटारा केवळ सात टक्के आहे. दररोज नवनवीन प्रकरणे दाखल होत आहेत. त्यामानाने प्रकरणे प्रलंबित होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये न्यायालयांमध्ये १४ लाख ८० हजार ८८४ प्रकरणे सुनावणीस होती. त्यापैकी १ लाख २९ हजार १०९ प्रकरणांचा निपटारा होऊन १३ लाख ५१ हजार ७७५ प्रकरणे प्रलंबित राहिली. ८.७ टक्के प्रकरणांचा निपटारा होऊन ९१.३ टक्के प्रकरणे प्रलंबित राहिली. २०१३ मध्ये १५ लाख ३ हजार ४८६ प्रकरणांपैकी १ लाख ३४ हजार १९२ प्रकरणे निकाली निघून १३ लाख ६९ हजार २९४ प्रकरणे प्रलंबित राहिली. प्रकरणांच्या प्रलंबनाची ही टक्केवारी ९१.१ आणि प्रकरणे निकाली निघाल्याची टक्केवारी ८.९ होती. २०१४ मध्ये १५ लाख ३१ हजार ९६६ प्रकरणांपैकी १ लाख २० हजार ४७४ प्रकरणे निकाली निघून १४ लाख ११ हजार ४९२ प्रकरणे प्रलंबित राहिली. प्रकरणांचा निपटारा होण्याचे प्रमाण ७.९ आणि प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण ९२.१ टक्के होते. खटले प्रलंबनात नागपूर दुसरे वाढत्या गुन्हेगारीच्या मानाने न्यायालयांकडून खटला चालविण्याचे प्रमाण वाढलेले नाही. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आणि न्यायालयांनी खटले निकाली काढण्याचे गुणोत्तर २:१ असे आहे. ही तफावत कमी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. २०१५ मध्ये राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी आलेल्या प्रलंबित खटल्याची सरासरी टक्केवारी ९२.१६ एवढी होती. त्यापैकी सर्वाधिक ९७.०५ टक्के प्रलंबित प्रकरणे पुणे, त्याखालोखाल ९७.०४ टक्के नागपूर, ९६.०९ टक्के नवी मुंबई, ९६.७८ टक्के प्रकरणे ठाणे आणि ९६.४ टक्के प्रकरणे सोलापूर न्यायालयात आहेत.